शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

भीषण अपघातात तरुणासह आजी-नातीचा मृत्यू; मुलगा गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2023 21:03 IST

Nagpur News विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात आजी व नातीचा घटनास्थळी मृत्यू झाला तर चालक गंभीर जखमी झाला आहे.

नागपूर : वेगात जाणाऱ्या ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या माेटारसायकलला जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीचालक तरुण, त्याची आई आणि मुलगी हे तिघेही ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर मुलगा गंभीर जखमी झाला. हा भीषण अपघात रामटेक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील आमडी फाटा येथे शनिवारी (दि. २९) सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.

मृतांमध्ये निक्की हरगोविंद बावणे (३३), त्याची आई भागवंताबाई हरगोविंद बावणे (६०) व मुलगी इशानी निक्की बावणे (७) या तिघांचा समावेश असून, मुलगा युग निक्की बावणे हा गंभीर जखमी झाला आहे. निक्की हा मूळचा पल्ला कामठी, जिल्हा बालाघाट (मध्य प्रदेश) येथील रहिवासी असून, ताे पाच वर्षांपासून काेराडी (ता. कामठी) नजीकच्या गोधणी (रेल्वे) येथे मिस्त्री काम करायचा. नातेवाईकांकडे लग्न असल्याने ताे आई व दाेन मुलांना घेऊन एमएच ४०-सीई ५२२८ क्रमांकाच्या माेटारसायकलने बालाघाटला जात हाेता.

ताे आमडी (फाटा) परिसरात जबलपूरहून नागपूरच्या दिशेने वेगात येणाऱ्या एनएल ०१-एएफ ६८०५ क्रमांकाच्या ट्रकने त्याच्या माेटारसायकलला जाेरात धडक दिली. त्यामुळे निक्की, त्याची आई व मुलगी ट्रकच्या चाकाखाली आल्याने तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर युग बाहेर फेकला गेल्याने ताे गंभीर जखमी झाला. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून तिन्ही मृतदेह रामटेक शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आणले. युगवर प्राथमिक उपचार करून त्याला उपचारासाठी नागपूरला रवाना केले.

अपघातानंतर ‘रास्ता राेकाे’

शनिवारी सकाळी अपघात हाेताच परिसरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने घटनास्थळी ‘रास्ता राेकाे’ केला. त्यामुळे पाेलिसांना अतिरिक्त कुमक बोलवावी लागली. अपघात व आंदाेलनामुळे जबलपूर-नागपूर लेन व सर्व्हिस राेडवर किमान दाेन किमीपर्यंत वाहनांची रांग लागली हाेती. हे आंदाेलन एक तास चालले. आ. सुनील केदार आणि तहसीलदार हंसा मोहने यांनी नागरिकांची समजूत काढून त्यांना शांत केले.

हवाई पुलाचा उपयाेग काय?

आमडी (फाटा) अपघातप्रवण स्थळ असल्याने आजवर या परिसरात २० पेक्षा अधिक छोटे-माेठे अपघात झाले आहेत. या महामार्गाच्या चौपदरीकरणानंतरही येथील अपघातांचे प्रमाण कमी झाले नाही. याठिकाणी हवाई पूल तयार केला आहे. त्याऐवजी पटगोवारीकडे जाणाऱ्या राेडवर अंडरपास तयार करायला हवा हाेता. यासाठी अनेकदा निवेदने दिली. मात्र, प्रशासन व लाेकप्रतिनिधींनी लक्ष दिले नाही. त्यामुळे अपघात हाेताच नागरिकांनी रास्ता राेकाे करून रोष व्यक्त केला.

टॅग्स :Accidentअपघात