शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

भागवत व ओवेसी यांचे हातात हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2016 03:19 IST

‘भारत माता की जय’ म्हणू नका असे कुराणमध्ये कुठेच लिहिलेले नाही. सरसंघचालक मोहन भागवत व एमआयएमचे अध्यक्ष ओवेसी यांचे हातात हात घालून काम सुरू आहे.

दिग्विजयसिंह यांची टीका : पीडीपीची साथ भाजपला कशी चालते ?नागपूर : ‘भारत माता की जय’ म्हणू नका असे कुराणमध्ये कुठेच लिहिलेले नाही. सरसंघचालक मोहन भागवत व एमआयएमचे अध्यक्ष ओवेसी यांचे हातात हात घालून काम सुरू आहे. या दोघांचीही ‘फूट पाडा व राज्य’ करा अशी कट्टरवादी विचारधारा आहे. काँग्रेसने तर ‘भारत माता की जय’ या नाऱ्यावर देशाच्या स्वातंत्र्याचा लढा लढला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘डिस्कवरी आॅफ इंडिया’ मध्ये भारत ‘माता की जय’ची केलेली व्याख्या संघ व भाजपला समजविण्याची वेळ आली आहे, असा चिमटा अ.भा. काँग्रेस समितीचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी काढला.पक्षाच्या आढावा बैठकीसाठी नागपुरात आले असता सिंह यांनी भाजप व संघ परिवारावर सडकून टीका केली. सिंह म्हणाले, जेएनयूमध्ये पाकिस्तानच्या समर्थनार्थ नारे दिले नसतानाही केवळ साम्यवादी विचाराचा असल्यामुळे कन्हैया कुमारला अटक करण्यात आली. मात्र, संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजल गुरूचे समर्थन करणाऱ्या पीडीपीला जम्मू काश्मीरमध्ये सरकार बनविण्यासाठी भाजप कशी काय साथ देत आहे, हे भागवत यांनी स्पष्ट करावे. संविधान व आरक्षणाचा विरोध करणारी भाजपा आता डॉ. आंबेडकरांना आपलेसे करू पाहत आहे. एकीकडे भागवत म्हणतात की आरक्षणाचा पुनर्विचार व्हावा, तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी म्हणतात आरक्षण लागू राहील. त्यामुळे कोण खरे बोलत आहे, हे या नेत्यांनी आधी स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेसचे टार्गेट मोहन भागवत नसून संघाची विचारधारा आहे. भागवत यांच्याशी आपली कुठलीही व्यक्तिगत लढाई नाही. मात्र, हिंसा, द्वेष पसरविणाऱ्या विचारधारेला आपला विरोध सुरू राहील, असेही त्यांनी सांगितले. उत्तराखंडमध्ये भाजपने पक्षांतरबंदी कायद्याचे पूर्णपणे उल्लंघन केले आहे. स्वत:कडे बहुमत असल्याचा दावा भाजपने केला, मात्र ते सिद्ध न करता राष्ट्रपती राजवट लागू केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या म्हटल्याने देश काँग्रेसमुक्त होणार नाही. भाजपमध्ये हिंमत असेल तर उत्तराखंडमध्ये निवडणूक घेऊन दाखवावी, असे आव्हान त्यांनी दिले.(प्रतिनिधी)फडणवीसांवरील आरोपांवर ठाममहाराष्ट्राच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) चे अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत. त्यांनी अ‍ॅक्सिस बँकेच्या वरळी शाखेतच बँक खाती उघडण्याचा आदेश जारी केला होता. यात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप सिंह यांनी केला होता. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सिंह यांना नोटीस बजावली होती. यावर बोलताना सिंह यांनी आपण आरोपांवर ठाम असल्याचे सांगितले. मी नोटीसीला उत्तर देत नाही. न्यायालयात उत्तर देईल. गडकरींनीही यापूर्वी नोटीस दिली होती. कायदेशीर लढाई लढतो आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपणही दहा वर्षे मुख्यमंत्री राहिलो आहे. फडणवीस यांनी अशी कामे करू नयेत, नाहीतर ते फसतील, असा सल्लावजा टोला त्यांनी लगावला.