शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक तालुक्यात ‘ग्रीन बेल्ट’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 21:26 IST

पर्यावरण संवर्धन तसेच स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि नागरिक सुविधांच्या विकासासाठी जिल्हा खनिज प्रतिष्ठान विकास निधीमधून जिल्ह्याला १३५ कोटी रुपये प्राप्त झाले असून त्यापैकी ८५ कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे. पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येक तालुक्यात १० एकरावर ‘ग्रीन बेल्ट’ तयार करण्यासाठी प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी केली.

ठळक मुद्देप्रत्येक तालुक्याला पाच कोटीचा निधी : पालकमंत्र्यांची घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पर्यावरण संवर्धन तसेच स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि नागरिक सुविधांच्या विकासासाठी जिल्हा खनिज प्रतिष्ठान विकास निधीमधून जिल्ह्याला १३५ कोटी रुपये प्राप्त झाले असून त्यापैकी ८५ कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे. पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येक तालुक्यात १० एकरावर ‘ग्रीन बेल्ट’ तयार करण्यासाठी प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी केली.जिल्हाधिकारी कार्यालयातील शिवाजी सभागृहात जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत विकास कामांसाठी उपलब्ध झालेला निधी आढावा पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. त्यावेळी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी आ. डी. मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, अप्पर जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, जिल्हा खनिज कर्म अधिकारी श्रीराम कडू, प्रतिष्ठानचे सदस्य कौस्तुभ चॅटर्जी उपस्थित होते.जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत प्राप्त झालेला निधी सामूहिक व सामाजिक विकास, पायाभूत सुविधा, आरोग्य, पिण्याचे पाणी, जलसंसाधनाचा विकास तसेच पर्यावरण व स्वच्छतेसाठी प्राधान्याने करण्यात येत असून विभाग प्रमुखांनी प्राधान्यक्रम ठरवून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री बावनकुळे यांनी केल्या.उमरेड व रामटेक या तालुक्यातील भौतिक सुविधांच्या विकासासाठी प्रत्येकी १० कोटी रुपये डागा रुग्णालय इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय यांनी साधन सामुग्री व आवश्यक सुविधांसाठी निधी तसेच जिल्ह्यातील सर्व नळ पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्यासाठी निधीची उपलब्धता समाज कल्याण विभागातर्फे ११२५ लाभार्थ्यांना ट्रायसिकलचे वाटप, कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत आर्थिक प्रगतीसाठी विशेष उपक्रम राबविणे, पर्यावरण संवर्धनाअंतर्गत जागृती निर्माण करणे तालुकानिहाय विशेष निधी यावेळी मंजूर करण्यात आला.जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी माहिती दिली. जिल्हा खनिज कर्म अधिकारी श्रीराम कडू यांनी आभार मानले.सिंचन पुर्नस्थापनेसाठी तालुक्याला १० कोटीसिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी किरकोळ दुरुस्ती, शेतचाऱ्या पूर्ण करणे, गेट लावणे आदी कामांसाठी राळेगण सिद्धीच्या धर्तीवर खनिज प्रतिष्ठान निधीमधून दोन वर्षांचा विशेष कार्यक्रम तयार करण्यात येऊन १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी तालुकानिहाय प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी दिल्यात.

टॅग्स :environmentवातावरणChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे