शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

अधिसंख्य पदांच्या ‘जीआर’ला हायकोर्टात आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2020 09:46 IST

court Nagpur News आरक्षित नोकऱ्या मिळविल्यानंतर संबंधित जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात अपयशी ठरलेल्या कर्मचाऱ्यांना ११ महिने कालावधीसाठी अधिसंख्य पदांवर वर्ग करणे व त्यानंतर त्यांना बडतर्फ करणे याकरिता शासन निर्णयाच्या वैधतेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे.

ठळक मुद्दे राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना फटका बसलेला निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : आरक्षित नोकऱ्या मिळविल्यानंतर संबंधित जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात अपयशी ठरलेल्या कर्मचाऱ्यांना ११ महिने कालावधीसाठी अधिसंख्य पदांवर वर्ग करणे व त्यानंतर त्यांना बडतर्फ करणे याकरिता २१ डिसेंबर २०१९ रोजी जारी शासन निर्णयाच्या वैधतेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. हा निर्णय रद्द करण्याची मागणी न्यायालयाला करण्यात आली आहे. राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फटका बसला आहे.

नागपूर जिल्हा परिषदेतील रंजना हेडाऊ व इतर ४२ कर्मचाऱ्यांनी ॲड. शैलेश नारनवरे यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. ६ जुलै २०१७ रोजी सर्वोच्च न्यायालयाने ''जगदीश बहिरा'' प्रकरणामध्ये, आरक्षित नोकऱ्या मिळविल्यानंतर संबंधित जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात अपयशी ठरलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम ठेवले जाऊ शकत नाही असा निर्णय दिला आहे. परंतु, हा निर्णय ६ जुलै २०१७ पूर्वी सेवेला संरक्षण मिळालेल्या कर्मचाऱ्यांना लागू होत नाही. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टीकरण दिले आहे. असे असताना राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ काढून जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात अपयशी ठरलेल्या सरसकट सर्वच कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यासाठी वादग्रस्त ''जीआर'' जारी केला. सदर ''जीआर'' घटनाबाह्य व भेदभावजनक आहे. यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा नियमाची पायमल्ली होते. तसेच, सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या विविध आदेशांचा अवमान होतो. परिणामी, वादग्रस्त जीआर रद्द करणे आवश्यक आहे असे ॲड. नारनवरे यांनी याचिकेची माहिती देताना सांगितले.

याचिकाकर्त्यांनी दिली ३० वर्षे सेवा

याचिकाकर्त्यांनी आतापर्यंत २५ ते ३० वर्षे सेवा पूर्ण केली आहे. त्यांची अनुसूचित जमाती प्रवर्गातून विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर ते अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात अपयशी ठरल्यामुळे त्यांचे १५ जून १९९५ रोजीचा जीआर आणि १८ मे २०१३ रोजीचे परिपत्रकाच्या आधारावर अन्य प्रवर्गामध्ये समायोजन करण्यात आले. आता त्यांना २७ डिसेंबर २०१९ रोजीच्या आदेशाद्वारे अधिसंख्य पदांवर वर्ग करण्यात आले. ही कारवाई अवैध असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय