शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विभागातील २१ तालुक्यांत अतिवृष्टी : हजारो कुटुंब बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 21:50 IST

विभागात मागील २४ तासांत नागपूर, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यातील २१ तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली असून, सर्वाधिक पावसाची नोंद नागपूर शहर व ग्रामीणमध्ये २८२ मि. मी. झाली आहे. विभागात सरासरी ६०.४ टक्के मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसात नागपुरातील गामीण भागाला सर्वाधिक फटका बसला. हजारो कुटुंब पाण्यात अडकली. जिल्हा प्रशासन, राज्य आपत्ती बचाव पथक (एसडीआरएफ) आणि अग्निशमन विभागाने संयुक्तपणे मदतकार्य राबवून पाण्यात अडकलेल्या हजारो लोकांना सुरक्षितस्थळी पोहोचविण्यात आले. आता जनजीवन पूर्वपदावर आले आहे.

ठळक मुद्देजनजीवन पूर्वपदावर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विभागात मागील २४ तासांत नागपूर, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यातील २१ तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली असून, सर्वाधिक पावसाची नोंद नागपूर शहर व ग्रामीणमध्ये २८२ मि. मी. झाली आहे. विभागात सरासरी ६०.४ टक्के मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसात नागपुरातील गामीण भागाला सर्वाधिक फटका बसला. हजारो कुटुंब पाण्यात अडकली. जिल्हा प्रशासन, राज्य आपत्ती बचाव पथक (एसडीआरएफ) आणि अग्निशमन विभागाने संयुक्तपणे मदतकार्य राबवून पाण्यात अडकलेल्या हजारो लोकांना सुरक्षितस्थळी पोहोचविण्यात आले. आता जनजीवन पूर्वपदावर आले आहे.विभागात मागील २४ तासात जिल्हानिहाय झालेल्या पावसामध्ये नागपूर जिल्ह्यात सरासरी १३२.६१, वर्धा ६१.०५, भंडारा ३३.३७, चंद्रपूर ९२.२७, गोंदिया १९.२७ तर गडचिरोली जिल्ह्यात २१.५४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक नागपूर जिल्ह्यात १० तालुक्यात ६५ मि.मी पेक्षा जास्त पाऊस झाला असून, यामध्ये हिंगणा तालुक्यात २७२.७०, सावनेर ११६.४०, रामटेक १७०.४०, पारशिवनी १९३, मौदा ९०, उमरेड १३१.४०, कुही १००.६०, कामठी ८४.८०, कळमेश्वर ६२ तर काटोल १८.२०, नरखेड ३२, भिवापूर १९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. वर्धा जिल्ह्यातील तीन तर चंद्रपूर जिल्ह्यातील सात तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे.अतिवृष्टीमुळे हिंगणा तालुक्यातील १५ गावांतील ३ हजार ४५० कुटुंब बाधित झाले असून, ९४५ बाधित घरांचा समावेश आहे. काल पडलेल्या अतिवृष्टीमुळे ४८० कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले होते. यामध्ये तुरकमारी, वडगाव, विरुळ, इरमिती, रायपूर, टाकळघाट, सुपरीबेला आदी गावांचा समावेश होता. जिल्हा प्रशासनाने या गावांमध्ये बाधित कुटुंबांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली आहे.नागपूर ग्रामीणमधील पुरामुळे २० गावे बाधित झाली असून, २८४ बाधित कुटुंबे आहेत. तसेच २८४ घरे बाधित झाले असून, ३९ कुटुंबांना

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर