शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

सकाळी पेपर वाटून घेतली झेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 10:10 IST

घरात आई नाही. मजुरी करणारे वडीलच दोन वेळचे जेवण तयार करतात. शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी पहाटे ५ वाजता उठून वृत्तपत्रे वाटतो, तर दुपारी बिग बाजाारमधील वडापावच्या दुकानात काम करतो.

ठळक मुद्देअंकितला व्हायचेय अभियंता हलाखीच्या परिस्थितीवर मात

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मोडकळीस आलेली झोपडी. सोईच्या नावाने केवळ एक ट्युबलाईट, दोन प्लास्टिकच्या खुर्च्या. घरात आई नाही. मजुरी करणारे वडीलच दोन वेळचे जेवण तयार करतात. शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी पहाटे ५ वाजता उठून वृत्तपत्रे वाटतो, तर दुपारी बिग बाजाारमधील वडापावच्या दुकानात काम करतो. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करीत त्याने बारावीत ८८ टक्के गुण घेतले. अंकित सिद्धार्थ पाटील त्या विद्यार्थ्याचे नाव. राजाबाक्षा येथील पं. बच्छराज कनिष्ठ महाविद्यालयाचा तो विद्यार्थी आहे.बुधवारी बारावीचा निकाल समोर येताच पास झालेल्या मुलांचा एक वेगळा थाट सर्वत्र दिसून आला. कुणी त्यांना पेढे भरवित होते, कुणी हारतुरे देऊन शुभेच्छा देत होते, कुणी त्यांच्या नवनवीन मागण्या पूर्ण करीत होते तर कुणी त्यांच्यासाठी काय करू, काय नको यासाठी झटत होते. परंतु अंकितला ८८ टक्के गुण मिळवूनही त्याचे कौतुक करणारे कुणीच नव्हते. नेहमीप्रमाणे तो आपल्या बिग बाजार येथील वडापावच्या दुकानात कामावर हजर होता. निकाल पाहण्यासाठी त्याने दुपार नंतर सुटी घेतली होती. मित्रांच्या मोबाईलमधून निकाल पाहताच त्याचेच त्याला आश्चर्य वाटले. कारण अपेक्षेपेक्षा जास्त गुण मिळाले होते.अंकितची भेट त्याच्या घरी झाली. त्याला बोलते केल्यावर तो म्हणाला, पाचवीत असताना आई घर सोडून निघून गेली. वडील वेल्डिंगची कामे करतात. परंतु रोज काम मिळतेच असे नाही. दोन वेळचा स्वयंपाक तेच करतात. मोठे वडील अशोक पाटील यांच्यामुळेच पं. बच्छराज शाळेत प्रवेश मिळाला. त्यांनीच शिकवणी वर्गाचा व वह्यापुस्तकांचा खर्च उचलला. अभ्यासात शाळेतील शिक्षकांचीही मोठी मदत झाली. विशेषत: अंजली तिजारे या शिक्षकेने बारावीच्या प्रश्नपत्रिका घेण्यास आर्थिक मदत केली. या सर्वांच्या मदतीमुळेच हे यश गाठता आले. दहावीत ९० टक्के गुण होते. परंतु गेल्या दोन वर्षांपासून अंथरुणावर असलेली आजी आणि गणिताचा पेपरच्यावेळी तिचे झालेले निधन यामुळे कमी गुण मिळणार हे अपेक्षित होते, परंतु जास्तच मिळाले, असे म्हणून भावूक झालेला अंकित म्हणाला, खूप मेहनत घ्यायची तयारी आहे सर, याच बळावर अभियंता होण्याचे स्वप्न बाळगून आहे. घरची स्थिती पाहता हे कठीण असले तरी अशक्य नाही, असा विश्वास आहे.

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८