शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

संत साहित्याचे अभ्यासक, ज्ञानसाधू वासुदेव चोरघडे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 10:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : संत साहित्याचे अभ्यासक, प्रवचनकार आणि ज्योतिषाचार्य म्हणून ओळख असलेले ज्ञानसाधू वासुदेवराव चोरघडे यांचे रविवारी ...

ठळक मुद्देनाट्यकलावंत, प्रवचनकार, ज्योतिषाचार्य अशी ओळख

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संत साहित्याचे अभ्यासक, प्रवचनकार आणि ज्योतिषाचार्य म्हणून ओळख असलेले ज्ञानसाधू वासुदेवराव चोरघडे यांचे रविवारी पहाटे निधन झाले. ते ८७ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी वसुधा, मुलगा अभय, दोन मुली जयश्री व अपर्णा, जावई, स्नुषा अंजली व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.अभ्यंकरनगर रहिवासी असलेले वासुदेव चोरघडे यांनी डीएजीपीटी येथून लेखाधिकारी म्हणून ३० वर्षे सेवा दिली होती. आकडेमोड करणाऱ्या वासुदेव यांना सुरुवातीपासूनच धर्म, अध्यात्माची गोडी होती.श्री वासुदेवानंद सरस्वती यांना दैवत मानणाºया चोरघडे यांनी वेदशास्त्रसंपन्न अंबादासशास्त्री पांडे यांच्या मार्गदर्शनात संत साहित्याचा भरीव अभ्यास केला. पुढे निवृत्तीनंतर त्यांनी ज्ञानसाधना, समाजसाधना व धर्मसाधनेत स्वत:ला वाहून घेतले. रामायण, समर्थप्रणित आत्माराम, दासबोध, ज्ञानेश्वरी, नारदाची भक्तिसूत्रे, विष्णूसहस्रनाम, रुद्रसुक्त, कृष्णालहरी, गंगालहरी यांचा प्रचंड अभ्यास त्यांनी केला. हे धर्मसाहित्य त्यांना मुखोद््गत होते. वामनराव चोरघडे यांच्या लेखनचा वारसा त्यांना लाभला. त्यांनी लेखन केलेल्या श्रुतिका, नभोनाट्य यांचे प्रसारण नेहमी नागपूर आकाशवाणीवरून होत असे. मराठी, संस्कृत भाषेमध्ये त्यांचे धर्म अध्यात्मावरील स्वतंत्र लेखनासह संपादित व अनुवादित केलेले त्यांचे १७ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. ३० पेक्षा जास्त पुस्तकांना त्यांनी प्रस्तावना दिली असून वृत्तपत्रात त्यांचे अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. अनेक संस्कृत व मराठी नाटकांमध्ये त्यांनी अभिनयही केला होता.वेद-उपनिषदातील तत्त्व, आद्य शंकराचार्याचे दृष्टांत, ज्ञानेश्वरीतील ओव्या त्यांना पाठ होत्या. त्यांच्या या ज्ञानसाधनेमुळे नानासाहेब शेवाळकर यांनी त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षात ज्ञानसाधू ही पदवी बहाल करून त्यांचा सत्कार केला. विदर्भ साहित्य संघाचे सचिव असताना पहिला कीर्तन महोत्सव आयोजित करण्याचे काम त्यांनी केले. लोकमतच्या ‘अध्यात्म’ या सदरात त्यांनी अनेक वर्षे लेखन केले आहे.त्यांनी ज्येष्ठ नागरिक मंडळ (पश्चिम), पेन्शनर्स असोसिएशन, भागवत सेवा समिती, विनोबा विचार केंद्र, हनुमान मंदिर माधवनगर या संस्थांचे अध्यक्ष म्हणून कार्य केले आहे. त्यांना २०१० साली महाराष्ट्र शासनातर्फे कविकुलगुरू कालिदास संस्कृत साधना पुरस्काराने गौरविण्यात आले होते. अनेक पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :Deathमृत्यू