शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएसटी’ लागू झाल्यावर वाढेल देशाचा महसूल

By admin | Updated: April 15, 2017 02:34 IST

देशात आम्ही सत्तेवर आलो त्यावेळी देशाचा एकूण महसूल १३ लाख कोटी रुपये इतका होता.

नितीन गडकरी : ‘आयआयएम-नागपूर’चा पहिला दीक्षांत समारंभ साजरा नागपूर : देशात आम्ही सत्तेवर आलो त्यावेळी देशाचा एकूण महसूल १३ लाख कोटी रुपये इतका होता. आता हा आकडा वाढून २० लाख कोटींवर पोहोचला आहे. मात्र ‘जीएसटी’ लागू झाल्यानंतर देशात आर्थिक क्रांती येईल व पुढील दोन वर्षांत देशाचा महसूल २८ लाख कोटी रुपयांपर्यंत जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी केले. ‘आयआयएम-नागपूर’च्या पहिल्या ‘बॅच’च्या दीक्षांत समारंभाचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. ‘व्हीएनआयटी’च्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला ‘आयआयएम’च्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष सी.पी. गुरुनानी, संचालक प्रा. एल.एस. मूर्ती, ‘आयआयएम अहमदाबाद’चे संचालक प्रा.आशिष नंदा प्रामुख्याने उपस्थित होते. देशाच्या विकासात तरुणांची मौलिक भूमिका आहे. मोठ्या पदांवर गेल्यानंतर आपल्या सहकाऱ्यांसोबत संवाद घटतो. देशाच्या विकासाच्या दृष्टीने विचार करत असताना संवाद, सहकार्य आणि समन्वयाने कार्य करण्याची तयारी ठेवली पाहिजे. ‘आयआयएम’मधून बाहेर पडल्यानंतर नोकरी मागणारे बनण्याऐवजी रोजगार निर्माते बना, असे आवाहन यावेळी गडकरी यांनी केले. नागपूर शैक्षणिक हब बनत आहे. येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण उपलब्ध होत आहे. त्यामुळे ‘आयआयएम-नागपूर’ने आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित संस्था होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी नेहमी स्वप्न पाहिले पाहिजेत. मात्र डोळे उघडे ठेवून त्यांच्या पूर्ततेसाठी झटले पाहिजे. जर शाश्वत यश हवे असेल तर ‘शॉर्टकट’च्या मागे न जाता मेहनतीने समोर गेले पाहिजे, असे प्रा.मूर्ती म्हणाले. ‘आयआयएम-नागपूर’च्या पहिल्या ‘बॅच’च्या ५३ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. सौमीत मिश्रा याला ‘स्कॉलिस्टीक परफॉर्मन्सह्णसाठी तर ‘बेस्ट आॅलराऊंडरह्ण म्हणून सूचक ध्रुव भरतभाई यास सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले. (प्रतिनिधी) ३३ विमानतळ बनणार देशांतर्गत दळणवळण वाढविण्याची गरज आहे. हीच बाब लक्षात घेऊन केंद्र शासनाने प्रादेशिक ‘कनेक्टिव्हिटी’साठी चार हजार कोटी रुपये दिले आहेत. २१० कोटी रुपयांत ३३ विमानतळ बनविण्यात येतील. येत्या तीन व चार महिन्यांत ‘सी-प्लेन’देखील सुरू होईल, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. ‘आयएएस’ होणार : सौमित मिश्रा सौमित मिश्रा हा विद्यार्थी ‘आयआयएम-नागपूर’च्या पहिल्या सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. यानंतर ‘डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स’ या विषयात ‘पीएचडी’ करायची आहे. त्यानंतर ‘आयएएस’ होण्याचे माझे ध्येय आहे. ‘पीएचडी’ करणार : सूचक ध्रुव भरतभाई ‘आयआयएम-नागपूर’ची पहिलीच ‘बॅच’ असली गुणवत्तेत कुठेही कमतरता नव्हती. माझी ‘कॅम्पस प्लेसमेंट’च्या माध्यमातून एका कंपनीत निवड झाली आहे. भविष्यात मला ‘आॅपरेशनल मॅनेजमेंट’मध्ये ‘पीएचडी’ करायची आहे, अशी प्रतिक्रिया सूचक ध्रुव भरतभाई या विद्यार्थ्याने दिली.