शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

वैश्विकतेचा हात की, बंदिस्त आयुष्याचा फास?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 11:45 IST

मोबाईल आणि मोबाईलवरील सोशल मीडियाचे सुपरिणाम कधी दुष्परिणामाकडे वळते झाले, याची साधी कल्पनाही मानवाने केली नसावी.

प्रवीण खापरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:मानवाची स्थिती अगदी भस्मासूर-शिवकथेसारखी आहे. ‘ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील, तो भस्म होईल’ असा वर महादेवाकडून मिळविलेल्या भस्मासुराने, महादेवालाच भस्म करण्याचा चंग बांधला. अखेर, विष्णूने सर्वांगसुंदर मोहिनीचे रूप धारण केले आणि भस्मासुराला स्वत:कडे आकर्षित करून, नृत्यकौशल्याद्वारे त्यास स्वत:च्याच डोक्यावर हात ठेवण्यास बाध्य केले आणि भस्मासूर भस्म झाला. अवघे ब्रम्हांड कवेत घेऊ इच्छिणाऱ्या मानवाची वाटचालही भस्मासुराच्या पदचिन्हावर सुरू आहे. त्याच शृंखलेत, मोबाईल आणि मोबाईलवरील सोशल मीडियाचे सुपरिणाम कधी दुष्परिणामाकडे वळते झाले, याची साधी कल्पनाही मानवाने केली नसावी. ‘ग्लोबल व्हिलेज’ या संकल्पनेला प्रत्यक्षात साकार करणारी ही मोबाईलची दुनिया, वैश्विकतेला हात देणारी जरूर ठरली. मात्र, या वैश्विकतेच्या अतिहव्यासाने मानवी आयुष्याला बंदिस्त करण्याचा फासच आवळल्याचे दिसून येत आहे आणि म्हणूनच, अवघे जग आता त्या दुष्परिणामाला टोलविण्याच्या उपायांवर कार्य करत आहे. मात्र, ‘थ्री-जी’, ‘फोर-जी’ कडून ‘फाईव्ह-जी’ झालेली आगेकूच बघता, ते उपाय परिणामकारक ठरतील का? असाही एक प्रश्न उपस्थित झाला आहे.डोळे-मेंदू अन् अखेरचा श्वास!‘पबजी’ या मोबाईल गेममुळे, मृत्यू ओढवल्याच्या घटना ताज्याच आहेत. दोनच दिवसांपूर्वी उमरेड येथील एका किशोरवयीन मुलाचा मृत्यू मोबाईलवर सातत्याने ‘पबजी’ खेळत असल्याने, ओढवल्याचे स्पष्ट झाले आहे. पबजी किंवा बंदी घालण्यात आलेल्या ‘ब्ल्यू व्हेल’ सारख्या खेळांमध्ये विशेषत: मुले स्वत:ची सद्सद्विवेकबुद्धी हरवून बसलेली असतात. अशा खेळाच्या ते इतक्या आहारी गेले असतात, की तो खेळ म्हणजेच विश्व, अशी त्यांची ठाम धारणा झाली असते. शरीरातील प्रत्येक घटकाचा संबंध मेंदूशी असतो. सतत मोबाईलच्या स्क्रीनवर डोळे असल्याने, मेंदू बधीर व्हायला लागतो आणि मोबाईल स्क्रीन एवढेच त्याचे जग व्हायला लागते. तेथूनच, शरीराचे एक एक फंक्शन्स कधी विस्कळीत व्हायला लागतात, ते कळत नाही आणि आपण शेवटाच्या जवळ पोहोचलो आहोत, याची जाणीव अखेरचा श्वास घेईपर्यंत कळत नाही. अशा घटना देश-विदेशात उघडकीस आल्या आहेत.‘टिक टॉक’ हा शब्द युवा वर्गासाठी फार जुना झाला आहे आणि म्हणूनच, सरकारने यावर बंदी घातल्यानंतर युवा मुखातून जो आगडोंब निघाला, त्याचा धसका घेत हे सोशल माध्यम पुन्हा सुरू करावे लागले. हा शब्द एका माध्यमासाठी वापरला गेला असला तरी, मोबाईलच्या स्क्रिनवरील ‘टिक टॉक’ मोबाईल युग अवतरल्यापासून सुरू झाली आहे. एका कंपास बॉक्ससारखी पेटी खिशात ठेवली की कुठेही आणि कुठूनही आप्तांच्या संपर्कात राहू शकेल, अशा यंत्रणेतून सुरू झालेला हा मोबाईल प्रवास नंतर ‘एसएमएस चॅट’, ‘व्हिडीओ रेकॉर्डींग’कडे गेला. त्याला इंटरनेटची जोड मिळाल्यानंतर, व्हॉट्सअपॅ, फिगो आदींद्वारे ‘आॅडिओ-व्हिडीओ चॅट’पर्यंत गेले आणि नंतर तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हव्यास मानवाला मोबाईलवरच्या या सोशल मीडियांवर इतका व्यस्त करत गेला की तो इवल्याशा स्क्रिनवर सतत ‘टिक टॉक’ करू लागला. फावल्या वेळात मनोरंजनासाठी ‘मोबाईल गेम’ आणि त्याला ‘ग्रुप गेम’ची सांगड दिल्यानंतर तर हा सोशल मीडिया अतिभयंकर रूप धारण करू लागला आहे. यात विद्यार्थी आणि युवा वर्ग प्रचंड भरडला जात असल्याचे दिसून येते.पालकांची भूमिका महत्त्वाचीआई-वडील आणि घरातील ज्येष्ठांसह वडीलधारी मंडळी, हेच मुलांचे पहिले मार्गदर्शक म्हणा वा प्रेरणास्रोत असतात. त्यांचे अनुकरण मुले करत असतात. मात्र, स्पर्धेच्या युगात पालकांचे मुलांकडे होत असलेले दुर्लक्ष, मुलांना अशा सोशल मीडियाकडे वळवत आहे. पालकांनी घरात प्रवेश करताच, मोबाईल टाळून मुलांशी वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधणे महत्त्वाचे ठरते. पायातली चप्पल दाराबाहेर जशी ठेवली जाते. तसेच, पालकांनी बाहेरच्या गोष्टी उंबरठ्याबाहेर ठेवून आणि मुलांशी आरोग्यवर्धक संवाद साधणे गरजेचे आहे. शिवाय, मुलांकडे असलेल्या मोबाईलची एक पालक म्हणून सतत तपासणी करणे, ते काय बघत आहेत आणि काय नाही, याची चौकशी करणे, त्यांना प्रत्येक गोष्टीची मर्यादा आणि बंधने घालून देणे, स्वत: करत असलेल्या कामांची माहिती देणे. असा संवाद ठेवल्यास मुलांना मोबाईल आणि सोशल माध्यमांकडे वळण्यास वेळच मिळणार नाही आणि गरजेपुरतेच मोबाईल आणि सोशल माध्यमांवर असावे, याची जाणीव दृढ होईल.अतिवापरामुळे मुलांची बुद्धी होतेय खुजीमुलांचे मन अतिसंवेदनशील आणि बुद्धी नवे ते स्वीकारण्याच्या सदा तयारीत असते. मोबाईल आणि मोबाईलवरील सोशल मीडिया, दर सेकंदाला अपडेट होणारी सिस्टीम असल्याने, मुले या माध्यमाकडे आपसूकच आकर्षिले जातात. अवघ्या जगाच्या घडामोडी आणि त्यावर उमटणारे व्हिडीओज, कधीही न आटणाऱ्या माहितींचा संग्रह यामुळे, मुले आणि विशेषत: युवा वर्ग सतत मोबाईलच्या स्क्रीनमध्ये डोकावून असल्याचे दिसून येते. वैश्विक जगाशी जुळण्याच्या या नादामुळे मुले नजीकच्या संवादापासून अलिप्त होतात आणि एकलकोंडे होण्याची भीती बळावते आणि त्यांची मनोवृत्ती संकुचित होण्यास सुरुवात होते. अशी उदाहरणे आजूबाजूला अनेक दिसून येतील. त्याचा परिणाम वास्तविक अनुभव मिळणाऱ्या गोष्टींपासून ते परावृत्त होत जातात आणि त्यांची बुद्धी खुजी होण्यास सुरुवात होत जाते.

टॅग्स :Mobileमोबाइल