शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शासनाचा मराठी भाषा पंधरवडा पुणे, मुंबईपुरताच, श्रीपाद जोशी यांचा आराेप

By निशांत वानखेडे | Updated: January 16, 2024 18:46 IST

मराठी भाषा विभागाचा ‘साहित्य सेतू’ उपक्रम केवळ मुंबई, पुणे केंद्रित व तिथलेच मान्यवर केंद्रीत असल्याचा आराेप त्यांनी केला.

नागपूर : राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाने १४ जानेवारीपासून मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त जाहीर केलेला ‘साहित्य सेतू’ उपक्रम पुणे, मुंबईपुरता मर्यादित आहे का, असा सवाल अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष व सांस्कृतिक आघाडीचे संयोजक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केला आहे. अशा प्रकारामुळे राज्यातील इतर विभागांत विलगतेची भावना निर्माण हाेत असल्याची टीकाही त्यांनी केली.

मराठी भाषा विभागाचा ‘साहित्य सेतू’ उपक्रम केवळ मुंबई, पुणे केंद्रित व तिथलेच मान्यवर केंद्रीत असल्याचा आराेप त्यांनी केला. याबाबत मराठी भाषा विभागाला तसेच मुख्यमंत्री, मराठी भाषा मंत्री, विश्वकोश मंडळाचे सचिव आणि राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक यांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी ही खंत व्यक्त केली. हा प्रश्न महाराष्ट्रातील इतर विभागांना व बृहन्महाराष्ट्रातीलही संबंधितांना पडत असतो, हे लक्षात ठेवणे हेदेखील शासनाचेच काम व हे पुन:पुन्हा शासनाच्या लक्षात आणून द्यावे लागते, हे मराठीचे दुर्दैव आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

आम्ही महाराष्ट्राचेच भाग आहोत, वेगळ्या राज्याचे नव्हे, याचे स्मरण शासनाला करून द्यावी लागते, ही खंत आहे. अशा उपक्रमांमध्ये महाराष्ट्राच्या सर्व विभागांतील प्रतिभेला सहभागी करण्याचे धोरण शासनाने राबवायला हवे. अशा कार्यपद्धतीमुळेच विविध विभागांत विलगतेची भावना प्रबळ होण्यास खतपाणी मिळते आणि महाराष्ट्र संयुक्तच राखू इच्छिणाऱ्यांचे बळ क्षीण केले जाते आहे. त्यायोगे भाषिक, सांस्कृतिक ऐक्याला देखील बाधा पोहोचते, हेदेखील डॉ. जोशी यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. महाराष्ट्रातील इतर विभागांतदेखील मान्यवर लेखक, प्रतिभा, विद्वत्ता आहे, याचे भान शासनाने राखले पाहिजे, असेही या पत्रात डॉ. जोशी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :nagpurनागपूर