शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

संघाचे पाठबळ असणारे भव्य प्रकल्प सहज उभे होतात; मुख्यमंत्र्यांकडून संघाबाबत कौतुकोद्गार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2023 20:44 IST

Nagpur News संघाचे पाठबळ असणारे भव्य प्रकल्प सहज उभे होतात, या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी संघाबाबत कौतुकोद्गार काढत कार्यप्रणालीची प्रशंसा केली.

नागपूर : नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे नागपुरात प्रथमच एका मंचावर एकत्रित आले. यावेळी संघाचे पाठबळ असणारे भव्य प्रकल्प सहज उभे होतात, या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी संघाबाबत कौतुकोद्गार काढत कार्यप्रणालीची प्रशंसा केली.

या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे काही कारणांनी उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, उद्योगपती गौतम अदानी यांच्या उपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्थेच्या जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार अजय संचेती, एनसीआयचे अध्यक्ष ॲड. सुनील मनोहर, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर, आनंद औरंगाबादकर प्रामुख्याने उपस्थित होते.

सरसंघचालक मोहन भागवत हे सर्वांसाठी प्रेरणास्थान आहेत. चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीशी त्यांचे वैचारिक पाठबळ नेहमीच असते. एनसीआयच्या रूपातून हेच दिसून येत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी ते काहीसे भावुकदेखील झाले. देवेंद्र फडणवीस यांनी कॅन्सरमुळे त्यांचे वडील गमावले त्याचप्रमाणे माझी आईदेखील ती वेदनादायी आठवण आहे. मात्र, वैयक्तिक दुःखाला बाजूला सारून सार्वजनिक दुःखावर उपाय शोधण्याचा विचार करणे, हेच खऱ्या लोकप्रतिनिधीचे लक्षण आहे. तेच फडणवीस यांनी दाखवून दिले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. आपापल्या भागात अशी सेवाव्रती आरोग्य मंदिरे उभारावी, अशी अपेक्षाही व्यक्त करत अशा संस्थांच्या पाठीशी राज्य शासन भक्कमपणे उभे राहील, असे त्यांनी सांगितले. जोगळेकर यांनी प्रास्ताविक केले.

कॅन्सरग्रस्त रुग्णांना हिंमत देणे महत्त्वाचे

कॅन्सर हा दुर्धर आजार असून, कॅन्सरग्रस्तांना आपलेपण व हिमतीची गरज असते. सरकार एकीकडे संस्था उभारतेच, मात्र आरोग्य सारख्या सार्वजनिक विषयावर देशातील सर्व जनतेने स्वतःही पुढे येणे आवश्यक आहे. आरोग्य सेवेसाठी एनसीआयप्रमाणे संस्था उभारण्यासाठी समाजातील विविध घटकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन सरसंघचालकांनी केले.

कॅन्सर उपचारांवर देशात संशोधन हवे

अमेरिकेत कॅन्सरच्या रुग्णांमध्ये ३३ टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र, भारतात कॅन्सर रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजारीवरील उपचारावर देशात संशोधन झाले पाहिजे, असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

सिकलसेलवर संशोधन केंद्र उभारणार

रुग्णांच्या नातेवाइकांच्या नि:शुल्क निवासासाठी एनसीआयमध्ये धर्मशाळा उभारण्यात येणार आहे. पूर्व विदर्भात थॅलेसेमिया आणि सिकलसेल आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असून, या आजारावर संशोधन व उपचार करण्यासाठी येत्या काळात संशोधन केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

अदानी कार्यक्रमात, मात्र मंचावर नाही

देशातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी इस्पितळाची पाहणीदेखील केली. मात्र, प्रत्यक्ष कार्यक्रमादरम्यान ते मंचावर उपस्थित नव्हते. विशेष विमानाने गुरुवारी सकाळी त्यांचे नागपुरात आगमन झाले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतNitin Gadkariनितीन गडकरी