शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

चक्क कन्याकुमारीहून वाराणसीकडे पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 08:38 IST

आईवडिलांचे पिंडदान करण्यासाठी ते रामेश्वरमला गेले होते. तेथून २० मार्च रोजी कन्याकुमारीला गेले. २३ मार्चला परतीचा प्रवास होता. परंतु लॉकडाऊनमुळे रेल्वेगाडी रद्द झाली. त्यांना तिकिटाचे पैसे तर परत मिळाले, मात्र कन्याकुमारी स्थानकावर दुर्दैव आडवे आले.

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : घरापासून हजारो किलोमीटर दूर असताना अचानक ‘लॉकडाऊन’चा पहिला झटका बसला. त्यानंतर काही कालावधीतच चोरांनी दुसरा धक्का दिला. ना फोन ना खिशात पैसे. आजारी पत्नी कशी असेल या चिंतेने अखेर त्यांनी एक मोठा निर्णय घेतला अन् पायीच प्रवास सुरू केला. वाटेत भुकेने वेळोवेळी छळले, पायांचे ठोकळे झाले, अगदी जीवच सोडून जातो की काय अशी अवस्था झाली. मात्र जिद्द कायम होती. अखेर मजलदरमजल करत नागपूरला पोहोचला अन् येथून पुढील प्रवासासाठी आशेचा किरण मिळाला. चक्क कन्याकुमारीहून वाराणसीकडे जाण्यासाठी हजारो किलोमीटरची पदयात्रा करणाऱ्याच्या डोळ्यातील अश्रू हेलावून टाकणारे होते.पांजरी येथील टोलनाक्याजवळ विविध राज्यातील मजूर, कामगार जमा होत आहेत. येथून दुसऱ्या राज्याकडे जाणाऱ्या ट्रक्स, बसेसमध्ये व्यवस्था होण्याची आशा त्यांना असते. संबंधित व्यक्तीदेखील शनिवारी नागपुरात दाखल झाली. सुरुवातीला एखादा कामगार असावा असे सेवाभाव करणाऱ्या कार्यकर्त्यांना वाटले. मात्र जेव्हा तो इंग्रजीत संभाषण करु लागला तेव्हा वास्तव समोर आले. नाव समोर येऊ देऊ नका ही विनंती करत त्यांनी त्याच्यावर आलेली आपबिती सांगितली.आईवडिलांचे पिंडदान करण्यासाठी ते रामेश्वरमला गेले होते. तेथून २० मार्च रोजी कन्याकुमारीला गेले. २३ मार्चला परतीचा प्रवास होता. परंतु लॉकडाऊनमुळे रेल्वेगाडी रद्द झाली. त्यांना तिकिटाचे पैसे तर परत मिळाले, मात्र कन्याकुमारी स्थानकावर दुर्दैव आडवे आले. चोरांनी बॅगच चोरी केली व त्यातील आधार कार्ड, पैसे, कार्ड, मोबाईल सर्वच चोरी गेले. अशा स्थितीत डोळ्यासमोर अंधारीच आली. मात्र घरी जायचा निश्चय केला. कन्याकुमारीहून त्यांनी पायीच प्रवास केला. प्रवासात त्यांना जागोजागी स्थलांतरित कामगार भेटत होते. तेथून नागरकॉईल, त्रिवेंद्रम, कोचीन, पालकड, कोईम्बतुर, बंगळुरु, हैदराबाद असा त्यांनी पायी प्रवास करत ते शनिवारी नागपूरला पोहोचले.अन् उत्तर प्रदेशकडे झाले रवानानागपुरात पांजरी येथील टोलनाक्यावर संघ स्वयंसेवक व स्थानिक नागरिकांकडून सुरू असलेल्या सेवाकार्यात त्यांची भोजनाची सोय झाली व स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनच्या चमूकडून उपचारदेखील झाले. रविवारी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस होत असतानाच नेमके एक वाहन परवानगीने अलाहाबादकडे निघाले होते. त्यात संंबंधित व्यक्तीची व्यवस्था झाली. खऱ्या अर्थाने नागपूरने मला आशेचा किरण दाखविला, अशी भावना व्यक्त करताना त्यांचे डोळे पाणावले होते.तेलंगणा, महाराष्ट्रात जास्त आपुलकीमला २०१८ साली क्षयरोगदेखील झाला होता. कन्याकुमारीहून शेकडो किलोमीटर पायी चालल्यानंतर कफचा त्रास व्हायला लागला. धाप लागल्यावर काही काळ विश्रांती घ्यायचो. मात्र त्रिवेंद्रमला पोलिसांनी यासाठी मारले. बसू नका केवळ चालत रहा असे पोलिसांचे म्हणणे होते, असे त्यांनी सांगितले. वाटेत शेतकऱ्यांचे व लहानलहान गावातील लोकांचे सहकार्य झाले. तेलंगणा व महाराष्ट्रात जास्त आपुलकी दिसून आली, असेदेखील त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस