शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
3
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
4
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
5
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
7
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
8
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
9
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
10
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
11
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
12
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
13
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
14
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
15
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
17
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
18
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
19
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
20
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?

शेतकरी अपघात विमा योजनेतील अर्ध्यावर प्रकरणे प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:07 IST

नागपूर : स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्वामध्ये आर्थिक लाभ मिळवून देणारी असली ...

नागपूर : स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्वामध्ये आर्थिक लाभ मिळवून देणारी असली तरी, प्रत्यक्षात या योजनेलाच ‘अपघात’ झाल्याचे दिसत आहे. वर्षभरात १४६ प्रस्ताव जिल्हाभरातून दाखल होऊनही फक्त ५९ प्रकरणे मंजूर झाली. १२ प्रकरणे नामंजूर करण्यात आली. त्यामुळे ७५ प्रकरणे अद्यापही प्रलंबितच आहेत.

या योजनेसाठी शेतकऱ्याने किंवा त्यांच्या वतीने कोणत्याही संस्थेने विमा हप्ता भरण्याची गरज नाही. सरकार स्वत: सर्व खातेदार शेतकऱ्यांचा विमा हप्ता भरते. नागपूर जिल्ह्यात युनिव्हर्सल सोम्पो इन्शुरन्स कंपनीकडे जबाबदारी सोपविण्यात आली असून, जायका इन्शुरन्स ब्रोकरेज कंपनी मध्यस्थ आहे. जिल्ह्यात २०२०-२१ या आर्थिक वर्षात १४६ प्रस्ताव दाखल झाले. त्यापैकी ५९ प्रकरणांनाच मंजुरी मिळाली आहे.

...

२०२० साली दाखल मंजूर प्रस्ताव

रस्ता अपघात - ६६

विजेचा धक्का - १४

वीज पडणे - ९

सर्पदंश - १३

बुडून - २२

खून - ४

विषबाधा - ४

रेल्वे अपघात - १

व्याघ्रहल्ला - १

जळणे - २

झाडावरून पडणे - १

छत कोसळणे - १

बैलाचा हल्ला - ४

बायोगॅस टँक स्फोट - २

कारण अस्पष्ट - १

एकूण - १४६

...

कुणाला किती मिळते मदत?

शेती करताना वीज पडणे, विजेचा धक्का लागणे, अपघात घडणे यासह अनेक संकटांना सामोरे जावे लागते. अशा घटनांमध्ये जीव गमावल्यास किंवा कायम अपंगत्व आल्यास कुटुंबाची वाताहत होऊ नये यासाठी राज्य शासनाने २०१५-१६ मध्ये ही योजना अस्तित्वात आणली. मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये आणि कायम अपंगत्व आल्यास एक लाख रुपयाची मदत देण्याची या माध्यमातून तरतूद आहे.

...

३) सर्वाधिक प्रकरणे अपघाताची

यात सर्वाधिक प्रकरणे अपघाताची आहेत. रस्ता अपघातामध्ये ६६ तर रेल्वे अपघातामध्ये एक अशी ६७ प्रकरणे आहेत. प्रलंबित असणाऱ्या प्रस्तावांमध्ये याचेच प्रमाण अधिक आहे. तांत्रिक बाबींची पूर्तता वेळवर होत नसल्याने या प्रस्तावांच्या मंजुरीमध्ये अडथळे आहेत.

...

प्रस्ताव कंपनीस्तरावर प्रलंबित

‘अनेक प्रस्ताव कंपनीस्तरावर प्रलंबित आहेत. दर आठवड्याला पाठपुरावा सुरू आहे. अपघाताच्या प्रकरणांमध्ये वाहनांची कागदपत्रे नसणे, परवाना नसणे, घटनेत वाहनमालक नसणे, व्हिसेरा न मिळणे, सातबारावर नाव नसणे अशा तांत्रिक अडचणी आहेत. तरीही लहान कारणासाठी परत पाठविलेले प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून मंजुरीसाठी पाठपुरावा आम्ही करीत असतो.’

- मिलिंद शेंडे, अधीक्षक कृषी अधिकारी, नागपूर

...