शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी अपघात विमा योजनेतील अर्ध्यावर प्रकरणे प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:07 IST

नागपूर : स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्वामध्ये आर्थिक लाभ मिळवून देणारी असली ...

नागपूर : स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्वामध्ये आर्थिक लाभ मिळवून देणारी असली तरी, प्रत्यक्षात या योजनेलाच ‘अपघात’ झाल्याचे दिसत आहे. वर्षभरात १४६ प्रस्ताव जिल्हाभरातून दाखल होऊनही फक्त ५९ प्रकरणे मंजूर झाली. १२ प्रकरणे नामंजूर करण्यात आली. त्यामुळे ७५ प्रकरणे अद्यापही प्रलंबितच आहेत.

या योजनेसाठी शेतकऱ्याने किंवा त्यांच्या वतीने कोणत्याही संस्थेने विमा हप्ता भरण्याची गरज नाही. सरकार स्वत: सर्व खातेदार शेतकऱ्यांचा विमा हप्ता भरते. नागपूर जिल्ह्यात युनिव्हर्सल सोम्पो इन्शुरन्स कंपनीकडे जबाबदारी सोपविण्यात आली असून, जायका इन्शुरन्स ब्रोकरेज कंपनी मध्यस्थ आहे. जिल्ह्यात २०२०-२१ या आर्थिक वर्षात १४६ प्रस्ताव दाखल झाले. त्यापैकी ५९ प्रकरणांनाच मंजुरी मिळाली आहे.

...

२०२० साली दाखल मंजूर प्रस्ताव

रस्ता अपघात - ६६

विजेचा धक्का - १४

वीज पडणे - ९

सर्पदंश - १३

बुडून - २२

खून - ४

विषबाधा - ४

रेल्वे अपघात - १

व्याघ्रहल्ला - १

जळणे - २

झाडावरून पडणे - १

छत कोसळणे - १

बैलाचा हल्ला - ४

बायोगॅस टँक स्फोट - २

कारण अस्पष्ट - १

एकूण - १४६

...

कुणाला किती मिळते मदत?

शेती करताना वीज पडणे, विजेचा धक्का लागणे, अपघात घडणे यासह अनेक संकटांना सामोरे जावे लागते. अशा घटनांमध्ये जीव गमावल्यास किंवा कायम अपंगत्व आल्यास कुटुंबाची वाताहत होऊ नये यासाठी राज्य शासनाने २०१५-१६ मध्ये ही योजना अस्तित्वात आणली. मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये आणि कायम अपंगत्व आल्यास एक लाख रुपयाची मदत देण्याची या माध्यमातून तरतूद आहे.

...

३) सर्वाधिक प्रकरणे अपघाताची

यात सर्वाधिक प्रकरणे अपघाताची आहेत. रस्ता अपघातामध्ये ६६ तर रेल्वे अपघातामध्ये एक अशी ६७ प्रकरणे आहेत. प्रलंबित असणाऱ्या प्रस्तावांमध्ये याचेच प्रमाण अधिक आहे. तांत्रिक बाबींची पूर्तता वेळवर होत नसल्याने या प्रस्तावांच्या मंजुरीमध्ये अडथळे आहेत.

...

प्रस्ताव कंपनीस्तरावर प्रलंबित

‘अनेक प्रस्ताव कंपनीस्तरावर प्रलंबित आहेत. दर आठवड्याला पाठपुरावा सुरू आहे. अपघाताच्या प्रकरणांमध्ये वाहनांची कागदपत्रे नसणे, परवाना नसणे, घटनेत वाहनमालक नसणे, व्हिसेरा न मिळणे, सातबारावर नाव नसणे अशा तांत्रिक अडचणी आहेत. तरीही लहान कारणासाठी परत पाठविलेले प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून मंजुरीसाठी पाठपुरावा आम्ही करीत असतो.’

- मिलिंद शेंडे, अधीक्षक कृषी अधिकारी, नागपूर

...