शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भीषण अपघातात तरुणासह आजी-नातीचा मृत्यू; मुलगा गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2023 21:03 IST

Nagpur News विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात आजी व नातीचा घटनास्थळी मृत्यू झाला तर चालक गंभीर जखमी झाला आहे.

नागपूर : वेगात जाणाऱ्या ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या माेटारसायकलला जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीचालक तरुण, त्याची आई आणि मुलगी हे तिघेही ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर मुलगा गंभीर जखमी झाला. हा भीषण अपघात रामटेक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील आमडी फाटा येथे शनिवारी (दि. २९) सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.

मृतांमध्ये निक्की हरगोविंद बावणे (३३), त्याची आई भागवंताबाई हरगोविंद बावणे (६०) व मुलगी इशानी निक्की बावणे (७) या तिघांचा समावेश असून, मुलगा युग निक्की बावणे हा गंभीर जखमी झाला आहे. निक्की हा मूळचा पल्ला कामठी, जिल्हा बालाघाट (मध्य प्रदेश) येथील रहिवासी असून, ताे पाच वर्षांपासून काेराडी (ता. कामठी) नजीकच्या गोधणी (रेल्वे) येथे मिस्त्री काम करायचा. नातेवाईकांकडे लग्न असल्याने ताे आई व दाेन मुलांना घेऊन एमएच ४०-सीई ५२२८ क्रमांकाच्या माेटारसायकलने बालाघाटला जात हाेता.

ताे आमडी (फाटा) परिसरात जबलपूरहून नागपूरच्या दिशेने वेगात येणाऱ्या एनएल ०१-एएफ ६८०५ क्रमांकाच्या ट्रकने त्याच्या माेटारसायकलला जाेरात धडक दिली. त्यामुळे निक्की, त्याची आई व मुलगी ट्रकच्या चाकाखाली आल्याने तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर युग बाहेर फेकला गेल्याने ताे गंभीर जखमी झाला. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून तिन्ही मृतदेह रामटेक शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आणले. युगवर प्राथमिक उपचार करून त्याला उपचारासाठी नागपूरला रवाना केले.

अपघातानंतर ‘रास्ता राेकाे’

शनिवारी सकाळी अपघात हाेताच परिसरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने घटनास्थळी ‘रास्ता राेकाे’ केला. त्यामुळे पाेलिसांना अतिरिक्त कुमक बोलवावी लागली. अपघात व आंदाेलनामुळे जबलपूर-नागपूर लेन व सर्व्हिस राेडवर किमान दाेन किमीपर्यंत वाहनांची रांग लागली हाेती. हे आंदाेलन एक तास चालले. आ. सुनील केदार आणि तहसीलदार हंसा मोहने यांनी नागरिकांची समजूत काढून त्यांना शांत केले.

हवाई पुलाचा उपयाेग काय?

आमडी (फाटा) अपघातप्रवण स्थळ असल्याने आजवर या परिसरात २० पेक्षा अधिक छोटे-माेठे अपघात झाले आहेत. या महामार्गाच्या चौपदरीकरणानंतरही येथील अपघातांचे प्रमाण कमी झाले नाही. याठिकाणी हवाई पूल तयार केला आहे. त्याऐवजी पटगोवारीकडे जाणाऱ्या राेडवर अंडरपास तयार करायला हवा हाेता. यासाठी अनेकदा निवेदने दिली. मात्र, प्रशासन व लाेकप्रतिनिधींनी लक्ष दिले नाही. त्यामुळे अपघात हाेताच नागरिकांनी रास्ता राेकाे करून रोष व्यक्त केला.

टॅग्स :Accidentअपघात