शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
9
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
10
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
11
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
12
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
13
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
14
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
15
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
16
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
17
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
18
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
19
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
20
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा

तो क्रूरकर्मा रात्रभर मर्डरच करत सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:07 IST

नरेश डोंगरे । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - कितीही राग आला तरी तो तास-दोन तासानंतर शांत होतो. आप्तांचे रक्त ...

नरेश डोंगरे ।

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - कितीही राग आला तरी तो तास-दोन तासानंतर शांत होतो. आप्तांचे रक्त पाहून व्यक्ती पश्चात्तापाच्या आगीत जळतो. मात्र, क्रूरकर्मा आलोक माटूरकरच्या मनात क्रोधाग्नी अशी काही भडकली होती की तो रात्रभर इकडून तिकडे मर्डरच करत सुटला. हे भयंकर आक्रित सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास उघड झाले अन् पाचपावलीतील चिमाबाईपेठमधील रहिवासी शहारले. काळरात्रीची कुणालाच कशी कल्पना आली नाही, असा सवाल ते एकमेकांना विचारू लागले. लोकमतने या परिसरातील रहिवासी, आलोकचे नातेवाईक यांना बोलते केले. पोलिसांकडूनही प्राथमिक तपासानंतरचा निष्कर्ष जाणून घेतला अन् काळीज कापणारी पार्श्वभूमी पुढे आली.

१५ वर्षांपूर्वी पळून जाऊन प्रेमविवाह केल्याने स्वकीयांनी आलोकला बहिष्कृत केल्यासारखे केले होते. त्याची पर्वा न करता त्याने कष्टातून संसार फुलवला होता. त्याचे पत्नी विजयावर खूप प्रेम होते. मुलगा आणि मुलगी तर त्याला जीव की प्राणच वाटायचे. मेव्हणीवरही त्याचा तेवढाच जीव होता. नातेवाईकांसोबत तो सरळसाधेपणाने वागायचा. बरेच वर्षे त्याच्यासोबत आप्तांपैकी अनेक जण बोलत नव्हते. त्याची पर्वा न करता त्याने आपला व्यवसाय वाढवला. संसारवेलही फुलविली. मुलगी परी आणि मुलगा साहिलला तो फुलासारखा जपायचा. त्याचे वागणे सरळसाधे होते. असे असताना त्याने हे आक्रित घडवलेच कसे, त्याने या सर्वांनाच एवढ्या निर्दयपणे मारलेच कसे, असे प्रश्न नातेवाईकांना पडले आहेत.

नातेवाईकांच्या या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, या थरारकांडाला अनैतिक संबंध, आलोकची शरीरसंबंधाबाबतची विकृती आणि अन् त्यातून निर्माण झालेली परिस्थिती कारणीभूत असल्याचे पुढे आले.

--

((१))

त्याचा हस्तक्षेप अन् तिचा त्वेष

आलोकच्या लग्नाच्या वेळी त्याची मेव्हणी आमिषा केवळ ५ ते ७ वर्षांची होती. ती वयात येण्यापूर्वीपासूनच आलोककडे राहायची. या दोघांनी अनैतिक संबंधातून सर्व मर्यादा तोडल्या. मात्र, दुप्पट वयाचे भावजीसोबत ती रमणे शक्य नव्हते. तिने अनेक मित्र बनविले. त्यामुळे याचा क्रोध, हस्तक्षेप वाढत गेला. मारहाणीपर्यंत प्रकरण गेले. तो हक्क दाखवू लागल्याने ती त्वेषात आली.

----

((२))

अन् भडका उडाला

रविवारी रात्री ११.१५ च्या सुमारास तिने आपल्या मित्राला फोन करून त्याला आवर अन्यथा परिणाम गंभीर होतील, असे सांगून टाकले. त्यानंतर सासू आलोकच्या घरी पोहचली. तेथे त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले अन् त्याच्या संतापाचा भडका उडाला. पत्नीने त्याला आमिषाच्या जीवनात ढवळाढवळ कशाला करतो, असे विचारले अन् भडका उडाला. त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. आमिषाच याला कारणीभूत असल्याचे त्याच्या डोक्यात गेले अन् एक भयंकर घटनाक्रमाची सुरुवात झाली.

---

((३))

बलात्कार करून केली हत्या

आरोपी आलोक सासऱ्याच्या घरी पोहचला. त्याच्याकडे धारदार शस्त्र असल्याचे पाहून शरणागती पत्करलेल्या आमिषावर त्याने बलात्कार केला, नंतर तिचा गळा कापला. अर्धनग्न अवस्थेत आमिषाचा मृतदेह सोडून तो निघण्याच्या तयारीत असतानाच सासू बाहेरून दारावर धडकली. त्यामुळे त्याने सासूचीही गळा कापून हत्या केली.

---

((३))

क्रूरकर्मा घरी परतला

मध्यरात्रीनंतर त्याने पत्नीसोबत जबरदस्तीने शय्यासोबत करण्याचा प्रयत्न केला. रक्ताने माखलेले कपडे बघून तिने नकार दिल्यामुळे, त्याने विजयाचा धारदार शस्त्राने गळा चिरला. तिने किंकाळी फोडल्याने मुले जागी झाली. परीने विरोध केला असावा. त्यामुळे त्याने तिचे हातपाय बांधले. तरीदेखील तिचा विरोध सुरू असल्यामुळे डोक्यावर हातोडा हाणून तिलाही रक्ताच्या थारोळ्यात लोळविले आणि आता मुलालाच कशाला ठेवायचे म्हणून त्याने त्याच्या तोंडावर उशी दाबून त्यालाही संपविले. पोलिसांनी परिस्थितीजन्य पुरावे आणि प्राथमिक तपासावरून हा निष्कर्ष काढला आहे.

---

ते आले अन् ...

सुमारे ५० वर्षे जुन्या नारायणराव निमजे चाळीत वृद्ध देवीदास बोबडे दुसऱ्या माळ्यावर एका छोट्याशा खोलीत भाड्याने राहतात. बाजूला राऊत आणि अन्य एक परिवार तर खाली निमजे परिवार राहतो. बोबडे सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात. रविवारी रात्री ते कामावर निघून गेले. पोलिसांच्या मते, त्यांना दारूचे भारी व्यसन आहे. सकाळी ११.३० च्या सुमारास टुन्न होऊन ते घरात शिरले. पत्नी आणि मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडून असतानादेखील त्यांचे त्याकडे लक्ष गेले नाही. पोलीस घरी आल्यानंतर त्यांची नशा उतरली.

---