शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी सदोष, पण दीर्घकाळासाठी चांगला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 01:43 IST

श्री श्री रविशंकर यांचे मत :ऑनलाईन लोकमत नागपूर : देशामध्ये अनेक धोरणे वातानुकूलित खोलीत बसून तयार केली जातात. अशी धोरणे वास्तविकतेच्या कसोटीत खरी उतरत नाहीत. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू करण्याचा निर्णयही असाच आहे. हा कायदा सदोष आहे, पण त्रुटी दूर केल्यास तो व्यापाºयांना ...

ठळक मुद्देव्यावसायिक नैतिकतेवर व्यापाऱ्यांना मार्गदर्शन

श्री श्री रविशंकर यांचे मत :ऑनलाईन लोकमत नागपूर : देशामध्ये अनेक धोरणे वातानुकूलित खोलीत बसून तयार केली जातात. अशी धोरणे वास्तविकतेच्या कसोटीत खरी उतरत नाहीत. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू करण्याचा निर्णयही असाच आहे. हा कायदा सदोष आहे, पण त्रुटी दूर केल्यास तो व्यापाºयांना दीर्घकाळासाठी लाभदायक ठरेल असे मत आर्ट आॅफ लिव्हिंगचे संस्थापक व अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केले.सीताबर्डीतील एका मॉलमध्ये येथे रविवारी ‘व्यावसायिक नैतिकता व भरभराटी’ विषयावर श्री श्री रविशंकर यांचा मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर स्वत:ची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी नोटाबंदी व हा निर्णय घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली. नोटाबंदीमुळे काळे धन व दहशतवादावर नियंत्रण मिळविण्यात यश आले. नरेंद्र मोदी हे असे धाडसी निर्णय घेणारे एकमेव पंतप्रधान आहेत. सर्वांनी मिळून त्यांचे हात बळकट केले पाहिजे असे रविशंकर यांनी सांगितले.शेतकºयांच्या आत्महत्यांसाठी अर्थव्यवस्थेतील दोष कारणीभूत आहेत. भारतामध्ये कर्जावर सर्वाधिक व्याज आकारले जाते. जगात कोणत्याही देशात एवढे व्याज नाही. अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. सामाजिक व वैचारिक क्रांती फार पूर्वीच झाली आहे. आर्थिक क्रांतीमध्ये आपण मागे आहोत. भारत गरीब नव्हता, पण इंग्रजांनी संपत्ती लुटून नेल्यामुळे आपल्याला अर्थव्यवस्थेत संघर्ष करावा लागत आहे असे रविशंकर यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी त्यांनी व्यापाºयांच्या विविध प्रश्नांना उत्तरेही दिली.अपघाताने गुरुजी झालोएका लहान मुलाने रविशंकर यांना आपण गुरुजी होण्याचा विचार कधी केला असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना रविशंकर यांनी आपण अपघाताने गुरुजी झालो असे सांगितले. अंतर्मनातील शुद्धता समाजाला सतत चांगले मार्गदर्शन करण्याची प्रेरणा देत असे. त्यातून गुरुजी होण्याकडे वाटचाल सुरू झाली अशी माहिती त्यांनी दिली.