शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

नागपूर जिल्ह्यात गारपीटग्रस्त शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 21:46 IST

गारपिटीने शेतातील संपूर्ण पीक उद्ध्वस्त केल्याने हताश झालेल्या कर्जबाजारी शेतकऱ्याने फवारणीचे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. हा शेतकरी अल्पभूधारक असून, त्यांच्याकडे २ लाख २५ हजार रुपयांचे बँक व नातेवाईकांचे कर्ज आहे. ही दुर्दैवी घटना काटोल तालुक्यातील इसापूर येथे शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देइसापूर येथील घटना : दोन लाख रुपयांचे होते कर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गारपिटीने शेतातील संपूर्ण पीक उद्ध्वस्त केल्याने हताश झालेल्या कर्जबाजारी शेतकऱ्याने फवारणीचे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. हा शेतकरी अल्पभूधारक असून, त्यांच्याकडे २ लाख २५ हजार रुपयांचे बँक व नातेवाईकांचे कर्ज आहे. ही दुर्दैवी घटना काटोल तालुक्यातील इसापूर येथे शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.प्रल्हाद मधुकर धोटे (४७, रा. इसापूर खुर्द, ता. काटोल) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. धोटे यांच्याकडे वडिलोपार्जित पाच एकर शेती असून, दोघे भाऊ असल्याने त्यांच्या वाट्याला अडीच एकर शेती आली होती. त्यांनी काही वर्षांपूर्वी बँक आॅफ इंडियाच्या झिलपा (ता. काटोल) शाखेकडून पीककर्ज घेतले होते. हे कर्ज थकीत राहिल्याने कर्जाची व्याजासह रक्कम १ लाख ७५ हजार रुपयांवर पोहोचली होती. बँकेकडून कर्ज मिळत नसल्याने शेतीच्या मशागतीसाठी त्यांनी सावकार व नातेवाईकांकडून ७० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते.यावर्षी त्यांनी कपाशी, गहू व हरभऱ्याची पेरणी केली होती. बोंडअळी कपाशी आणि चार दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटीमुळे गहू व हरभऱ्याचे प्रचंड नुकसान झाले. शेती व घरखर्च कसा भागवायचा, याच विवंनेत ते राहायचे. त्यांनी दिवसभर शेतीची कामे केली आणि सायंकाळी घरी कुणीही नसताना कीटकनाशक प्राशन केले. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना लगेच काटोल येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. त्यांना एक विवाहित व तीन अविवाहित मुली आहेत. या प्रकरणी काटोल पोलिसांनी नोंद करून तपास सुरू केला आहे.ठिय्या आंदोलनाचा चौथा दिवसकाटोल व नरखेड तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. गारपीटग्रस्त गावांमध्ये प्रल्हाद धोटे यांच्या इसापूर (खुर्द) गावाचाही समावेश आहे. या दोन्ही तालुक्यातील बोंडअळी व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने योग्य नुकसानभरपाई तातडीने द्यावी, या मागणीसाठी आ. डॉ. आशिष देशमुख यांनी काटोल येथे बुधपारपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. शनिवारी या आंदोलनाचा चौथा दिवस होता. मात्र, शासनाने अद्यापही आंदोलनाची दखल घेतली नाही. आ. देशमुख यांनी लगेच ग्रामीण रुग्णालयात जाऊन प्रल्हाद धोटे यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांना दिलासा दिला.

टॅग्स :FarmerशेतकरीSuicideआत्महत्या