शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
3
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
4
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
5
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
6
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
7
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
8
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
9
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
10
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
11
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
12
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
13
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
14
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
15
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
16
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
17
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
18
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
19
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
20
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!

पुन्हा गोवारींचा स्वप्नभंग; सरकारविरोधात समाजात रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 10:42 IST

राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला २० जुलै २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयात चॅलेंज केल्याने गोवारी समाजाचे स्वप्नभंग झाले. सरकारच्या या निर्णयामुळे आदिवासी समाजात रोष असून, न्यायासाठी पुन्हा लढा उभारण्याचा इशारा समाजाच्या संघटनेने दिला आहे.

ठळक मुद्देआरक्षणाविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ११४ गोवारींचा बळी गेल्यानंतर २४ वर्षांनंतर गोवारी समाजाच्या बाजूने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ऐतिहासिक निर्णय दिला होता. या निर्णयाच्या आधारे राज्य सरकारला फक्त अध्यादेश काढायचा होता. पण राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला २० जुलै २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयात चॅलेंज केल्याने गोवारी समाजाचे स्वप्नभंग झाले. सरकारच्या या निर्णयामुळे आदिवासी समाजात रोष असून, न्यायासाठी पुन्हा लढा उभारण्याचा इशारा समाजाच्या संघटनेने दिला आहे.

राज्यात लागू असलेल्या अनुसूचित जमातींच्या सूचीमध्ये गोंड-गोवारी जमातीचा समावेश आहे. परंतु, राज्यात गोंड-गोवारी नावाची जमातच अस्तित्वात नसल्याने शासकीय योजनांचा लाभ मिळत नव्हता. आपल्या हक्कासाठी गोवारी समाजाने लढा उभारला व २३ नोव्हेंबर १९९४ ला नागपुरात हिवाळी अधिवेशनात मॉरिस कॉलेज टी-पॉइंटवर ५०,००० गोवारी धडकले. मुख्यमंत्री मोर्चाच्या भेटीला येत नाहीत, असे समजताच मोर्चात आलेल्या गोवारींमध्ये असंतोष उफाळून आला. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने झालेल्या चेंगराचेंगरीत ११४ गोवारींचा बळी गेला. यानंतर अनेक संघटना न्यायालयात गेल्या. त्यावर उच्च न्यायालयाने त्यांच्या दाव्यावर शिक्कामोर्तब केले.

गोंड-गोवारी जमात १९११ पूर्वीच लुप्त झाल्याचे व राज्यामध्ये गोंड-गोवारी संबोधले जात असलेले सर्वजण गोवारी असल्याचे उच्च न्यायालयाच्या निर्णयात स्पष्ट केले. शिवाय राज्य सरकारने यावर संशोधन करण्यासाठी मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सची नियुक्ती केली होती. त्या संस्थेलाही कोठेच गोंड-गोवारी जमात आढळून आली नाही. असे असताना गोवारी समाजाला सरकारस्तरावर न्याय मिळाला नाही.

अखेर १४ आॅगस्ट २०१८ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गोवारींच्या बाजूने ऐतिहासिक निर्णय दिला. परंतु, सरकारने अध्यादेश न काढल्याने पुन्हा न्यायालयात दाद मागण्याची वेळ समाजावर आली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पुन्हा २५ जानेवारी २०१९ रोजी गोवारी, गोंडगोवारींना जातवैधता प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले. त्यानंतर समाजातील काही लोकांना जातवैधता प्रमाणपत्र मिळाले. महाविकास आघाडीचे राज्यात सरकार आल्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सरकार अध्यादेश काढेल, अशी अपेक्षा समाजाला होती. पण सरकारच सर्वोच्च न्यायालयात गेल्यामुळे गोवारी समाजाला स्वत:च्या हक्कासाठी पुन्हा लढावे लागणार आहे.

सरकार गोवारींच्या विरोधात असल्याचे स्पष्ट२३ नोव्हेंबर १९९४ रोजी ११४ गोवारींचा बळी गेला. तेव्हा राज्यात शरद पवार मुख्यमंत्री होते. त्यांच्याकडून न्याय मिळालाच नाही. पण न्यायालयाने दिलेला न्यायही हिरावून घेण्याचा डाव महाविकास आघाडी सरकारने केला आहे. २४ वर्षे संघर्ष करून अपेक्षांचा घास पदरात पडला होता. मात्र तोसुद्धा सरकारने हिसकावला. आता पुन्हा संघर्ष करू.- कैलास राऊत, अध्यक्ष, आदिवासी गोवारी समाज संघटना

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजना