शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

चक्क कन्याकुमारीहून वाराणसीकडे पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 08:38 IST

आईवडिलांचे पिंडदान करण्यासाठी ते रामेश्वरमला गेले होते. तेथून २० मार्च रोजी कन्याकुमारीला गेले. २३ मार्चला परतीचा प्रवास होता. परंतु लॉकडाऊनमुळे रेल्वेगाडी रद्द झाली. त्यांना तिकिटाचे पैसे तर परत मिळाले, मात्र कन्याकुमारी स्थानकावर दुर्दैव आडवे आले.

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : घरापासून हजारो किलोमीटर दूर असताना अचानक ‘लॉकडाऊन’चा पहिला झटका बसला. त्यानंतर काही कालावधीतच चोरांनी दुसरा धक्का दिला. ना फोन ना खिशात पैसे. आजारी पत्नी कशी असेल या चिंतेने अखेर त्यांनी एक मोठा निर्णय घेतला अन् पायीच प्रवास सुरू केला. वाटेत भुकेने वेळोवेळी छळले, पायांचे ठोकळे झाले, अगदी जीवच सोडून जातो की काय अशी अवस्था झाली. मात्र जिद्द कायम होती. अखेर मजलदरमजल करत नागपूरला पोहोचला अन् येथून पुढील प्रवासासाठी आशेचा किरण मिळाला. चक्क कन्याकुमारीहून वाराणसीकडे जाण्यासाठी हजारो किलोमीटरची पदयात्रा करणाऱ्याच्या डोळ्यातील अश्रू हेलावून टाकणारे होते.पांजरी येथील टोलनाक्याजवळ विविध राज्यातील मजूर, कामगार जमा होत आहेत. येथून दुसऱ्या राज्याकडे जाणाऱ्या ट्रक्स, बसेसमध्ये व्यवस्था होण्याची आशा त्यांना असते. संबंधित व्यक्तीदेखील शनिवारी नागपुरात दाखल झाली. सुरुवातीला एखादा कामगार असावा असे सेवाभाव करणाऱ्या कार्यकर्त्यांना वाटले. मात्र जेव्हा तो इंग्रजीत संभाषण करु लागला तेव्हा वास्तव समोर आले. नाव समोर येऊ देऊ नका ही विनंती करत त्यांनी त्याच्यावर आलेली आपबिती सांगितली.आईवडिलांचे पिंडदान करण्यासाठी ते रामेश्वरमला गेले होते. तेथून २० मार्च रोजी कन्याकुमारीला गेले. २३ मार्चला परतीचा प्रवास होता. परंतु लॉकडाऊनमुळे रेल्वेगाडी रद्द झाली. त्यांना तिकिटाचे पैसे तर परत मिळाले, मात्र कन्याकुमारी स्थानकावर दुर्दैव आडवे आले. चोरांनी बॅगच चोरी केली व त्यातील आधार कार्ड, पैसे, कार्ड, मोबाईल सर्वच चोरी गेले. अशा स्थितीत डोळ्यासमोर अंधारीच आली. मात्र घरी जायचा निश्चय केला. कन्याकुमारीहून त्यांनी पायीच प्रवास केला. प्रवासात त्यांना जागोजागी स्थलांतरित कामगार भेटत होते. तेथून नागरकॉईल, त्रिवेंद्रम, कोचीन, पालकड, कोईम्बतुर, बंगळुरु, हैदराबाद असा त्यांनी पायी प्रवास करत ते शनिवारी नागपूरला पोहोचले.अन् उत्तर प्रदेशकडे झाले रवानानागपुरात पांजरी येथील टोलनाक्यावर संघ स्वयंसेवक व स्थानिक नागरिकांकडून सुरू असलेल्या सेवाकार्यात त्यांची भोजनाची सोय झाली व स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनच्या चमूकडून उपचारदेखील झाले. रविवारी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस होत असतानाच नेमके एक वाहन परवानगीने अलाहाबादकडे निघाले होते. त्यात संंबंधित व्यक्तीची व्यवस्था झाली. खऱ्या अर्थाने नागपूरने मला आशेचा किरण दाखविला, अशी भावना व्यक्त करताना त्यांचे डोळे पाणावले होते.तेलंगणा, महाराष्ट्रात जास्त आपुलकीमला २०१८ साली क्षयरोगदेखील झाला होता. कन्याकुमारीहून शेकडो किलोमीटर पायी चालल्यानंतर कफचा त्रास व्हायला लागला. धाप लागल्यावर काही काळ विश्रांती घ्यायचो. मात्र त्रिवेंद्रमला पोलिसांनी यासाठी मारले. बसू नका केवळ चालत रहा असे पोलिसांचे म्हणणे होते, असे त्यांनी सांगितले. वाटेत शेतकऱ्यांचे व लहानलहान गावातील लोकांचे सहकार्य झाले. तेलंगणा व महाराष्ट्रात जास्त आपुलकी दिसून आली, असेदेखील त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस