शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

शासनाचा मराठी भाषा पंधरवडा पुणे, मुंबईपुरताच, श्रीपाद जोशी यांचा आराेप

By निशांत वानखेडे | Updated: January 16, 2024 18:46 IST

मराठी भाषा विभागाचा ‘साहित्य सेतू’ उपक्रम केवळ मुंबई, पुणे केंद्रित व तिथलेच मान्यवर केंद्रीत असल्याचा आराेप त्यांनी केला.

नागपूर : राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाने १४ जानेवारीपासून मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त जाहीर केलेला ‘साहित्य सेतू’ उपक्रम पुणे, मुंबईपुरता मर्यादित आहे का, असा सवाल अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष व सांस्कृतिक आघाडीचे संयोजक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केला आहे. अशा प्रकारामुळे राज्यातील इतर विभागांत विलगतेची भावना निर्माण हाेत असल्याची टीकाही त्यांनी केली.

मराठी भाषा विभागाचा ‘साहित्य सेतू’ उपक्रम केवळ मुंबई, पुणे केंद्रित व तिथलेच मान्यवर केंद्रीत असल्याचा आराेप त्यांनी केला. याबाबत मराठी भाषा विभागाला तसेच मुख्यमंत्री, मराठी भाषा मंत्री, विश्वकोश मंडळाचे सचिव आणि राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक यांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी ही खंत व्यक्त केली. हा प्रश्न महाराष्ट्रातील इतर विभागांना व बृहन्महाराष्ट्रातीलही संबंधितांना पडत असतो, हे लक्षात ठेवणे हेदेखील शासनाचेच काम व हे पुन:पुन्हा शासनाच्या लक्षात आणून द्यावे लागते, हे मराठीचे दुर्दैव आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

आम्ही महाराष्ट्राचेच भाग आहोत, वेगळ्या राज्याचे नव्हे, याचे स्मरण शासनाला करून द्यावी लागते, ही खंत आहे. अशा उपक्रमांमध्ये महाराष्ट्राच्या सर्व विभागांतील प्रतिभेला सहभागी करण्याचे धोरण शासनाने राबवायला हवे. अशा कार्यपद्धतीमुळेच विविध विभागांत विलगतेची भावना प्रबळ होण्यास खतपाणी मिळते आणि महाराष्ट्र संयुक्तच राखू इच्छिणाऱ्यांचे बळ क्षीण केले जाते आहे. त्यायोगे भाषिक, सांस्कृतिक ऐक्याला देखील बाधा पोहोचते, हेदेखील डॉ. जोशी यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. महाराष्ट्रातील इतर विभागांतदेखील मान्यवर लेखक, प्रतिभा, विद्वत्ता आहे, याचे भान शासनाने राखले पाहिजे, असेही या पत्रात डॉ. जोशी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :nagpurनागपूर