शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
3
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
4
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
5
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
6
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
7
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
8
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
9
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
10
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
11
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
12
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
13
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
14
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
15
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ
16
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
17
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
18
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
20
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story

नागपूर जिल्ह्यातील टाकळघाट येथे भूजल पातळीत सहा फुटांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 12:48 IST

जलयुक्त शिवार योजनेमुळे हिंगणा तालुक्यातील टाकळघाटसह विविध गावांना प्रचंड फायदा झाला आहे. या परिसरातील भूजल पातळीत सरासरी सहा फुटांनी वाढ झाली आहे.

ठळक मुद्देजलयुक्त अभियानाचे यश १२५ एकर जमिनीला शाश्वत सिंचनाचा लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जलयुक्त शिवार योजनेमुळे हिंगणा तालुक्यातील टाकळघाटसह विविध गावांना प्रचंड फायदा झाला आहे. या परिसरातील भूजल पातळीत सरासरी सहा फुटांनी वाढ झाली आहे. तर नाला खोलीकरणामुळे कोहळा रिठी या शिवारातील सुमारे १२५ एकर जमिनीला शाश्वत सिंचनाचा लाभ झाला. त्याचप्रमाणे गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील सुटला आहे.जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून नदी व नाल्याद्वारे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा शाश्वत सिंचनासाठी वापर करण्यासाठी मौजा खापरी (मोरे) ग्रामपंचायत अंतर्गत कोहळा (रिठी) या गावात योजना राबविण्यात आली. कोहळा रिठी या शिवारातून जाणाऱ्या नाल्यावर तीन ठिकाणी सिमेंट नाला बंधारे बांधण्यात आले असून जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे येथे ३६३.८१ ‘टीसीएम’ जलसाठा निर्माण झाला आहे.त्याचप्रमाणे हिंगणा तालुक्यातीलच मौजा खापरीमध्येदेखील जलयुक्त शिवार अंतर्गत विविध कामे करण्यात आली. येथील लोकांनादेखील मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध झाले.शेतकरी शेतातील पिके वाचविण्यासाठी जलयुक्तमुळे निर्माण झालेल्या जलसाठ्याचा मोठ्या प्रमाणात वापर करीत असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी दिली. जलयुक्त शिवार अभियानाच्या नियोजनापासून तर लोकसहभाग मिळविण्यासाठी तालुका कृषी अधिकारी महेश परांजपे, मंडळ अधिकारी संजय भगत, सुरेश मलघडे, कृषी पर्यवेक्षक विराज देशमुख व सहायक निरंजन गहूकर यांनी केलेल्या प्रयत्नामुळेच कोहळा रिठीचे शिवार जलयुक्त झाले आहे.

सोयाबीन झाले दुप्पटजलयुक्तमुळे उपलब्ध झालेल्या जलसाठ्यातून याच परिसरातील २० शेतकऱ्यांनी विजेच्या मशिनीद्वारे आपल्या शेतापर्यंत पाणी पोहोचविले आहे. यामुळे सोयाबीनचे उत्पादन दुप्पट झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा आमचे उत्पादन जास्त झाले असल्याची माहिती टाकळघाट येथील शेतकरी विजय राजबिंडे, गजानन सावरकर यांनी दिली.

टॅग्स :Waterपाणी