शहरं
Join us  
Trending Stories
1
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
2
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
3
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
4
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
5
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
6
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
7
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
8
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
9
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
10
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
11
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
12
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
13
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
14
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
15
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
16
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
17
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
18
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
20
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण

‘ए’ रक्तगटाला कोरोनाचा धोका अधिक, ही निव्वळ अफवाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 11:07 IST

‘ए’ रक्तगट असलेल्यांना कोरोनाचा सर्वात अधिक धोका तर ‘ओ’ रक्तगट असलेल्या लोकांना कमी धोका असल्याचे समोर येत आहे. परंतु हे वृत्त चुकीचे असल्याचे प्रसिद्ध फिजिशियन डॉ. जय देशमुख यांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्दे यासंदर्भात कुठलेही पुरावे नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संशोधनाच्या नावाखाली आता कोरोना विषाणूची अफवा पसरवली जात आहे. यात ‘ए’ रक्तगट असलेल्यांना कोरोनाचा सर्वात अधिक धोका तर ‘ओ’ रक्तगट असलेल्या लोकांना कमी धोका असल्याचे समोर येत आहे. परंतु हे वृत्त चुकीचे असल्याचे प्रसिद्ध फिजिशियन डॉ. जय देशमुख यांचे म्हणणे आहे. त्यांच्यानुसार, या संदर्भात कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीत. कोरोनाची भीती पसरविण्याचे हे एक निमित्त असू शकते, असेही डॉ. देशमुख म्हणाले.एका ब्रिटिश वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, वुहानमधील वैज्ञानिकांनी सुमारे २१७३ कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांचा अभ्यास केला. यात सुमारे ३८ टक्के लोकांचा रक्तगट ‘ए’ होता. तर ‘ओ’ रक्तगट असलेल्या रुग्णांची २६ टक्के होती. या शिवाय, हुबेई प्रांतातील तीन रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये सुमारे २०६ लोकांचा मृत्यू झाला. यापैकी ८५ मृतांचा रक्तगट ‘ए’ होता. असेच संशोधन दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये करण्यात आले असता ‘ए’ रक्तगट असणारे लोकच कोरोनाचे जास्त बळी ठरल्याचे दिसून आल्याचेही वृत्तात म्हटले आहे. सध्या हे वृत्त ‘सोशल मीडियावर’ व्हायरल झाले आहे. ‘ए’ रक्तगट असलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे, तर ‘ओ’ रक्तगट असलेल्या लोकांना रान मोकळे झाले आहे.हे वृत्त मात्र चुकीचे असल्याचे डॉ. देशमुख यांचे म्हणणे आहे. त्यांच्यानुसार, वुहानमध्ये सर्वात जास्त नागरिक ‘ए’ आणि ‘ओ’ रक्तगटाचे आहेत. यामुळे तिथे तो अभ्यास झाला असलातरी भारतात तो लागू होईल असे नाही. तसेच या संदर्भातील प्रसिद्ध झालेली आकडेवारी वेगवेगळ्या ग्रुपवर वेगवेगळी आहे. महत्त्वाचे म्हणजे, या वृत्ताला घेऊन कुठलेही पुरावे सादर करण्यात आलेले नाहीत. यामुळे कुठलाही रक्तगट असला तरी प्रतिबंधात्मक उपाययोजना न केल्यास या रोगाची लागण होण्याची शक्यता असतेच. ‘जर’ तुमचा ‘ए’रक्तगट असेल तर घाबरून जाण्याचे कारण नाही. कारण कोरोना केवळ याच रक्तगटालाच होतो असेही पुरावे नाहीत. ‘ओ’ रक्तगट असणाऱ्या कोरोना होत नाही, ते पूर्णपणे सुरक्षित आहेत, असेही नाही. जर तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल, तुम्ही वारंवार हात धुवत असाल, स्वच्छता राखत असाल तर कोरोनाला घाबरण्याची गरज नाही. मात्र खबरदारी घेणे आवश्यक आहे, असेही डॉ. देशमुख म्हणाले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस