शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

संत साहित्याचे अभ्यासक, ज्ञानसाधू वासुदेव चोरघडे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 10:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : संत साहित्याचे अभ्यासक, प्रवचनकार आणि ज्योतिषाचार्य म्हणून ओळख असलेले ज्ञानसाधू वासुदेवराव चोरघडे यांचे रविवारी ...

ठळक मुद्देनाट्यकलावंत, प्रवचनकार, ज्योतिषाचार्य अशी ओळख

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संत साहित्याचे अभ्यासक, प्रवचनकार आणि ज्योतिषाचार्य म्हणून ओळख असलेले ज्ञानसाधू वासुदेवराव चोरघडे यांचे रविवारी पहाटे निधन झाले. ते ८७ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी वसुधा, मुलगा अभय, दोन मुली जयश्री व अपर्णा, जावई, स्नुषा अंजली व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.अभ्यंकरनगर रहिवासी असलेले वासुदेव चोरघडे यांनी डीएजीपीटी येथून लेखाधिकारी म्हणून ३० वर्षे सेवा दिली होती. आकडेमोड करणाऱ्या वासुदेव यांना सुरुवातीपासूनच धर्म, अध्यात्माची गोडी होती.श्री वासुदेवानंद सरस्वती यांना दैवत मानणाºया चोरघडे यांनी वेदशास्त्रसंपन्न अंबादासशास्त्री पांडे यांच्या मार्गदर्शनात संत साहित्याचा भरीव अभ्यास केला. पुढे निवृत्तीनंतर त्यांनी ज्ञानसाधना, समाजसाधना व धर्मसाधनेत स्वत:ला वाहून घेतले. रामायण, समर्थप्रणित आत्माराम, दासबोध, ज्ञानेश्वरी, नारदाची भक्तिसूत्रे, विष्णूसहस्रनाम, रुद्रसुक्त, कृष्णालहरी, गंगालहरी यांचा प्रचंड अभ्यास त्यांनी केला. हे धर्मसाहित्य त्यांना मुखोद््गत होते. वामनराव चोरघडे यांच्या लेखनचा वारसा त्यांना लाभला. त्यांनी लेखन केलेल्या श्रुतिका, नभोनाट्य यांचे प्रसारण नेहमी नागपूर आकाशवाणीवरून होत असे. मराठी, संस्कृत भाषेमध्ये त्यांचे धर्म अध्यात्मावरील स्वतंत्र लेखनासह संपादित व अनुवादित केलेले त्यांचे १७ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. ३० पेक्षा जास्त पुस्तकांना त्यांनी प्रस्तावना दिली असून वृत्तपत्रात त्यांचे अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. अनेक संस्कृत व मराठी नाटकांमध्ये त्यांनी अभिनयही केला होता.वेद-उपनिषदातील तत्त्व, आद्य शंकराचार्याचे दृष्टांत, ज्ञानेश्वरीतील ओव्या त्यांना पाठ होत्या. त्यांच्या या ज्ञानसाधनेमुळे नानासाहेब शेवाळकर यांनी त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षात ज्ञानसाधू ही पदवी बहाल करून त्यांचा सत्कार केला. विदर्भ साहित्य संघाचे सचिव असताना पहिला कीर्तन महोत्सव आयोजित करण्याचे काम त्यांनी केले. लोकमतच्या ‘अध्यात्म’ या सदरात त्यांनी अनेक वर्षे लेखन केले आहे.त्यांनी ज्येष्ठ नागरिक मंडळ (पश्चिम), पेन्शनर्स असोसिएशन, भागवत सेवा समिती, विनोबा विचार केंद्र, हनुमान मंदिर माधवनगर या संस्थांचे अध्यक्ष म्हणून कार्य केले आहे. त्यांना २०१० साली महाराष्ट्र शासनातर्फे कविकुलगुरू कालिदास संस्कृत साधना पुरस्काराने गौरविण्यात आले होते. अनेक पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :Deathमृत्यू