शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

जीएसटीने खाल्ली भाजी, जेवणार कसे?

By admin | Updated: July 17, 2017 02:22 IST

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्याच्या सामाजिक न्याय

संत चोखामेळा वसतिगृहातील वास्तव सोर्इंच्या देखभालीकडे दुर्लक्ष वसतिगृहाच्या विकासाला घेऊन शासन उदासीनसुमेध वाघमारे / आनंद डेकाटे । लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्याच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शहरात ११ वसतिगृहे चालविली जातात. विदर्भातील ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी उच्च शिक्षणाचे स्वप्न घेऊन या वसतिगृहालाच आपले घर समजतात. शासनही या वसतिगृहांवर कोट्यावधी रुपयांचा खर्च करते. परंतु प्रत्यक्षात सोर्इंच्या देखभालीकडेच दुर्लक्ष झाल्याने विद्यार्थ्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे वसतिगृहांमधील चित्र आहे. विशेष म्हणजे, जसे चालते आहे, तसे चालू द्या, या प्रकारातून या वसतिगृहांकडे पाहिले जात आहे. यामुळे विकास खोळंबला आहे. धक्कादायक म्हणजे, जेवणावरच वस्तू व सेवाकर (जीएसटी) लावून ताटातील एक भाजी कमी केल्याने विद्यार्थ्यांच्या पोषणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘लोकमत’ चमूने रविवारी दीक्षाभूमी चौकातील शासकीय संत चोखामेळा वसतिगृह व याच परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, भगवाननगरच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता त्यांनी समस्यांचा पाढाच वाचला. महिन्याकाठी मिळणारा प्रति विद्यार्थी ८०० रुपये निर्वाह भत्ता चार महिने होऊनही मिळाला नाही. वसतिगृहाच्या छताला व भिंतीवर शेवाळ उगवले आहे. स्वच्छतागृहाला गळती लागली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ‘जीम’ बंद पडली आहे. शुद्ध पाण्याची समस्या आहे. उखडलेल्या टाईल्स व वसतिगृहाच्या देखभालीकडे साफ दुर्लक्ष झाले आहे.जीम बंद, वाय-फायची प्रतीक्षाविद्यार्थ्यांना व्यायामाची गोडी निर्माण व्हावी म्हणून ‘मेस’मध्येच जीम सुरू करण्यात आली. परंतु याच्याही देखभालीकडे दुर्लक्ष झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून जीम बंद पडली आहे. १२० विद्यार्थ्यांसाठी केवळ चार संगणक आहे. यातील दोन नादुरुस्त आहेत. इंटरनेट असून नसल्यासारखे आहे. शासनाने अलिकडेच सर्व वसतिगृहे ‘वाय-फाय’शी जोडण्याची घोषणा केली होती, परंतु ही घोषणा अद्यापही गुलदस्त्यात असल्याचे येथील विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.