शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जीएसटीने खाल्ली भाजी, जेवणार कसे?

By admin | Updated: July 17, 2017 02:22 IST

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्याच्या सामाजिक न्याय

संत चोखामेळा वसतिगृहातील वास्तव सोर्इंच्या देखभालीकडे दुर्लक्ष वसतिगृहाच्या विकासाला घेऊन शासन उदासीनसुमेध वाघमारे / आनंद डेकाटे । लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्याच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शहरात ११ वसतिगृहे चालविली जातात. विदर्भातील ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी उच्च शिक्षणाचे स्वप्न घेऊन या वसतिगृहालाच आपले घर समजतात. शासनही या वसतिगृहांवर कोट्यावधी रुपयांचा खर्च करते. परंतु प्रत्यक्षात सोर्इंच्या देखभालीकडेच दुर्लक्ष झाल्याने विद्यार्थ्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे वसतिगृहांमधील चित्र आहे. विशेष म्हणजे, जसे चालते आहे, तसे चालू द्या, या प्रकारातून या वसतिगृहांकडे पाहिले जात आहे. यामुळे विकास खोळंबला आहे. धक्कादायक म्हणजे, जेवणावरच वस्तू व सेवाकर (जीएसटी) लावून ताटातील एक भाजी कमी केल्याने विद्यार्थ्यांच्या पोषणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘लोकमत’ चमूने रविवारी दीक्षाभूमी चौकातील शासकीय संत चोखामेळा वसतिगृह व याच परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, भगवाननगरच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता त्यांनी समस्यांचा पाढाच वाचला. महिन्याकाठी मिळणारा प्रति विद्यार्थी ८०० रुपये निर्वाह भत्ता चार महिने होऊनही मिळाला नाही. वसतिगृहाच्या छताला व भिंतीवर शेवाळ उगवले आहे. स्वच्छतागृहाला गळती लागली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ‘जीम’ बंद पडली आहे. शुद्ध पाण्याची समस्या आहे. उखडलेल्या टाईल्स व वसतिगृहाच्या देखभालीकडे साफ दुर्लक्ष झाले आहे.जीम बंद, वाय-फायची प्रतीक्षाविद्यार्थ्यांना व्यायामाची गोडी निर्माण व्हावी म्हणून ‘मेस’मध्येच जीम सुरू करण्यात आली. परंतु याच्याही देखभालीकडे दुर्लक्ष झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून जीम बंद पडली आहे. १२० विद्यार्थ्यांसाठी केवळ चार संगणक आहे. यातील दोन नादुरुस्त आहेत. इंटरनेट असून नसल्यासारखे आहे. शासनाने अलिकडेच सर्व वसतिगृहे ‘वाय-फाय’शी जोडण्याची घोषणा केली होती, परंतु ही घोषणा अद्यापही गुलदस्त्यात असल्याचे येथील विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.