शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
3
“आगे बढ़ते रहो, ऐसाही बदला लेते रहो”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर शहीद नरवाल कुटुंबाने व्यक्त केला आनंद
4
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
5
Operation Sindoor: 'जय हिंद', राहुल गांधींची पाकिस्तानातील एअर स्ट्राईकनंतर पहिली पोस्ट; काय म्हणाले? 
6
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
7
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
8
"जय हिंद की सेना...!", 'ऑपरेशन सिंदूर'वर रितेश देशमुखचं रात्री ३ वाजून २ मिनिटांनी ट्विट
9
"अब मिट्टी में मिल जाओगे...", भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'चं देवोलिनानं केलं कौतुक
10
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
11
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
12
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
13
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
14
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
15
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
16
Operation Sindoor: "माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
17
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
18
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
19
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
20
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली

गुमगावजवळ रेल्वे रुळाला तडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 01:39 IST

नागपूरवरून केरळ एक्स्प्रेस जात असताना अचानक गुमगाव रेल्वेस्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याची बाब केरळ एक्स्प्रेसच्या लोकोपायलटच्या लक्षात आली.

ठळक मुद्देअनर्थ टळला : रेल्वे प्रशासन आणखी किती घेणार ‘रिस्क’

दयानंद पाईकराव ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरवरून केरळ एक्स्प्रेस जात असताना अचानक गुमगाव रेल्वेस्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याची बाब केरळ एक्स्प्रेसच्या लोकोपायलटच्या लक्षात आली. समयसूचकता दाखवून ही गंभीर बाब त्याने रेल्वे प्रशासनाला कळविल्यामुळे लगेच डागडुजी करण्यात आली.अन्यथा त्यानंतर काही मिनिटातच या मार्गावरून जाणाºया नंदीग्राम एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरण्याची दाट शक्यता होती. या घटनेवरून थर्ड लाईन किती गरजेची आहे, ही बाब प्रकर्षाने जाणवत असून रेल्वे प्रशासन आणखी किती ‘रिस्क’ घेऊन नागपूर-वर्धा मार्गावर रेल्वेगाड्या चालविणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.नागपूर-वर्धा थर्ड लाईनची अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. मागील पाच वर्षांपूर्वी या रेल्वे लाईनची मागणीही अर्थसंकल्पात मंजूर झाली. सध्या १०० रेल्वेगाड्या चालविण्याची क्षमता आहे. मात्र,या मार्गावरून १५० रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. गुरुवारी सकाळी नागपूर-वर्धा रेल्वे रुळ गुमगाव रेल्वेस्थानकाजवळ उखडलेला आढळल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. अन्यथा शेकडो प्रवाशांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला असता. थर्ड लाईनला मंजुरी मिळून जवळपास पाच वर्षे पूर्ण होऊनही ती पूर्ण न झाली नाही. थर्ड लाईन मंजूर होऊन तिचे काम अद्यापपर्यंत पूर्ण व्हावयास हवे होते.परंतु रेल्वे प्रशासनाच्या कासवगतीमुळे अद्यापही हे काम पूर्णत्वास येऊ शकले नाही. गुरुवारी सकाळी ६ वाजता केरळ एक्स्प्रेसच्या लोकोपायलटला रेल्वे रुळाला तडा गेल्याची बाब जाणवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या लोकोपायलटने केरळ एक्स्प्रेस कशीबशी पुढे नेली. परंतु त्याने त्वरित या बाबीची माहिती आॅपरेटींग विभागाला दिली. सकाळी ६.३० वाजता अभियांत्रिकी विभागाचे वरिष्ठ तसेच कनिष्ठ अभियंता आणि कर्मचारी तेथे पोहोचले. त्यांनी रेल्वे रुळाच्या डागडुजीचे काम हाती घेतले. तब्बल दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी तयार करण्यात आला. परंतु केरळ एक्स्प्रेसच्या लोकोपायलटचे याकडे दुर्लक्ष झाले असते तर नंदीग्राम एक्स्प्रेस रुळावरून घसरून मोठी दुर्घटना टळली असते हे विशेष. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गंभीर बाब असलेल्या नागपूर-वर्धा थर्डलाईनच्या कामाला गती देण्याची गरज निर्माण झाली आहे.गाड्या वेळेवर चालविण्याचा प्रयत्न‘विभागात सर्व गाड्या वेळेवर चालविण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न असतो. एखादी घटना घडल्यास तेथे त्वरित काम करून तो मार्ग वाहतुकीसाठी खुला करून देण्यात येतो. त्यामुळे नंदीग्राम एक्स्प्रेस जाताना फ्रॅक्चर आढळल्यामुळे लगेच काम हाती घेऊन डागडुजी करण्यात आली.’प्रवीण पाटील, जनसंपर्क अधिकारी,रेल्वे प्रशासनाने खबरदारी घेण्याची गरज‘एखादा रेल्वेमार्ग खूप व्यस्त असल्यास त्या मार्गावरून किती रेल्वेगाड्या चालवायच्या हा रेल्वे बोर्डाचा आणि प्रशासनाचा विषय आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेशी तडजोड न करता रेल्वे प्रशासनाने हा विषय हाताळण्याची गरज आहे.’-विनोद चतुर्वेदी, विभागीय अध्यक्ष सेंट्रल रेल्वे मजदूर संघ, नागपूर विभाग