शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

पूरग्रस्त शेतकऱ्यांनी केंद्रीय समितीसमोर मांडल्या व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 21:24 IST

केंद्र्राकडून आलेली समिती सध्या विदर्भाच्या पाहणी दौऱ्यावर असून पुरामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेत आहे. या चमूने शुक्रवारी नागपूर जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांना भेटी देऊन पाहणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र्राकडून आलेली समिती सध्या विदर्भाच्या पाहणी दौऱ्यावर असून पुरामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेत आहे. या चमूने शुक्रवारी नागपूर जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांना भेटी देऊन पाहणी केली. शेताच्या नुकसानीचाही आढावा घेतला. शनिवारी ही चमू भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात होती. दौऱ्यानंतर रविवारी आयुक्त कार्यालयात आढावा बैठक होेणार आहे.सहा सदस्यीय या समितीच्या दोन चमू करण्यात आल्या असून एका चमूने गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात पाहणी केली. तर दुसऱ्या चमूने नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यातील गावकरी आणि शेतकऱ्यांना भेटून आढावा घेतला. समितीने शुक्रवारी नागपूर जिल्ह्यातील कामठी, पारशिवनी, मौदा तालुक्यातील प्रभावित गावांना भेटू देऊन थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि माहिती जाणून घेतली. तर शनिवारी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात भेटी दिल्या.शुक्रवारी दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी या समितीने विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेऊन अधिकाऱ्यांकडून नुकसानाचा आढावा घेतला. त्यानंतर समितीचे सदस्य महेंद्र सहारे, एस.एस.मोदी आणि आर. पी. सिंह यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यासह कामठी तालुक्यातील सोनेगाव गाठले. या गावामध्ये पुरामुळे १५५ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. ३५४ घरांपैकी ११४ घरांचे नुकसान झाले. गावकऱ्यांनी समितीसमोर पुनर्वसनाची मागणी केली. धानाचे पीक हातून गेल्याची व्यथा गजानन झोड या शेतकऱ्याने मांडली. नामदेव राऊत यांचे संपूर्ण घरच पुरात वाहून गेले. मधुकर चौधरी यांची गाय वाहून गेली. अशोक महल्ले यांच्या संपूर्ण पऱ्हाटीचे नुकसान झाले.यानंतर समितीने निलज गावाला भेट देऊन समस्या समजून घेतल्या. जिल्हा परिषद सदस्य व्यंकटेश कारेमोरे, सरपंच सुभाष नाकाडे, उपसरपंच रवींद्र दोडके आदींनी पारशिवनी तालुक्यातील सिंगारदीप गावाच्या पुनर्वसनाची मागणी केली. इस्लामपुर माथनी गावातील नुकसानाचाही आढावा समितीने घेतला. यामध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, जिल्हा कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, उपविभागीय अधिकारी जोगद्र कट्यारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, पारशिवनीचे तहसीलदार वरुण सहारे, गटविकास अधिकारी बनमोटे आदी सहभागी होते.नॉनस्टाप पहाणीदुपारी १२.३० वाजता कामठी तालुक्यातील गावांपासूृन सुरू झालेली पहाणी रात्री ८.३० पर्यंत सुरूच होती. दौऱ्यातील अखेरचे गाव मौदा तालुक्यातील होते. येथे तर समितीने अंधारात भेट देऊन गावकऱ्यांशी चर्चा केली आणि परिस्थिती जाणून घेतली.विभागात ८८, ८६४ हेक्टर कृषी क्षेत्राचे नुकसानविभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी नागपूर विभागातील ३४ तालुक्यांमधील ८८ हजार ८६४ हेक्टर कृषी क्षेत्राचे पुरामुळे नुकसान झाल्याची माहिती दिली. विभागातील २३ हजार घरांची पडझड झाली असून धान, कापूस सोयाबीन पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याचे सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी