शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएसटी’ लागू झाल्यावर वाढेल देशाचा महसूल

By admin | Updated: April 15, 2017 02:34 IST

देशात आम्ही सत्तेवर आलो त्यावेळी देशाचा एकूण महसूल १३ लाख कोटी रुपये इतका होता.

नितीन गडकरी : ‘आयआयएम-नागपूर’चा पहिला दीक्षांत समारंभ साजरा नागपूर : देशात आम्ही सत्तेवर आलो त्यावेळी देशाचा एकूण महसूल १३ लाख कोटी रुपये इतका होता. आता हा आकडा वाढून २० लाख कोटींवर पोहोचला आहे. मात्र ‘जीएसटी’ लागू झाल्यानंतर देशात आर्थिक क्रांती येईल व पुढील दोन वर्षांत देशाचा महसूल २८ लाख कोटी रुपयांपर्यंत जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी केले. ‘आयआयएम-नागपूर’च्या पहिल्या ‘बॅच’च्या दीक्षांत समारंभाचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. ‘व्हीएनआयटी’च्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला ‘आयआयएम’च्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष सी.पी. गुरुनानी, संचालक प्रा. एल.एस. मूर्ती, ‘आयआयएम अहमदाबाद’चे संचालक प्रा.आशिष नंदा प्रामुख्याने उपस्थित होते. देशाच्या विकासात तरुणांची मौलिक भूमिका आहे. मोठ्या पदांवर गेल्यानंतर आपल्या सहकाऱ्यांसोबत संवाद घटतो. देशाच्या विकासाच्या दृष्टीने विचार करत असताना संवाद, सहकार्य आणि समन्वयाने कार्य करण्याची तयारी ठेवली पाहिजे. ‘आयआयएम’मधून बाहेर पडल्यानंतर नोकरी मागणारे बनण्याऐवजी रोजगार निर्माते बना, असे आवाहन यावेळी गडकरी यांनी केले. नागपूर शैक्षणिक हब बनत आहे. येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण उपलब्ध होत आहे. त्यामुळे ‘आयआयएम-नागपूर’ने आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित संस्था होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी नेहमी स्वप्न पाहिले पाहिजेत. मात्र डोळे उघडे ठेवून त्यांच्या पूर्ततेसाठी झटले पाहिजे. जर शाश्वत यश हवे असेल तर ‘शॉर्टकट’च्या मागे न जाता मेहनतीने समोर गेले पाहिजे, असे प्रा.मूर्ती म्हणाले. ‘आयआयएम-नागपूर’च्या पहिल्या ‘बॅच’च्या ५३ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. सौमीत मिश्रा याला ‘स्कॉलिस्टीक परफॉर्मन्सह्णसाठी तर ‘बेस्ट आॅलराऊंडरह्ण म्हणून सूचक ध्रुव भरतभाई यास सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले. (प्रतिनिधी) ३३ विमानतळ बनणार देशांतर्गत दळणवळण वाढविण्याची गरज आहे. हीच बाब लक्षात घेऊन केंद्र शासनाने प्रादेशिक ‘कनेक्टिव्हिटी’साठी चार हजार कोटी रुपये दिले आहेत. २१० कोटी रुपयांत ३३ विमानतळ बनविण्यात येतील. येत्या तीन व चार महिन्यांत ‘सी-प्लेन’देखील सुरू होईल, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. ‘आयएएस’ होणार : सौमित मिश्रा सौमित मिश्रा हा विद्यार्थी ‘आयआयएम-नागपूर’च्या पहिल्या सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. यानंतर ‘डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स’ या विषयात ‘पीएचडी’ करायची आहे. त्यानंतर ‘आयएएस’ होण्याचे माझे ध्येय आहे. ‘पीएचडी’ करणार : सूचक ध्रुव भरतभाई ‘आयआयएम-नागपूर’ची पहिलीच ‘बॅच’ असली गुणवत्तेत कुठेही कमतरता नव्हती. माझी ‘कॅम्पस प्लेसमेंट’च्या माध्यमातून एका कंपनीत निवड झाली आहे. भविष्यात मला ‘आॅपरेशनल मॅनेजमेंट’मध्ये ‘पीएचडी’ करायची आहे, अशी प्रतिक्रिया सूचक ध्रुव भरतभाई या विद्यार्थ्याने दिली.