शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

पुन्हा गोवारींचा स्वप्नभंग; सरकारविरोधात समाजात रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 10:42 IST

राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला २० जुलै २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयात चॅलेंज केल्याने गोवारी समाजाचे स्वप्नभंग झाले. सरकारच्या या निर्णयामुळे आदिवासी समाजात रोष असून, न्यायासाठी पुन्हा लढा उभारण्याचा इशारा समाजाच्या संघटनेने दिला आहे.

ठळक मुद्देआरक्षणाविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ११४ गोवारींचा बळी गेल्यानंतर २४ वर्षांनंतर गोवारी समाजाच्या बाजूने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ऐतिहासिक निर्णय दिला होता. या निर्णयाच्या आधारे राज्य सरकारला फक्त अध्यादेश काढायचा होता. पण राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला २० जुलै २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयात चॅलेंज केल्याने गोवारी समाजाचे स्वप्नभंग झाले. सरकारच्या या निर्णयामुळे आदिवासी समाजात रोष असून, न्यायासाठी पुन्हा लढा उभारण्याचा इशारा समाजाच्या संघटनेने दिला आहे.

राज्यात लागू असलेल्या अनुसूचित जमातींच्या सूचीमध्ये गोंड-गोवारी जमातीचा समावेश आहे. परंतु, राज्यात गोंड-गोवारी नावाची जमातच अस्तित्वात नसल्याने शासकीय योजनांचा लाभ मिळत नव्हता. आपल्या हक्कासाठी गोवारी समाजाने लढा उभारला व २३ नोव्हेंबर १९९४ ला नागपुरात हिवाळी अधिवेशनात मॉरिस कॉलेज टी-पॉइंटवर ५०,००० गोवारी धडकले. मुख्यमंत्री मोर्चाच्या भेटीला येत नाहीत, असे समजताच मोर्चात आलेल्या गोवारींमध्ये असंतोष उफाळून आला. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने झालेल्या चेंगराचेंगरीत ११४ गोवारींचा बळी गेला. यानंतर अनेक संघटना न्यायालयात गेल्या. त्यावर उच्च न्यायालयाने त्यांच्या दाव्यावर शिक्कामोर्तब केले.

गोंड-गोवारी जमात १९११ पूर्वीच लुप्त झाल्याचे व राज्यामध्ये गोंड-गोवारी संबोधले जात असलेले सर्वजण गोवारी असल्याचे उच्च न्यायालयाच्या निर्णयात स्पष्ट केले. शिवाय राज्य सरकारने यावर संशोधन करण्यासाठी मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सची नियुक्ती केली होती. त्या संस्थेलाही कोठेच गोंड-गोवारी जमात आढळून आली नाही. असे असताना गोवारी समाजाला सरकारस्तरावर न्याय मिळाला नाही.

अखेर १४ आॅगस्ट २०१८ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गोवारींच्या बाजूने ऐतिहासिक निर्णय दिला. परंतु, सरकारने अध्यादेश न काढल्याने पुन्हा न्यायालयात दाद मागण्याची वेळ समाजावर आली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पुन्हा २५ जानेवारी २०१९ रोजी गोवारी, गोंडगोवारींना जातवैधता प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले. त्यानंतर समाजातील काही लोकांना जातवैधता प्रमाणपत्र मिळाले. महाविकास आघाडीचे राज्यात सरकार आल्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सरकार अध्यादेश काढेल, अशी अपेक्षा समाजाला होती. पण सरकारच सर्वोच्च न्यायालयात गेल्यामुळे गोवारी समाजाला स्वत:च्या हक्कासाठी पुन्हा लढावे लागणार आहे.

सरकार गोवारींच्या विरोधात असल्याचे स्पष्ट२३ नोव्हेंबर १९९४ रोजी ११४ गोवारींचा बळी गेला. तेव्हा राज्यात शरद पवार मुख्यमंत्री होते. त्यांच्याकडून न्याय मिळालाच नाही. पण न्यायालयाने दिलेला न्यायही हिरावून घेण्याचा डाव महाविकास आघाडी सरकारने केला आहे. २४ वर्षे संघर्ष करून अपेक्षांचा घास पदरात पडला होता. मात्र तोसुद्धा सरकारने हिसकावला. आता पुन्हा संघर्ष करू.- कैलास राऊत, अध्यक्ष, आदिवासी गोवारी समाज संघटना

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजना