शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
6
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
7
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
8
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
9
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
10
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
11
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
12
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
13
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
14
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
15
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
16
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
17
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
18
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
19
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
20
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी

नागपूर जिल्ह्यात गारपीटग्रस्त शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 21:46 IST

गारपिटीने शेतातील संपूर्ण पीक उद्ध्वस्त केल्याने हताश झालेल्या कर्जबाजारी शेतकऱ्याने फवारणीचे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. हा शेतकरी अल्पभूधारक असून, त्यांच्याकडे २ लाख २५ हजार रुपयांचे बँक व नातेवाईकांचे कर्ज आहे. ही दुर्दैवी घटना काटोल तालुक्यातील इसापूर येथे शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देइसापूर येथील घटना : दोन लाख रुपयांचे होते कर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गारपिटीने शेतातील संपूर्ण पीक उद्ध्वस्त केल्याने हताश झालेल्या कर्जबाजारी शेतकऱ्याने फवारणीचे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. हा शेतकरी अल्पभूधारक असून, त्यांच्याकडे २ लाख २५ हजार रुपयांचे बँक व नातेवाईकांचे कर्ज आहे. ही दुर्दैवी घटना काटोल तालुक्यातील इसापूर येथे शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.प्रल्हाद मधुकर धोटे (४७, रा. इसापूर खुर्द, ता. काटोल) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. धोटे यांच्याकडे वडिलोपार्जित पाच एकर शेती असून, दोघे भाऊ असल्याने त्यांच्या वाट्याला अडीच एकर शेती आली होती. त्यांनी काही वर्षांपूर्वी बँक आॅफ इंडियाच्या झिलपा (ता. काटोल) शाखेकडून पीककर्ज घेतले होते. हे कर्ज थकीत राहिल्याने कर्जाची व्याजासह रक्कम १ लाख ७५ हजार रुपयांवर पोहोचली होती. बँकेकडून कर्ज मिळत नसल्याने शेतीच्या मशागतीसाठी त्यांनी सावकार व नातेवाईकांकडून ७० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते.यावर्षी त्यांनी कपाशी, गहू व हरभऱ्याची पेरणी केली होती. बोंडअळी कपाशी आणि चार दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटीमुळे गहू व हरभऱ्याचे प्रचंड नुकसान झाले. शेती व घरखर्च कसा भागवायचा, याच विवंनेत ते राहायचे. त्यांनी दिवसभर शेतीची कामे केली आणि सायंकाळी घरी कुणीही नसताना कीटकनाशक प्राशन केले. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना लगेच काटोल येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. त्यांना एक विवाहित व तीन अविवाहित मुली आहेत. या प्रकरणी काटोल पोलिसांनी नोंद करून तपास सुरू केला आहे.ठिय्या आंदोलनाचा चौथा दिवसकाटोल व नरखेड तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. गारपीटग्रस्त गावांमध्ये प्रल्हाद धोटे यांच्या इसापूर (खुर्द) गावाचाही समावेश आहे. या दोन्ही तालुक्यातील बोंडअळी व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने योग्य नुकसानभरपाई तातडीने द्यावी, या मागणीसाठी आ. डॉ. आशिष देशमुख यांनी काटोल येथे बुधपारपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. शनिवारी या आंदोलनाचा चौथा दिवस होता. मात्र, शासनाने अद्यापही आंदोलनाची दखल घेतली नाही. आ. देशमुख यांनी लगेच ग्रामीण रुग्णालयात जाऊन प्रल्हाद धोटे यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांना दिलासा दिला.

टॅग्स :FarmerशेतकरीSuicideआत्महत्या