शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

शासनाचा मराठी भाषा पंधरवडा पुणे, मुंबईपुरताच, श्रीपाद जोशी यांचा आराेप

By निशांत वानखेडे | Updated: January 16, 2024 18:46 IST

मराठी भाषा विभागाचा ‘साहित्य सेतू’ उपक्रम केवळ मुंबई, पुणे केंद्रित व तिथलेच मान्यवर केंद्रीत असल्याचा आराेप त्यांनी केला.

नागपूर : राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाने १४ जानेवारीपासून मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त जाहीर केलेला ‘साहित्य सेतू’ उपक्रम पुणे, मुंबईपुरता मर्यादित आहे का, असा सवाल अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष व सांस्कृतिक आघाडीचे संयोजक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केला आहे. अशा प्रकारामुळे राज्यातील इतर विभागांत विलगतेची भावना निर्माण हाेत असल्याची टीकाही त्यांनी केली.

मराठी भाषा विभागाचा ‘साहित्य सेतू’ उपक्रम केवळ मुंबई, पुणे केंद्रित व तिथलेच मान्यवर केंद्रीत असल्याचा आराेप त्यांनी केला. याबाबत मराठी भाषा विभागाला तसेच मुख्यमंत्री, मराठी भाषा मंत्री, विश्वकोश मंडळाचे सचिव आणि राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक यांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी ही खंत व्यक्त केली. हा प्रश्न महाराष्ट्रातील इतर विभागांना व बृहन्महाराष्ट्रातीलही संबंधितांना पडत असतो, हे लक्षात ठेवणे हेदेखील शासनाचेच काम व हे पुन:पुन्हा शासनाच्या लक्षात आणून द्यावे लागते, हे मराठीचे दुर्दैव आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

आम्ही महाराष्ट्राचेच भाग आहोत, वेगळ्या राज्याचे नव्हे, याचे स्मरण शासनाला करून द्यावी लागते, ही खंत आहे. अशा उपक्रमांमध्ये महाराष्ट्राच्या सर्व विभागांतील प्रतिभेला सहभागी करण्याचे धोरण शासनाने राबवायला हवे. अशा कार्यपद्धतीमुळेच विविध विभागांत विलगतेची भावना प्रबळ होण्यास खतपाणी मिळते आणि महाराष्ट्र संयुक्तच राखू इच्छिणाऱ्यांचे बळ क्षीण केले जाते आहे. त्यायोगे भाषिक, सांस्कृतिक ऐक्याला देखील बाधा पोहोचते, हेदेखील डॉ. जोशी यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. महाराष्ट्रातील इतर विभागांतदेखील मान्यवर लेखक, प्रतिभा, विद्वत्ता आहे, याचे भान शासनाने राखले पाहिजे, असेही या पत्रात डॉ. जोशी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :nagpurनागपूर