शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

भीषण अपघातात तरुणासह आजी-नातीचा मृत्यू; मुलगा गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2023 21:03 IST

Nagpur News विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात आजी व नातीचा घटनास्थळी मृत्यू झाला तर चालक गंभीर जखमी झाला आहे.

नागपूर : वेगात जाणाऱ्या ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या माेटारसायकलला जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीचालक तरुण, त्याची आई आणि मुलगी हे तिघेही ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर मुलगा गंभीर जखमी झाला. हा भीषण अपघात रामटेक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील आमडी फाटा येथे शनिवारी (दि. २९) सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.

मृतांमध्ये निक्की हरगोविंद बावणे (३३), त्याची आई भागवंताबाई हरगोविंद बावणे (६०) व मुलगी इशानी निक्की बावणे (७) या तिघांचा समावेश असून, मुलगा युग निक्की बावणे हा गंभीर जखमी झाला आहे. निक्की हा मूळचा पल्ला कामठी, जिल्हा बालाघाट (मध्य प्रदेश) येथील रहिवासी असून, ताे पाच वर्षांपासून काेराडी (ता. कामठी) नजीकच्या गोधणी (रेल्वे) येथे मिस्त्री काम करायचा. नातेवाईकांकडे लग्न असल्याने ताे आई व दाेन मुलांना घेऊन एमएच ४०-सीई ५२२८ क्रमांकाच्या माेटारसायकलने बालाघाटला जात हाेता.

ताे आमडी (फाटा) परिसरात जबलपूरहून नागपूरच्या दिशेने वेगात येणाऱ्या एनएल ०१-एएफ ६८०५ क्रमांकाच्या ट्रकने त्याच्या माेटारसायकलला जाेरात धडक दिली. त्यामुळे निक्की, त्याची आई व मुलगी ट्रकच्या चाकाखाली आल्याने तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर युग बाहेर फेकला गेल्याने ताे गंभीर जखमी झाला. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून तिन्ही मृतदेह रामटेक शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आणले. युगवर प्राथमिक उपचार करून त्याला उपचारासाठी नागपूरला रवाना केले.

अपघातानंतर ‘रास्ता राेकाे’

शनिवारी सकाळी अपघात हाेताच परिसरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने घटनास्थळी ‘रास्ता राेकाे’ केला. त्यामुळे पाेलिसांना अतिरिक्त कुमक बोलवावी लागली. अपघात व आंदाेलनामुळे जबलपूर-नागपूर लेन व सर्व्हिस राेडवर किमान दाेन किमीपर्यंत वाहनांची रांग लागली हाेती. हे आंदाेलन एक तास चालले. आ. सुनील केदार आणि तहसीलदार हंसा मोहने यांनी नागरिकांची समजूत काढून त्यांना शांत केले.

हवाई पुलाचा उपयाेग काय?

आमडी (फाटा) अपघातप्रवण स्थळ असल्याने आजवर या परिसरात २० पेक्षा अधिक छोटे-माेठे अपघात झाले आहेत. या महामार्गाच्या चौपदरीकरणानंतरही येथील अपघातांचे प्रमाण कमी झाले नाही. याठिकाणी हवाई पूल तयार केला आहे. त्याऐवजी पटगोवारीकडे जाणाऱ्या राेडवर अंडरपास तयार करायला हवा हाेता. यासाठी अनेकदा निवेदने दिली. मात्र, प्रशासन व लाेकप्रतिनिधींनी लक्ष दिले नाही. त्यामुळे अपघात हाेताच नागरिकांनी रास्ता राेकाे करून रोष व्यक्त केला.

टॅग्स :Accidentअपघात