शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

हेरिटेज कस्तुरचंद पार्कच्या संवर्धनासाठी नियम निश्चित केले का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 19:44 IST

प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दुरवस्था झालेल्या सिव्हिल लाईन्स येथील हेरिटेज कस्तुरचंद पार्कच्या संरक्षण व संवर्धनाकरिता विशेष नियम तयार केले का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महानगरपालिकेला केली.

ठळक मुद्देहायकोर्टाची मनपाला विचारणा : ७ ऑक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दुरवस्था झालेल्या सिव्हिल लाईन्स येथील हेरिटेज कस्तुरचंद पार्कच्या संरक्षण व संवर्धनाकरिता विशेष नियम तयार केले का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महानगरपालिकेला केली. तसेच, यावर ७ ऑक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते परमजितसिंग अहुजा यांनी या प्रकरणात मध्यस्थी अर्ज दाखल करून हेरिटेज संवर्धन नियमानुसार हेरिटेजच्या संरक्षण व संवर्धनाकरिता हेरिटेज समितीच्या सहमतीने विशेष नियम निश्चित करणे अनिवार्य असल्याचे न्यायालयाला सांगितले. तसेच, कस्तुरचंद पार्कच्या संरक्षण व संवर्धनाकरिता विशेष नियम तयार करण्यात आले नाहीत याकडे लक्ष वेधले. न्यायालयाने ही बाब गंभीरतेने घेतली व कस्तुरचंद पार्ककरिता विशेष नियम निश्चित करण्यात आले की नाही, अशी विचारणा मनपाला केली आणि नियम निश्चित केले गेले नसेल तर, कस्तुरचंद पार्कचे संवर्धन कसे व कोणत्या पद्धतीने कराल, हा प्रश्न उपस्थित होतो असे मत व्यक्त केले. उच्च न्यायालयाने २०१७ मध्ये कस्तुरचंद पार्कच्या दुरवस्थेची दखल घेऊन स्वत:च ही याचिका दाखल करून घेतली. दरम्यान, न्यायालयाने वेळोवेळी आवश्यक आदेश दिल्यामुळे मैदानावरील अतिक्रमण हटविण्यात आले. मैदानावरील व्यावसायिक कार्यक्रम बंद झाले. परंतु, गेल्या काही महिन्यांत विविध विकास कामांमुळे मैदानाची दुरवस्था झाली. मैदानावरील स्मारकाच्या देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे पुढे आले. यासंदर्भात दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी झाली नसल्याचा मुद्दा पुढे आल्यानंतर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांनी स्वत: कस्तुरचंद पार्कला भेट देऊन दुरवस्थेची पाहणी केली होती.मैदानाचे समतलीकरण झाले का, कस्तुरचंद पार्कमधील भूमिगत ड्रेनेजचे व मैदानाच्या समतलीकरणाचे काम पूर्ण झाले का, अशी विचारणाही उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांना केली. तसेच, यावर पुढच्या तारखेपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयKasturchand Parkकस्तूरचंद पार्कNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका