शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

अतिवृष्टीमुळे भाज्या कडाडल्या; कांदे, टोमॅटो ६० रुपये, कोथिंबीर १२० रुपये किलो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2021 07:30 IST

Nagpur News अतिवृष्टीमुळे भाज्यांचे नुकसान झाले असून, स्थानिक शेतकऱ्यांकडून आवक कमी झाल्याने भाव आकाशाला भिडले आहेत.

ठळक मुद्देदरवाढीमुळे गृहिणींचे बजेट वाढले दिवाळीनंतर भाव कमी होणार

नागपूर : अतिवृष्टीमुळे भाज्यांचे नुकसान झाले असून, स्थानिक शेतकऱ्यांकडून आवक कमी झाल्याने भाव आकाशाला भिडले आहेत. सध्या स्थानिकांकडून थोडीफार आवक सुरू झाल्याने काही भाज्यांचे भाव कमी झाले आहेत. पण किरकोळमध्ये कांदे, टोमॅटो, हिरवी मिरची ६० रुपये आणि कोथिंबीर १२० रुपये किलोवर गेले आहे. दिवाळीनंतर स्थानिक शेतकऱ्यांकडून आवक वाढल्यानंतर भाव कमी होणार असल्याचे ठोक विक्रेत्यांनी सांगितले.

स्थानिक उत्पादक शेतकऱ्यांसह टोमॅटो बेंगळुरू, हिरवी मिरची बुलडाणा व मौदा आणि कोथिंबीर नाशिक, नांदेड, उमरानाला येथून विक्रीला येत आहे. सिमला मिरचीची आवक भिलाई, रायपूर येथून आहे. फूलकोबीचे भाव ६० रुपये आहेत. पालक ७० ते ८० आणि मेथीचे भाव १२० रुपयांवर पोहोचले आहेत. ८० रुपये किलोचे वांगे सध्या ५० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत.

ग्राहक जास्त दराच्या भाज्यांची खरेदी करीत नसल्याचे किरकोळ विक्रेत्यांनी सांगितले. कॉटन मार्केट उपबाजारात सध्या ४५ ते ५० गाड्यांची आवक असल्याची माहिती महात्मा फुले सब्जी व फ्रूट मार्केट अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी सांगितले.

किरकोळमध्ये कांदे @ ५०ठोकमध्ये ४२ रुपये आणि किरकोळमध्ये ६० रुपयांवर गेलेले कांंद्याचे भाव सध्या कमी झाले असून, ठोकमध्ये दजार्नुसार ३० ते ३५ रुपये आणि किरकोळमध्ये ५० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. त्यानंतरही गृहिणींसाठी कांदे महागच आहेत. कळमना ठोक बाजारात दररोज २५ ट्रक कांद्याचे ट्रक येत आहेत. उन्हाळ्यात साठविलेल्या जुन्या कांद्याची आवक नाशिक आणि अहमदनगर तर थोडाफार जळगाव जिल्ह्यातून आणि नवीन कांदे कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्य व सातारा जिल्ह्यातून सुरू आहे.

नाशिक व धुळे जिल्ह्यातून नवीन कांद्याची आवक दिवाळीनंतर होणार आहे. दसऱ्यानंतर धुळे जिल्ह्यातून येणाऱ्या कांद्याला उशीर झाला आहे. पांढऱ्या कांद्याचे दोन ट्रक सोलापूर व अमरावती जिल्ह्यातून विक्रीला येत आहेत. अतिवृष्टीमुळे बराच कांदा शेतातच खराब झाला आहे. दोन आठवड्यापासून भाव वाढले आहेत. सध्या आवकीचा अंदाज बांधणे कठीण असून, आवकीनंतरच भाव कमी-जास्त होण्याची शक्यता कळमना आलू-कांदे अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी व्यक्त केली.कळमन्यात दजार्नुसार बटाट्याचे भाव १० ते १५ रुपये असून, किरकोळमध्ये भाव ३० रुपयांवर गेले आहेत. आठवड्यात सरासरी १८ ते २० ट्रकची आवक आहे. काही आठवड्यांपूर्वी कळमन्यात ९० ते १०० रुपयांवर गेलेले लसणाचे भाव सध्या ७० ते ८० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. मात्र, किरकोळमध्ये १४० ते १५० रुपयांपर्यंत भाव आहेत. दररोज दोन ट्रकची आवक राजस्थान (कोटा) आणि मध्य प्रदेश (मनसोर, जावरा) येथून आहे.

टॅग्स :vegetableभाज्या