शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; ‘ऑरेंज अलर्ट’ जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2022 21:48 IST

Nagpur News भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यात ११ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. मंगळवारी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, यादिवशी अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे.

ठळक मुद्देवादळी वारा, तसेच वीज पडण्याची शक्यता धरणे, नदी, नाले पूर्ण क्षमतेने भरून वाहताहेत

नागपूर : भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यात ११ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. मंगळवारी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, यादिवशी अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. या कालावधीमध्ये पावसासोबतच वादळी वारा व वीज पडण्याची शक्यतादेखील भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे.

जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. आणखी काही दिवस असाच पाऊस राहील. वादळ वाऱ्यासह वीज पडण्याची शक्यताही आहे. धरणे, नदी, नाले पूर्ण क्षमतेने भरून वाहताहेत. त्यामुळे आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यारी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नागरिकांना काहीही त्रास असल्यास किंवा मदतीसाठी नागपूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय येथे नियंत्रण कक्ष २५६२६६८ यावर, तसेच टोल फ्री क्र. १०७७ वर संपर्क साधावा.

- चौरई धरण भरले, पुराचा धोका

पेंच नदीवरील मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात असलेले चौरई धरणदेखील ८५ टक्के भरले असून, या कालावधीमध्ये छिंदवाडा जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १० ऑगस्ट रोजी रेड अलर्ट देण्यात आला आहे. या कारणास्तव या कालावधीमध्ये चौरई धरणातून पाण्याचा अतिविसर्ग होऊन तोतलाडोह व नवेगाव खैरी या धरणामध्ये अधिक पाणी येऊन पेंच व कन्हान नदीला मोठा पूर येण्याची शक्यता आहे. सद्य:स्थितीत नागपूर जिल्ह्यातील मोठे धरण तोतलाडोह-८८ टक्के, नवेगाव खैरी-९९ टक्के, खिंडसी-९६ टक्के, वडगाव-१०० टक्के क्षमतेने भरलेले आहे. मध्यम प्रकल्पात वेणा, कान्होली बारा, पांढराबोडी, मकरधोकडा, सायकी, चंद्रभागा, मोरधाम, केसरनाला, उमरी, कोलार, खेकडानाला व जाम हे १०० टक्के भरलेले असून, या ठिकाणी सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तसेच जिल्ह्यातील जवळपास सर्वच लघु प्रकल्प १०० टक्क्यांनी भरलेले असून, त्या ठिकाणीदेखील सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

टॅग्स :Rainपाऊस