शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

बारावीचे मूल्यांकन संकटात

By admin | Updated: March 5, 2015 01:41 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या

शिक्षक संघटनांचा असहकार आंदोलनाचा इशारा : दिवसाला एकच उत्तरपत्रिका तपासणारनागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षा सुरू असतानाच शिक्षक संघटनांनी असहकाराचे हत्यार उपसले आहे. शासनाने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यांवर आठ दिवसांत निर्णय घेतला नाही तर १० मार्चपासून दिवसाला एकच उत्तरपत्रिका तपासण्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे बारावीच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ आणि ‘विज्युक्टा’तर्फे (विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशन) हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील ६० हजार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे दीर्घकालीन प्रश्न प्रलंबित असून सरकारने त्यावर तोडगा काढलेला नाही. मागील वर्षीदेखील याच मागण्यांवरून संघटनेने पेपर तपासणीच्या कामावर बहिष्कार घातला होता. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्र्यांना याबाबत वारंवर पत्रं पाठविण्यात आली, परंतु त्यांनी संघटनांना साधे चर्चेसाठीदेखील बोलाविले नाही. त्यामुळे बहिष्कार न घालता असहकार पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने आठ दिवसांत सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र केले जाईल, अशी माहिती ‘विज्युक्टा’चे महासचिव अशोक गव्हाणकर यांनी दिली. शासनाची यासंदर्भात नेमकी भूमिका काय असेल, याबाबत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.कसा बसेल फटका?बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली असून पेपर तपासणीची प्रक्रियादेखील सुरू आहे. एका शिक्षकाला १० दिवसांत साधारणत: २५० उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करावे लागते. नागपूर विभागात ‘विज्युक्टा’शी संबंधित साधारणत: दीड हजार मूल्यांकन करणारे शिक्षक आहेत. मागण्या मान्य न झाल्यास १० मार्चपासून एक शिक्षक दिवसाला एकच उत्तरपत्रिका तपासेल, असा इशारा देण्यात आला आहे. अशास्थितीत १० दिवसांत तो केवळ १० उत्तरपत्रिका तपासेल; म्हणजेच सुमारे २४० उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन रखडेल. संपूर्ण राज्यभरात संघटनांशी संबंधित शिक्षकांचा आकडा ३० हजारांहून अधिक आहे. अशास्थितीत जर असहकार कायम राहिला तर मूल्यांकनाची मोठी समस्या निर्माण होऊ शकते व निकालांवर याचा परिणाम होऊ शकतो.