शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

जीएसटी सदोष, पण दीर्घकाळासाठी चांगला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 01:43 IST

श्री श्री रविशंकर यांचे मत :ऑनलाईन लोकमत नागपूर : देशामध्ये अनेक धोरणे वातानुकूलित खोलीत बसून तयार केली जातात. अशी धोरणे वास्तविकतेच्या कसोटीत खरी उतरत नाहीत. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू करण्याचा निर्णयही असाच आहे. हा कायदा सदोष आहे, पण त्रुटी दूर केल्यास तो व्यापाºयांना ...

ठळक मुद्देव्यावसायिक नैतिकतेवर व्यापाऱ्यांना मार्गदर्शन

श्री श्री रविशंकर यांचे मत :ऑनलाईन लोकमत नागपूर : देशामध्ये अनेक धोरणे वातानुकूलित खोलीत बसून तयार केली जातात. अशी धोरणे वास्तविकतेच्या कसोटीत खरी उतरत नाहीत. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू करण्याचा निर्णयही असाच आहे. हा कायदा सदोष आहे, पण त्रुटी दूर केल्यास तो व्यापाºयांना दीर्घकाळासाठी लाभदायक ठरेल असे मत आर्ट आॅफ लिव्हिंगचे संस्थापक व अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केले.सीताबर्डीतील एका मॉलमध्ये येथे रविवारी ‘व्यावसायिक नैतिकता व भरभराटी’ विषयावर श्री श्री रविशंकर यांचा मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर स्वत:ची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी नोटाबंदी व हा निर्णय घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली. नोटाबंदीमुळे काळे धन व दहशतवादावर नियंत्रण मिळविण्यात यश आले. नरेंद्र मोदी हे असे धाडसी निर्णय घेणारे एकमेव पंतप्रधान आहेत. सर्वांनी मिळून त्यांचे हात बळकट केले पाहिजे असे रविशंकर यांनी सांगितले.शेतकºयांच्या आत्महत्यांसाठी अर्थव्यवस्थेतील दोष कारणीभूत आहेत. भारतामध्ये कर्जावर सर्वाधिक व्याज आकारले जाते. जगात कोणत्याही देशात एवढे व्याज नाही. अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. सामाजिक व वैचारिक क्रांती फार पूर्वीच झाली आहे. आर्थिक क्रांतीमध्ये आपण मागे आहोत. भारत गरीब नव्हता, पण इंग्रजांनी संपत्ती लुटून नेल्यामुळे आपल्याला अर्थव्यवस्थेत संघर्ष करावा लागत आहे असे रविशंकर यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी त्यांनी व्यापाºयांच्या विविध प्रश्नांना उत्तरेही दिली.अपघाताने गुरुजी झालोएका लहान मुलाने रविशंकर यांना आपण गुरुजी होण्याचा विचार कधी केला असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना रविशंकर यांनी आपण अपघाताने गुरुजी झालो असे सांगितले. अंतर्मनातील शुद्धता समाजाला सतत चांगले मार्गदर्शन करण्याची प्रेरणा देत असे. त्यातून गुरुजी होण्याकडे वाटचाल सुरू झाली अशी माहिती त्यांनी दिली.