शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘हॅशटॅग मी टू’ नागपूरच्या महिलांना केले जागृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 11:32 IST

जागतिक पातळीवर ‘हॅशटॅग मी टू’ ही चळवळ सुरू झाली आणि बऱ्याच महिलांनी त्यांच्यासोबत होणाऱ्या हिंसाचाराला जगासमोर मांडले. आपल्या नागपुरातही घरगुती हिंसेच्या २३०३ तक्रारींची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देआणखी हवेत प्रयत्न शहरात घरगुती हिंसेच्या २३०३ तक्र ारींची नोंद

अंकिता देशकरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: घरगुती हिंसाचार अधिनियम हा भारतातील स्त्रियांच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा होय. एक स्त्री विविध भूमिका यशस्वीरीत्या पार पाडते पण तीच स्त्री तिच्या घरात मात्र अनेकदा सुखरूप नसते. आधी अनेक महिला हा कौटुंबिक हिंसाचार सहन करायच्या. परंतु आता जागतिक पातळीवर ‘हॅशटॅग मी टू’ ही चळवळ सुरू झाली आणि बऱ्याच महिलांनी त्यांच्यासोबत होणाऱ्या हिंसाचाराला जगासमोर मांडले. आपल्या नागपुरातही घरगुती हिंसेच्या २३०३ तक्रारींची नोंद झाली आहे.भरोसा सेलमध्ये कार्यरत पोलीस निरीक्षक मीना जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरात २०१७ साली, घरगुती हिंसेच्या एकूण २३०३ तक्रारी नोंदविल्या गेल्या आहेत. त्यातील ३२० तक्रारी डोमेस्टिक व्हॅयलेन्स कायद्या अंतर्गत पुढील कारवाईसाठी पाठविण्यात आल्या आहेत. तसेच ८८१ महिलांनी तडजोड करून आपल्या संसाराला पुनश्च शुभारंभ केला आहे.उरलेल्या तक्रारींबाबत कायदेशीर उपाय काढण्यात आले. कुणाला संरक्षण दिले तर कुणाचे घरातच पुनर्वसन करण्यात आले.भरोसाच्या समुपदेशक, संगीता ढोमणे सांगतात, 'अनेक कौटुंबिक हिंसेचा परिणाम इतका भंयकर असतो की त्या महिलेला कायमस्वरूपी नैराश्य येऊ शकते. नोंद झालेल्या तक्रारींमध्ये नैराश्याचे प्रमाण ८ ते १० टक्के असे आढळले आहे. असे अनेक प्रसंग येतात जेव्हा समुपदेशन करताना जाणवते की त्या महिलेला त्वरित उपाय हवाय. कौटुंबिक हिंसेने ग्रासलेल्या महिला या फक्त अशिक्षितच असतात असे नाही तर बऱ्यांचदा त्या उच्चशिक्षित, परदेशी राहून शोषण सहन करणाऱ्यां देखील असतात. आजच्या पिढीत कौटुंबिक हिंसेला घेऊन बरीच जागरूकता आलीय. पण कुठे ना कुठे या समस्येला मुळापासून उपटून काढायचं असेल तर शिक्षण हा एकाच मार्ग आहे, असे मत देखील जगताप यांनी मांडले.

टॅग्स :Women's Day 2018महिला दिन २०१८Baimanoosबाईमाणूस