शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
3
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
4
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
7
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
8
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
9
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
10
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
11
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
12
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
13
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
14
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
15
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
16
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
17
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
18
'स्क्विड गेम'मधला गी ह्युन हिंदी सिनेमात दिसणार? अभिनेता ली जुंगने दिली प्रतिक्रिया
19
भारत रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेला पोटदुखी; ५००% टॅरिफसाठी विधेयक सादर, काय होणार आपल्यावर परिणाम?
20
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू

गुमगावजवळ रेल्वे रुळाला तडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 01:39 IST

नागपूरवरून केरळ एक्स्प्रेस जात असताना अचानक गुमगाव रेल्वेस्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याची बाब केरळ एक्स्प्रेसच्या लोकोपायलटच्या लक्षात आली.

ठळक मुद्देअनर्थ टळला : रेल्वे प्रशासन आणखी किती घेणार ‘रिस्क’

दयानंद पाईकराव ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरवरून केरळ एक्स्प्रेस जात असताना अचानक गुमगाव रेल्वेस्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याची बाब केरळ एक्स्प्रेसच्या लोकोपायलटच्या लक्षात आली. समयसूचकता दाखवून ही गंभीर बाब त्याने रेल्वे प्रशासनाला कळविल्यामुळे लगेच डागडुजी करण्यात आली.अन्यथा त्यानंतर काही मिनिटातच या मार्गावरून जाणाºया नंदीग्राम एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरण्याची दाट शक्यता होती. या घटनेवरून थर्ड लाईन किती गरजेची आहे, ही बाब प्रकर्षाने जाणवत असून रेल्वे प्रशासन आणखी किती ‘रिस्क’ घेऊन नागपूर-वर्धा मार्गावर रेल्वेगाड्या चालविणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.नागपूर-वर्धा थर्ड लाईनची अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. मागील पाच वर्षांपूर्वी या रेल्वे लाईनची मागणीही अर्थसंकल्पात मंजूर झाली. सध्या १०० रेल्वेगाड्या चालविण्याची क्षमता आहे. मात्र,या मार्गावरून १५० रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. गुरुवारी सकाळी नागपूर-वर्धा रेल्वे रुळ गुमगाव रेल्वेस्थानकाजवळ उखडलेला आढळल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. अन्यथा शेकडो प्रवाशांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला असता. थर्ड लाईनला मंजुरी मिळून जवळपास पाच वर्षे पूर्ण होऊनही ती पूर्ण न झाली नाही. थर्ड लाईन मंजूर होऊन तिचे काम अद्यापपर्यंत पूर्ण व्हावयास हवे होते.परंतु रेल्वे प्रशासनाच्या कासवगतीमुळे अद्यापही हे काम पूर्णत्वास येऊ शकले नाही. गुरुवारी सकाळी ६ वाजता केरळ एक्स्प्रेसच्या लोकोपायलटला रेल्वे रुळाला तडा गेल्याची बाब जाणवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या लोकोपायलटने केरळ एक्स्प्रेस कशीबशी पुढे नेली. परंतु त्याने त्वरित या बाबीची माहिती आॅपरेटींग विभागाला दिली. सकाळी ६.३० वाजता अभियांत्रिकी विभागाचे वरिष्ठ तसेच कनिष्ठ अभियंता आणि कर्मचारी तेथे पोहोचले. त्यांनी रेल्वे रुळाच्या डागडुजीचे काम हाती घेतले. तब्बल दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी तयार करण्यात आला. परंतु केरळ एक्स्प्रेसच्या लोकोपायलटचे याकडे दुर्लक्ष झाले असते तर नंदीग्राम एक्स्प्रेस रुळावरून घसरून मोठी दुर्घटना टळली असते हे विशेष. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गंभीर बाब असलेल्या नागपूर-वर्धा थर्डलाईनच्या कामाला गती देण्याची गरज निर्माण झाली आहे.गाड्या वेळेवर चालविण्याचा प्रयत्न‘विभागात सर्व गाड्या वेळेवर चालविण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न असतो. एखादी घटना घडल्यास तेथे त्वरित काम करून तो मार्ग वाहतुकीसाठी खुला करून देण्यात येतो. त्यामुळे नंदीग्राम एक्स्प्रेस जाताना फ्रॅक्चर आढळल्यामुळे लगेच काम हाती घेऊन डागडुजी करण्यात आली.’प्रवीण पाटील, जनसंपर्क अधिकारी,रेल्वे प्रशासनाने खबरदारी घेण्याची गरज‘एखादा रेल्वेमार्ग खूप व्यस्त असल्यास त्या मार्गावरून किती रेल्वेगाड्या चालवायच्या हा रेल्वे बोर्डाचा आणि प्रशासनाचा विषय आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेशी तडजोड न करता रेल्वे प्रशासनाने हा विषय हाताळण्याची गरज आहे.’-विनोद चतुर्वेदी, विभागीय अध्यक्ष सेंट्रल रेल्वे मजदूर संघ, नागपूर विभाग