शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

मान्सूनच्या प्रतिक्षेत उकाड्याचा त्रास; दमट वातावरणाने चिडचिड 

By निशांत वानखेडे | Updated: June 10, 2023 19:01 IST

Nagpur News मान्सूनपूर्व आर्द्रतेत झालेली वाढ आणि त्यात सूर्याचा पारा चढलेलाच असताना किरणांना राेखणाऱ्या ढगांचा अडथळा नसल्याने मुंबईसारख्या दमट वातावरणाचा अनुभव सध्या विदर्भवासियांना येत आहे.

निशांत वानखेडेनागपूर : मान्सूनपूर्व आर्द्रतेत झालेली वाढ आणि त्यात सूर्याचा पारा चढलेलाच असताना किरणांना राेखणाऱ्या ढगांचा अडथळा नसल्याने मुंबईसारख्या दमट वातावरणाचा अनुभव सध्या विदर्भवासियांना येत आहे. पारा सरासरीपेक्षा ३ ते ४ अंशाने वाढलेला असल्याने हाेणाऱ्या उकाड्याने नागरिकांची चिडचिड हाेत आहे.

सूर्यकिरणांच्या जमिनीवर ओतल्या जाणाऱ्या सध्याच्या उष्णतेमुळे दुपारच्या कमाल तापमानात कमालीची वाढ झाली आहे. जून महिन्यात सरासरी ३८ अंश कमाल तापमान असते. मात्र सध्या नागपूरसह विदर्भातील बहुतेक शहरांचे तापमान ४१ अंशाच्या वर आहे. नागपूरला शनिवारी ४२.७ अंश तापमानाची नाेंद झाली, जी सरासरीपेक्षा ३ अंशाने अधिक आहे. गाेंदियामध्ये सर्वाधिक ४३.४ अंशावर पारा गेला, जाे ४.२ अंशाने अधिक आहे. अमरावती, अकाेल्यात ४२ व ४२.८ अंशावरील कमाल तापमान ५.२ व ४.२ अंशाने अधिक आहे. चंद्रपूर ४२.६ अंश तर गडचिराेलीत ४२.२ अंशावर पारा आहे. रात्रीचे तापमानही सरासरीपेक्षा २ ते ३ अंशाने अधिक आहे.

सध्या घोषित झाली नसली तरी विदर्भात नकळत उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती आहे आणि हेच मुख्य कारण असुन १५ जून पर्यंत अशीच स्थिती असु शकते. विदर्भात मान्सूनचे आगमन व्हायला अजून १०-१२ दिवसाचा कालावधी आहे. साधारणत: २० ते २२ जूनपर्यंत पारा चढलेला व उकाडा वाढविणारा असताे. यंदा पारा चढलेला असला तरी २०२१ वगळता मागील १० वर्षात जूनमध्ये गेलेल्या तापमानापेक्षा ताे कमीच आहे. २०१४ साली ताे ४७.३ अंश, २०१५ मध्ये ४६.५ अंश, २०१९ साली ४७.२ अंश तर २०२२ साली सर्वाधिक ४६.२ अंश तापमानाची जूनमध्ये नाेंद झाली हाेती. यंदा उन्हाळ्याचे बहुतेक दिवस पावसात किंवा ढगाळ वातावरणात गेले असले तरी सर्वांना मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा लागलेली आहे.

टॅग्स :weatherहवामान