शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

हॅट्स ऑफ...‘अभिनव’ आदर्श...; तरुणाच्या अंत्यसंस्काराअगोदर आई व पत्नीने पार पाडले राष्ट्रीय कर्तव्य

By योगेश पांडे | Updated: April 19, 2024 23:59 IST

दु:खाच्या क्षणातदेखील मतदानाला दिले प्राधान्य, समाजासमोर ठेवला अनोखा आदर्श...

नागपूर : तरुण वयातील मुलगा गमावल्यानंतर सर्वसाधारणत: कुटुंबीय त्या धक्क्याने अक्षरश: कोलमडते. मात्र, दु:खाचा डोंगर कोसळल्यानंतरदेखील एका कुटुंबातील दोन महिलांनी राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत समाजासमोर आदर्शच प्रस्थापित केला. डोळ्यांत अश्रू, हृदयात कालवाकालव या स्थितीत मुलाचे अंत्यसंस्कार होण्याअगोदर त्याची आई व पत्नी यांनी मतदान केंद्र गाठून मतदान केले. नागपुरातील तात्या टोपेनगरात ही घटना घडली असून, परिसरातील नागरिकांच्या तोंडून ‘हॅट्स ऑफ’ हेच शब्द बाहेर पडत होते.दु:खाच्या क्षणात राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणाऱ्या मातेचे नाव मैथिली कऱ्हू असून, त्याची पत्नीचे नाव श्रुती आहे.

तात्या टोपेनगर निवासी अभिनव राम कऱ्हू (३९) या तरुणाचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. अभिनव हा अभियंता होता व नागपुरातील सोमलवार शाळेतून त्याने शालेय शिक्षण घेतले होते. तो बरीच वर्षे अमेरिकेत नोकरीनिमित्त होता. मात्र, यादरम्यान त्याला एएलएस या मोटॉर न्यूरॉन आजाराने ग्रासले. तो पत्नी व लहानग्या मुलासह नागपुरात परतला होता. बराच काळ शारीरिक त्रास सहन केल्यानंतर शुक्रवारी त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या या संघर्षात त्याची आई मैथिली व पत्नी श्रुती या दोघी अखेरपर्यंत सोबत होत्या.

नातेवाईक पोहोचल्यानंतर ८ वर्षांच्या लहानग्या मुलाला त्यांच्याजवळ ठेवून दोघींनीही मतदान करायला जाण्याचा निर्णय घेतला. अनेकांना यामुळे धक्का बसला. मात्र, अभिनव असता तर त्याने कशाही स्थितीत मतदानाला जा असेच म्हटले असते या विचाराने दोघींनीही ज्युपिटर शाळेतील मतदान केंद्र गाठले आणि आपला हक्क बजावला. त्यांच्यावर कोसळलेला दु:खाचा डोंगर आणि त्या स्थितीतही निभावलेले राष्ट्रीय कर्तव्य पाहून मतदान केंद्र व बुथवरील कार्यकर्त्यांनीदेखील त्यांना सलामच केला. अभिनव हा स्वत: सामाजिक कार्यात जुळलेला होता व अमेरिकेत असतानादेखील तो शहरातील कार्यांत शक्य तेवढे सहकार्य करायचा. त्याची प्रकृती ढासळलेली असतानादेखील त्याने कुटुंबीयांना मतदानाला पाठविलेच असते. आज तो जिथे कुठे असेल तिथे समाधानी असेल. संघ स्वयंसेवक असलेल्या अभिनवच्या कुटुंबाने खरोखरच समाजासमोर आदर्श मांडला आहे, अशी भावना त्याच्या नातेवाइकांनी व्यक्त केली.चुलत सासऱ्यांनीदेखील सोडला अंतिम सामनाअभिनवचे चुलत सासरे जयंत व्यास हे क्रिकेटपटू असून जमशेदपूर येथे ज्येष्ठांच्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेचा शुक्रवारी अंतिम सामना होता. मात्र, मतदानासाठी ते व त्यांचे सहकारी अतुल सहस्त्रबुद्धे, राम बंबावाले व अनंत नराळे नागपुरात पोहोचले. शहरात पोहोचत असतानाच त्यांना अभिनवच्या मृत्यूची दु:खद बातमी मिळाली.

टॅग्स :ElectionनिवडणूकVotingमतदानnagpurनागपूरDeathमृत्यू