शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

अधिसंख्य पदांच्या ‘जीआर’ला हायकोर्टात आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2020 09:46 IST

court Nagpur News आरक्षित नोकऱ्या मिळविल्यानंतर संबंधित जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात अपयशी ठरलेल्या कर्मचाऱ्यांना ११ महिने कालावधीसाठी अधिसंख्य पदांवर वर्ग करणे व त्यानंतर त्यांना बडतर्फ करणे याकरिता शासन निर्णयाच्या वैधतेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे.

ठळक मुद्दे राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना फटका बसलेला निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : आरक्षित नोकऱ्या मिळविल्यानंतर संबंधित जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात अपयशी ठरलेल्या कर्मचाऱ्यांना ११ महिने कालावधीसाठी अधिसंख्य पदांवर वर्ग करणे व त्यानंतर त्यांना बडतर्फ करणे याकरिता २१ डिसेंबर २०१९ रोजी जारी शासन निर्णयाच्या वैधतेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. हा निर्णय रद्द करण्याची मागणी न्यायालयाला करण्यात आली आहे. राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फटका बसला आहे.

नागपूर जिल्हा परिषदेतील रंजना हेडाऊ व इतर ४२ कर्मचाऱ्यांनी ॲड. शैलेश नारनवरे यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. ६ जुलै २०१७ रोजी सर्वोच्च न्यायालयाने ''जगदीश बहिरा'' प्रकरणामध्ये, आरक्षित नोकऱ्या मिळविल्यानंतर संबंधित जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात अपयशी ठरलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम ठेवले जाऊ शकत नाही असा निर्णय दिला आहे. परंतु, हा निर्णय ६ जुलै २०१७ पूर्वी सेवेला संरक्षण मिळालेल्या कर्मचाऱ्यांना लागू होत नाही. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टीकरण दिले आहे. असे असताना राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ काढून जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात अपयशी ठरलेल्या सरसकट सर्वच कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यासाठी वादग्रस्त ''जीआर'' जारी केला. सदर ''जीआर'' घटनाबाह्य व भेदभावजनक आहे. यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा नियमाची पायमल्ली होते. तसेच, सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या विविध आदेशांचा अवमान होतो. परिणामी, वादग्रस्त जीआर रद्द करणे आवश्यक आहे असे ॲड. नारनवरे यांनी याचिकेची माहिती देताना सांगितले.

याचिकाकर्त्यांनी दिली ३० वर्षे सेवा

याचिकाकर्त्यांनी आतापर्यंत २५ ते ३० वर्षे सेवा पूर्ण केली आहे. त्यांची अनुसूचित जमाती प्रवर्गातून विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर ते अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात अपयशी ठरल्यामुळे त्यांचे १५ जून १९९५ रोजीचा जीआर आणि १८ मे २०१३ रोजीचे परिपत्रकाच्या आधारावर अन्य प्रवर्गामध्ये समायोजन करण्यात आले. आता त्यांना २७ डिसेंबर २०१९ रोजीच्या आदेशाद्वारे अधिसंख्य पदांवर वर्ग करण्यात आले. ही कारवाई अवैध असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय