शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

नागपुरात खूप फुटले फटाके, भरपूर झाले प्रदूषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 20:51 IST

शहरात सुरू असलेल्या विकासकामामुळेच वातावरणात प्रदूषणाची मात्रा वाढली आहे. अशात दिवाळीत फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांमुळे प्रदूषणाच्या टक्केवारीत निश्चितच वाढ झाली आहे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाच ठिकाणी एअर क्वालिटी मॉनिटरींग करण्यात आले. पण त्याचे आकडे प्रसिद्ध करण्यात आले नाही. मात्र दरवर्षी फटाक्यांच्या विरोधात मोहीम राबविणाऱ्या काही पर्यावरणप्रेमी संस्थांनी दिवाळीच्या रात्रीला अनुभवलेल्या वातावरणानुसार खूप फटाके फुटले, भरपूर प्रदूषण झाले, असे मत व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देप्रदूषण मंडळाकडे डाटा नाही : तज्ज्ञांच्या मते वातावरण झाले प्रदूषित न्यायालयाच्याही निर्देशाचे झाले उल्लंघन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात सुरू असलेल्या विकासकामामुळेच वातावरणात प्रदूषणाची मात्रा वाढली आहे. अशात दिवाळीत फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांमुळे प्रदूषणाच्या टक्केवारीत निश्चितच वाढ झाली आहे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाच ठिकाणी एअर क्वालिटी मॉनिटरींग करण्यात आले. पण त्याचे आकडे प्रसिद्ध करण्यात आले नाही. मात्र दरवर्षी फटाक्यांच्या विरोधात मोहीम राबविणाऱ्या काही पर्यावरणप्रेमी संस्थांनी दिवाळीच्या रात्रीला अनुभवलेल्या वातावरणानुसार खूप फटाके फुटले, भरपूर प्रदूषण झाले, असे मत व्यक्त केले आहे.

गेल्या दोन वर्षात दिवाळी उत्सवात प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीत दिवाळीच्या पूर्वी नोंदविण्यात आलेल्या एअर क्वालिटी इंडेक्स आणि दिवाळीत घेण्यात आलेल्या नोंदीमध्ये भरपूर तफावत दिसून आली. २०१६ मध्ये एअर क्वालिटी इंडेक्स ८९ वरून दिवाळीच्या काळात १३८ पर्यंत पोहचला होता, तर २०१७ मध्ये १३५ वरून दिवाळीच्या काळात १८२ पर्यंत पोहचला होता. एअर क्वालिटी इंडेक्सचा आकडा २०० च्या वर गेल्यास प्रदूषणाची स्थिती गंभीर होते. गेल्यावर्षी दिवाळीत एअर क्वालिटी इंडेक्स नियंत्रित होता. पण यावर्षी मोठ्या प्रमाणात फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे व शहरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे नागपूरच्या प्रदूषणाची स्थिती गंभीर नक्कीच राहील, असे पर्यावरण तज्ज्ञांना वाटते आहे. 
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिवाळीच्या दिवशी दुपारी ४ पर्यंतच्या आकडेवारीनुसार जाहीर केलेल्या पोल्युशन बुलेटिनमध्ये नागपूर नियंत्रणात असल्याचा खुलासा केला आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीला खऱ्या अर्थाने सायंकाळी ६ नंतर सुरुवात झाली आणि रात्री उशिरापर्यंत ती सुरू होती. त्यामुळे रात्री १० नंतर शहरातील मुख्य रस्त्यांवर धुके दाटल्याचे चित्र होते. डोळे झोंबत असल्याचे अनेकांनी अनुभवले. सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्यासाठी काही अवधी बांधून दिला होता. परंतु सकाळी जेव्हा शहरातील काही भागांचा आढावा घेतला, तेव्हा घराघरांसमोर पडलेल्या फटाक्यांच्या कचऱ्यांवरून फटाके किती फुटले याचा अंदाज नक्कीच येत होता. 
 रस्त्यावरील जनावरे झाली गायबएरवी रात्री उशिरा शहरातील मुख्य रस्त्यांवर कुत्र्यांचा घोळका दिसून येतो. मोकाट जनावरेही रस्त्याच्या मध्ये बसलेली दिसतात. परंतु दिवाळीच्या दिवशी रात्री उशिरा शहरातली मुख्य रस्त्यांवर एक कुत्रा सुद्धा दिसून आला नाही. रस्त्यावर बसलेली मोकाट जनावरेसुद्धा दिसली नाही. फटाक्यांमुळे होते तीन प्रकारचे प्रदूषणफटाक्यांचे आवाजावर निर्बंध घातल्यानंतरही ध्वनिप्रदूषणाचा मोठा तडाखा रहिवाशी वस्त्यांमध्ये तसेच व्यापारी पेठेमध्ये बसला. वायुप्रदूषण घराबाहेर पडल्यावर जाणवतच होते. वायुप्रदूषण सर्वात घातक प्रदूषण आहे. ज्यात कॅडियम, झिंक, कॉपर, मॅगनिज, पोटॅशियमसारखे हेवी मेटल वातावरणात मिसळतात. आॅक्साईड आॅफ सल्फर व फॉस्फरस फटाक्यामुळे पसरतो. त्याचे परिणाम मानवाबरोबरच पशु आणि पक्ष्यांनाही जाणवतात. तिसरे म्हणजे सॉलिड वेस्ट सकाळी उठल्यावर घराघरापुढे फटाक्यांचा कचरा सांडला असतो. तो सुद्धा घातक असतो. शहरातील प्रदूषणाची आकडेवारी महामंडळाकडे नाही 
महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळ शहरातील पाच ठिकाणी प्रदूषणाची नोंद करते. यात सिव्हिल लाईन येथील त्यांचे कार्यालय, उत्तर अंबाझरी मार्ग, सदर, हिंगणा टी-पॉर्इंट व विभागीय आयुक्त कार्यालय. मंडळाच्या वेबसाईटवर आॅक्टोबर महिन्यापर्यंतचा डाटा या पाच ठिकाणचा दिला आहे. हे पाच ठिकाण म्हणजे संपूर्ण शहर नाही. उलट या पाच ठिकाणांपेक्षा पुलापलीकडील भागात जसे महाल, इतवारी, गांधीबाग, सक्करदरा, मेडिकल, म्हाळगीनगर, मनीषनगर, खरबी, कळमना, वाठोडा, नंदनवन या भागात तुलनेत जास्त फटाके फोडले जातात. हा रहिवासी परिसर असल्याने, दाटीवाटीने घरे असल्याने फटाक्यांची तीव्रता येथे जास्त जाणवते. पण या भागातून प्रदूषणाची आकडेवारी महामंडळाच्या माध्यमातून मिळत नाही. संपूर्ण शहरात प्रदूषणाची नोंद करायची असेल, तर किमान २० ठिकाणी मंडळाला यंत्रणा उभी करावी लागेल. 
 जनजागृती आणि कारवाईची गरजवातावरणात प्रदूषण वाढल्याने सर्वोच्च न्यायालयाने याची गंभीर दखल घेतली आहे. न्यायालयाने फटाके फोडण्याची वेळही बांधून दिली आहे. पण अंमलबजावणी झाली नाही. गेल्या दोन वर्षात नागपूरचा एअर क्वॉलिटी इंडेक्स नियंत्रण रेषेच्या पलीकडे गेल्याचे दिसते आहे. शहरात सुरू असलेल्या बांधकामामुळे प्रदूषण वाढले आहे. त्यात आता दिवाळीच्या फटाक्यांची भर पडल्याने, ते नियंत्रण रेषेच्या पलीक डे गेले आहे. प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी खऱ्या अर्थाने नागरिकांमध्ये जाणीव होणे आवश्यक आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती व कारवाई होण्याची गरज आहे.कौस्तुभ चॅटर्जी, समन्वयक, ग्रीन विजिल पर्यावरणवादी संस्था

 

टॅग्स :Crackersफटाकेpollutionप्रदूषण