शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
2
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
3
झोमॅटोद्वारे हॉटेल मालकाने २१,००० रुपयांच्या १०७ ऑर्डर बनवून दिल्या, हातात किती शिल्लक राहिले... तुम्हीच पहा...
4
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
5
सोने-चांदीच्या दरात आज मोठी उलथापालथ; Gold झालं स्वस्त, पण चांदी अवाक्याच्या बाहेर
6
"पाकिस्तानचा संघ एवढा भारी आहे की..."; IND vs PAK FINAL आधी कर्णधार सलमानने भारताला डिवचले
7
VIRAL :'सोनार बनवणार नाही, चोर चोरणार नाही'! ट्रेनमध्ये विक्रेत्याचा शायराना अंदाज; तरुणाची स्टाईल पाहून पब्लिक झाली फॅन!
8
३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना वक्री शनि करेल मालामाल, बक्कळ पैसा; चौपट लाभ!
9
Tariffs on Furniture: ट्रम्प यांचा फर्निचर उद्योगावरही 'टॅरिफ घाव'; कोणत्या भारतीय कंपन्यांना बसणार फटका?
10
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
11
४ लाख कोटी स्वाहा! TATA च्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना दिला मोठा झटका, आणखी खाली जाऊ शकते किंमत?
12
भारतीय हवाई दलात इतिहास घडवणारे 'MiG-21' झाले निवृत; पाकिस्तानचा थरकाप उडवणाऱ्या विमानाला शेवटचा सॅल्यूट!
13
Jalebi Recipe: रसरशीत जिलेबी करण्यासाठी शेफने सांगितली खास टीप; १० मिनिटांत होईल तयार 
14
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
15
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
16
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
17
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
18
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
19
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
20
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?

ढगाआडही मृत्यूचे उदासभान शोधत असतील ग्रेस!

By admin | Updated: March 26, 2017 01:56 IST

२६ मार्च २०१२. आजचाच दिवस. शब्दाआड दडलेल्या संध्यामग्न प्रतिमा शोधता शोधता अचानक आत्मरूपाचा शोध लागला आणि ग्रेस शांत झाले.

आज स्मृतिदिनशफी पठाण नागपूर२६ मार्च २०१२. आजचाच दिवस. शब्दाआड दडलेल्या संध्यामग्न प्रतिमा शोधता शोधता अचानक आत्मरूपाचा शोध लागला आणि ग्रेस शांत झाले. शब्दाच्या मायेने हळव्या झालेल्या खडकाच्याही डोळ्यात पाणी उभे करणाऱ्या त्या घटनेला आज पाच वर्षे पूर्ण होत आहेत. स्वभावानुसार मृत्यूलाही धाप लागेपर्यंत झुंजविल्यानंतर स्वत:च त्याच्या हवाली होताना आता अंतर्मनाला अस्वस्थ करणारी शब्दकळा आपल्याला छळणार नाही, असा ग्रेसांचा समज झाला असेल तर तो निव्वळ भ्रम आहे ‘मृगजळाच्या बांधकामा’सारखा. याला कारण, ग्रेस आणि शब्दांचे नातेच मुळी खोल आहे प्राचीन नदीसारखे. अन् ते असे क्षणिक तृप्ततेला भुलून आपला प्रवाह बदलणे शक्यच नाही. म्हणूनच ग्रेस आजही जिवंत आहेत एक दंतकथा बनून. अंतर्मनाच्या उत्खननातून हाती सलग येत राहिलेले अनंत अवशेष शब्दांच्या सर्वांगात पेरून हा औलिया वाजवत राहिला खिन्नतेची बासरी. अगदी समोर मृत्यू उभा असतानाही. अखेर ग्रेसांनाच मृत्यूची दया आली आणि ते निघाले त्याच्यासह अनंताच्या प्रवासाला. आपल्याला मृत्यूचे उदासभान शोधायचे आहे आणि ते ढगाआड गेल्याशिवाय शोधता येणार नाही, असेच कदाचित गे्रसांना वाटले असेल. नेमके काय झाले माहीत नाही, पण २६ मार्च २०१२ रोजी ग्रेसनामक कवितेच्या या प्रज्वलित दीपांजलीवर काळाने त्याच्या धर्मकर्तव्यानुसार फुंकर घातली आणि लौकिकार्थाने ती विझली. लोक म्हणाले, गेस गेले. पण, या म्हणण्याला खरे कसे मानावे? कारण, आजही जेव्हा कुणी ‘मितवा’ची पाने उलटतो, ‘चर्चबेल’च्या शब्दांना ओंजळीत धरतो, ‘चंद्रमाधवीच्या प्रदेशा’त शतपावली करतो, ‘ओल्या वाळूंच्या बासरी’ला ओठाशी धरतो...तेव्हा प्रत्येक वेळेस ग्रेस नावाचे हे अविट गाणे वाचकांच्या मनात फेर धरत असते सांध्यपर्वतावरील असंख्य वैष्णवांसह. दूर वाऱ्याने हलणाऱ्या धुक्यांच्या खोल तळाशी एक दुर्बोध शिल्प दिसत असते काहीशे अस्पष्ट. ते ग्रेसच असतात.सांजभयाने अस्वस्थ झालेल्या वाचकाला आपल्या सनातन शब्दसामर्थ्याने आश्वस्त करण्यासाठी व अंतर्मुखता, आत्ममग्नता आणि आत्मप्रीतीचे आरोप झेलणाऱ्या आपल्या कवितेला सहनशीलतेची रसद पुरवण्यासाठी ग्रेसांची पडछाया अशी डोकावत असते पुस्तकांच्या पानापानातून. मग कसे म्हणायचे ग्रेस गेले? आजही धंतोलीच्या वीणा विहारमधून अननसाचा रस पिऊन, खांद्यावर शबनम बॅग लटकवून अंबाझरी मार्गावरील स्वीमिंग टँककडे झेपावणारी पावले ग्रेसांचीच आहेत, असा भास होतो तेव्हा मन पुन्हा विचारते, मग कसे म्हणायचे ग्रेस गेले?