शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
3
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
4
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
5
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
6
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
7
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
8
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
9
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
10
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
11
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
12
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
13
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
14
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
15
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
16
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
17
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
18
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
19
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
20
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'

जीएसटी सदोष, पण दीर्घकाळासाठी चांगला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 01:43 IST

श्री श्री रविशंकर यांचे मत :ऑनलाईन लोकमत नागपूर : देशामध्ये अनेक धोरणे वातानुकूलित खोलीत बसून तयार केली जातात. अशी धोरणे वास्तविकतेच्या कसोटीत खरी उतरत नाहीत. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू करण्याचा निर्णयही असाच आहे. हा कायदा सदोष आहे, पण त्रुटी दूर केल्यास तो व्यापाºयांना ...

ठळक मुद्देव्यावसायिक नैतिकतेवर व्यापाऱ्यांना मार्गदर्शन

श्री श्री रविशंकर यांचे मत :ऑनलाईन लोकमत नागपूर : देशामध्ये अनेक धोरणे वातानुकूलित खोलीत बसून तयार केली जातात. अशी धोरणे वास्तविकतेच्या कसोटीत खरी उतरत नाहीत. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू करण्याचा निर्णयही असाच आहे. हा कायदा सदोष आहे, पण त्रुटी दूर केल्यास तो व्यापाºयांना दीर्घकाळासाठी लाभदायक ठरेल असे मत आर्ट आॅफ लिव्हिंगचे संस्थापक व अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केले.सीताबर्डीतील एका मॉलमध्ये येथे रविवारी ‘व्यावसायिक नैतिकता व भरभराटी’ विषयावर श्री श्री रविशंकर यांचा मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर स्वत:ची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी नोटाबंदी व हा निर्णय घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली. नोटाबंदीमुळे काळे धन व दहशतवादावर नियंत्रण मिळविण्यात यश आले. नरेंद्र मोदी हे असे धाडसी निर्णय घेणारे एकमेव पंतप्रधान आहेत. सर्वांनी मिळून त्यांचे हात बळकट केले पाहिजे असे रविशंकर यांनी सांगितले.शेतकºयांच्या आत्महत्यांसाठी अर्थव्यवस्थेतील दोष कारणीभूत आहेत. भारतामध्ये कर्जावर सर्वाधिक व्याज आकारले जाते. जगात कोणत्याही देशात एवढे व्याज नाही. अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. सामाजिक व वैचारिक क्रांती फार पूर्वीच झाली आहे. आर्थिक क्रांतीमध्ये आपण मागे आहोत. भारत गरीब नव्हता, पण इंग्रजांनी संपत्ती लुटून नेल्यामुळे आपल्याला अर्थव्यवस्थेत संघर्ष करावा लागत आहे असे रविशंकर यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी त्यांनी व्यापाºयांच्या विविध प्रश्नांना उत्तरेही दिली.अपघाताने गुरुजी झालोएका लहान मुलाने रविशंकर यांना आपण गुरुजी होण्याचा विचार कधी केला असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना रविशंकर यांनी आपण अपघाताने गुरुजी झालो असे सांगितले. अंतर्मनातील शुद्धता समाजाला सतत चांगले मार्गदर्शन करण्याची प्रेरणा देत असे. त्यातून गुरुजी होण्याकडे वाटचाल सुरू झाली अशी माहिती त्यांनी दिली.