शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे भाज्या कडाडल्या; कांदे, टोमॅटो ६० रुपये, कोथिंबीर १२० रुपये किलो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2021 07:30 IST

Nagpur News अतिवृष्टीमुळे भाज्यांचे नुकसान झाले असून, स्थानिक शेतकऱ्यांकडून आवक कमी झाल्याने भाव आकाशाला भिडले आहेत.

ठळक मुद्देदरवाढीमुळे गृहिणींचे बजेट वाढले दिवाळीनंतर भाव कमी होणार

नागपूर : अतिवृष्टीमुळे भाज्यांचे नुकसान झाले असून, स्थानिक शेतकऱ्यांकडून आवक कमी झाल्याने भाव आकाशाला भिडले आहेत. सध्या स्थानिकांकडून थोडीफार आवक सुरू झाल्याने काही भाज्यांचे भाव कमी झाले आहेत. पण किरकोळमध्ये कांदे, टोमॅटो, हिरवी मिरची ६० रुपये आणि कोथिंबीर १२० रुपये किलोवर गेले आहे. दिवाळीनंतर स्थानिक शेतकऱ्यांकडून आवक वाढल्यानंतर भाव कमी होणार असल्याचे ठोक विक्रेत्यांनी सांगितले.

स्थानिक उत्पादक शेतकऱ्यांसह टोमॅटो बेंगळुरू, हिरवी मिरची बुलडाणा व मौदा आणि कोथिंबीर नाशिक, नांदेड, उमरानाला येथून विक्रीला येत आहे. सिमला मिरचीची आवक भिलाई, रायपूर येथून आहे. फूलकोबीचे भाव ६० रुपये आहेत. पालक ७० ते ८० आणि मेथीचे भाव १२० रुपयांवर पोहोचले आहेत. ८० रुपये किलोचे वांगे सध्या ५० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत.

ग्राहक जास्त दराच्या भाज्यांची खरेदी करीत नसल्याचे किरकोळ विक्रेत्यांनी सांगितले. कॉटन मार्केट उपबाजारात सध्या ४५ ते ५० गाड्यांची आवक असल्याची माहिती महात्मा फुले सब्जी व फ्रूट मार्केट अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी सांगितले.

किरकोळमध्ये कांदे @ ५०ठोकमध्ये ४२ रुपये आणि किरकोळमध्ये ६० रुपयांवर गेलेले कांंद्याचे भाव सध्या कमी झाले असून, ठोकमध्ये दजार्नुसार ३० ते ३५ रुपये आणि किरकोळमध्ये ५० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. त्यानंतरही गृहिणींसाठी कांदे महागच आहेत. कळमना ठोक बाजारात दररोज २५ ट्रक कांद्याचे ट्रक येत आहेत. उन्हाळ्यात साठविलेल्या जुन्या कांद्याची आवक नाशिक आणि अहमदनगर तर थोडाफार जळगाव जिल्ह्यातून आणि नवीन कांदे कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्य व सातारा जिल्ह्यातून सुरू आहे.

नाशिक व धुळे जिल्ह्यातून नवीन कांद्याची आवक दिवाळीनंतर होणार आहे. दसऱ्यानंतर धुळे जिल्ह्यातून येणाऱ्या कांद्याला उशीर झाला आहे. पांढऱ्या कांद्याचे दोन ट्रक सोलापूर व अमरावती जिल्ह्यातून विक्रीला येत आहेत. अतिवृष्टीमुळे बराच कांदा शेतातच खराब झाला आहे. दोन आठवड्यापासून भाव वाढले आहेत. सध्या आवकीचा अंदाज बांधणे कठीण असून, आवकीनंतरच भाव कमी-जास्त होण्याची शक्यता कळमना आलू-कांदे अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी व्यक्त केली.कळमन्यात दजार्नुसार बटाट्याचे भाव १० ते १५ रुपये असून, किरकोळमध्ये भाव ३० रुपयांवर गेले आहेत. आठवड्यात सरासरी १८ ते २० ट्रकची आवक आहे. काही आठवड्यांपूर्वी कळमन्यात ९० ते १०० रुपयांवर गेलेले लसणाचे भाव सध्या ७० ते ८० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. मात्र, किरकोळमध्ये १४० ते १५० रुपयांपर्यंत भाव आहेत. दररोज दोन ट्रकची आवक राजस्थान (कोटा) आणि मध्य प्रदेश (मनसोर, जावरा) येथून आहे.

टॅग्स :vegetableभाज्या