शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

भागवत व ओवेसी यांचे हातात हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2016 03:19 IST

‘भारत माता की जय’ म्हणू नका असे कुराणमध्ये कुठेच लिहिलेले नाही. सरसंघचालक मोहन भागवत व एमआयएमचे अध्यक्ष ओवेसी यांचे हातात हात घालून काम सुरू आहे.

दिग्विजयसिंह यांची टीका : पीडीपीची साथ भाजपला कशी चालते ?नागपूर : ‘भारत माता की जय’ म्हणू नका असे कुराणमध्ये कुठेच लिहिलेले नाही. सरसंघचालक मोहन भागवत व एमआयएमचे अध्यक्ष ओवेसी यांचे हातात हात घालून काम सुरू आहे. या दोघांचीही ‘फूट पाडा व राज्य’ करा अशी कट्टरवादी विचारधारा आहे. काँग्रेसने तर ‘भारत माता की जय’ या नाऱ्यावर देशाच्या स्वातंत्र्याचा लढा लढला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘डिस्कवरी आॅफ इंडिया’ मध्ये भारत ‘माता की जय’ची केलेली व्याख्या संघ व भाजपला समजविण्याची वेळ आली आहे, असा चिमटा अ.भा. काँग्रेस समितीचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी काढला.पक्षाच्या आढावा बैठकीसाठी नागपुरात आले असता सिंह यांनी भाजप व संघ परिवारावर सडकून टीका केली. सिंह म्हणाले, जेएनयूमध्ये पाकिस्तानच्या समर्थनार्थ नारे दिले नसतानाही केवळ साम्यवादी विचाराचा असल्यामुळे कन्हैया कुमारला अटक करण्यात आली. मात्र, संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजल गुरूचे समर्थन करणाऱ्या पीडीपीला जम्मू काश्मीरमध्ये सरकार बनविण्यासाठी भाजप कशी काय साथ देत आहे, हे भागवत यांनी स्पष्ट करावे. संविधान व आरक्षणाचा विरोध करणारी भाजपा आता डॉ. आंबेडकरांना आपलेसे करू पाहत आहे. एकीकडे भागवत म्हणतात की आरक्षणाचा पुनर्विचार व्हावा, तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी म्हणतात आरक्षण लागू राहील. त्यामुळे कोण खरे बोलत आहे, हे या नेत्यांनी आधी स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेसचे टार्गेट मोहन भागवत नसून संघाची विचारधारा आहे. भागवत यांच्याशी आपली कुठलीही व्यक्तिगत लढाई नाही. मात्र, हिंसा, द्वेष पसरविणाऱ्या विचारधारेला आपला विरोध सुरू राहील, असेही त्यांनी सांगितले. उत्तराखंडमध्ये भाजपने पक्षांतरबंदी कायद्याचे पूर्णपणे उल्लंघन केले आहे. स्वत:कडे बहुमत असल्याचा दावा भाजपने केला, मात्र ते सिद्ध न करता राष्ट्रपती राजवट लागू केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या म्हटल्याने देश काँग्रेसमुक्त होणार नाही. भाजपमध्ये हिंमत असेल तर उत्तराखंडमध्ये निवडणूक घेऊन दाखवावी, असे आव्हान त्यांनी दिले.(प्रतिनिधी)फडणवीसांवरील आरोपांवर ठाममहाराष्ट्राच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) चे अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत. त्यांनी अ‍ॅक्सिस बँकेच्या वरळी शाखेतच बँक खाती उघडण्याचा आदेश जारी केला होता. यात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप सिंह यांनी केला होता. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सिंह यांना नोटीस बजावली होती. यावर बोलताना सिंह यांनी आपण आरोपांवर ठाम असल्याचे सांगितले. मी नोटीसीला उत्तर देत नाही. न्यायालयात उत्तर देईल. गडकरींनीही यापूर्वी नोटीस दिली होती. कायदेशीर लढाई लढतो आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपणही दहा वर्षे मुख्यमंत्री राहिलो आहे. फडणवीस यांनी अशी कामे करू नयेत, नाहीतर ते फसतील, असा सल्लावजा टोला त्यांनी लगावला.