शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
3
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
4
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
5
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
6
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
7
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
8
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
9
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
10
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
11
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
12
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
13
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
14
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
15
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
16
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
17
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
18
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
19
जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 
20
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?

नागपूर जिल्ह्यातील टाकळघाट येथे भूजल पातळीत सहा फुटांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 12:48 IST

जलयुक्त शिवार योजनेमुळे हिंगणा तालुक्यातील टाकळघाटसह विविध गावांना प्रचंड फायदा झाला आहे. या परिसरातील भूजल पातळीत सरासरी सहा फुटांनी वाढ झाली आहे.

ठळक मुद्देजलयुक्त अभियानाचे यश १२५ एकर जमिनीला शाश्वत सिंचनाचा लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जलयुक्त शिवार योजनेमुळे हिंगणा तालुक्यातील टाकळघाटसह विविध गावांना प्रचंड फायदा झाला आहे. या परिसरातील भूजल पातळीत सरासरी सहा फुटांनी वाढ झाली आहे. तर नाला खोलीकरणामुळे कोहळा रिठी या शिवारातील सुमारे १२५ एकर जमिनीला शाश्वत सिंचनाचा लाभ झाला. त्याचप्रमाणे गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील सुटला आहे.जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून नदी व नाल्याद्वारे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा शाश्वत सिंचनासाठी वापर करण्यासाठी मौजा खापरी (मोरे) ग्रामपंचायत अंतर्गत कोहळा (रिठी) या गावात योजना राबविण्यात आली. कोहळा रिठी या शिवारातून जाणाऱ्या नाल्यावर तीन ठिकाणी सिमेंट नाला बंधारे बांधण्यात आले असून जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे येथे ३६३.८१ ‘टीसीएम’ जलसाठा निर्माण झाला आहे.त्याचप्रमाणे हिंगणा तालुक्यातीलच मौजा खापरीमध्येदेखील जलयुक्त शिवार अंतर्गत विविध कामे करण्यात आली. येथील लोकांनादेखील मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध झाले.शेतकरी शेतातील पिके वाचविण्यासाठी जलयुक्तमुळे निर्माण झालेल्या जलसाठ्याचा मोठ्या प्रमाणात वापर करीत असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी दिली. जलयुक्त शिवार अभियानाच्या नियोजनापासून तर लोकसहभाग मिळविण्यासाठी तालुका कृषी अधिकारी महेश परांजपे, मंडळ अधिकारी संजय भगत, सुरेश मलघडे, कृषी पर्यवेक्षक विराज देशमुख व सहायक निरंजन गहूकर यांनी केलेल्या प्रयत्नामुळेच कोहळा रिठीचे शिवार जलयुक्त झाले आहे.

सोयाबीन झाले दुप्पटजलयुक्तमुळे उपलब्ध झालेल्या जलसाठ्यातून याच परिसरातील २० शेतकऱ्यांनी विजेच्या मशिनीद्वारे आपल्या शेतापर्यंत पाणी पोहोचविले आहे. यामुळे सोयाबीनचे उत्पादन दुप्पट झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा आमचे उत्पादन जास्त झाले असल्याची माहिती टाकळघाट येथील शेतकरी विजय राजबिंडे, गजानन सावरकर यांनी दिली.

टॅग्स :Waterपाणी