शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

नागपूर जिल्ह्यात भूजल पातळीत सरासरी ०.१३ मीटरने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 11:36 IST

नागपूर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून सरासरीहून अधिक पाऊस झाल्यामुळे भूजल पातळी वाढली आहे. यावर्षी जिल्ह्यातील भूजल पातळी पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत ०.१३ मीटरने वाढल्याचे दिसून आले आहे.

ठळक मुद्देभूजल सर्वेक्षण विभागाचा निष्कर्ष पाच वर्षांत परिस्थिती चांगली

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून सरासरीहून अधिक पाऊस झाल्यामुळे भूजल पातळी वाढली आहे. यावर्षी जिल्ह्यातील भूजल पातळी पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत ०.१३ मीटरने वाढल्याचे दिसून आले आहे.

जानेवारीतील गेल्या पाच वर्षांतील पाणीपातळीची सरासरी ५.१३ मीटर होती. यंदा भूजल सर्वेक्षण विभागाकडून जिल्ह्यातील एकूण १११ विहिरींचे निरीक्षण केले. विभागाकडे पाणीपातळीचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यात नमूद केल्यानुसार पाणीपातळीमध्ये मागील पाच वर्षांच्या जानेवारी महिन्याच्या पाणीपातळीच्या तुलनेत जानेवारी २०२१ मध्ये जवळपास ०.१३ मीटरने वाढ झाली आहे. जिल्ह्यात एकूण पाणीपातळी सध्या ५.०० मीटर आली आहे. भूजल विभागातील भूवैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार औद्योगिक किंवा सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याचा पुन्हा वापर केल्यास भूजलावर अतिरिक्त ताण पडणार नाही व नागरिकांना पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होत राहील.

यावर्षी भूजल पातळी पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत वाढली असली, तरी ती टिकविण्यासाठी जिल्हावासीयांना पाण्याचा अपव्यय टाळावा लागणार आहे. २०२० मध्ये झालेल्या पावसामुळे अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे जमिनीत पाणी मुरल्याने भूजल पातळीत वाढ दिसून येत आहे. याशिवाय, कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन होता. त्यावेळी उद्योगधंदे, कारखाने बंद होते. यामुळे पाण्याचा उपसाही कमी होता.

पाच तालुक्यांत घट

- जिल्ह्यातील हिंगणा, कामठी, मौदा, नागपूर व उमरेड तालुक्याच्या पाणीपातळीमध्ये घट झाली आहे. तर, उर्वरित तालुक्यांमधील पातळीत अत्यल्प वाढ झाली आहे.

टॅग्स :Waterपाणी