शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

राज्यपालांनी वाढवला विभागीय आयुक्तांचा कार्यकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 01:11 IST

विभागीय आयुक्त अनुप कुमार हे विदर्भ विकास मंडळाच्या प्रभारी अध्यक्षपदी कायम राहतील. भाजपाचे आमदार चैनसुख संचेती यांनी पदभार सांभाळण्यासाठी आणखी वेळ देण्याची मागणी केली असल्याने राज्यपालांनी उपरोक्त निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देचैनसुख संचेती मंडळापासून दूरच : १० आॅगस्टला बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विभागीय आयुक्त अनुप कुमार हे विदर्भ विकास मंडळाच्या प्रभारी अध्यक्षपदी कायम राहतील. भाजपाचे आमदार चैनसुख संचेती यांनी पदभार सांभाळण्यासाठी आणखी वेळ देण्याची मागणी केली असल्याने राज्यपालांनी उपरोक्त निर्णय घेतला आहे.विभागीय आयुक्त अनुप कुमार यांना १ आॅगस्ट रोजीच यासंदर्भात पत्र मिळाले आहे. अनुप कुमार यांच्यानुसार पत्रात म्हटले आहे की, संचेती हे पदभार स्वीकारत नाहीत तोपर्यंत ते प्रभारी अध्यक्ष राहतील. कार्यकाळ वाढल्याचे आदेश येताच अनुप कुमार यांनी १० आॅगस्ट रोजी बैठक आयोजित केली आहे. विदर्भाचा मागासलेपणा दूर करण्याच्या उद्देशाने राष्ट्रपतींच्या निर्देशानंतर गठित विदर्भ विकास मंडळाच्या दुरावस्थेवर लोकमतने प्रकाश टाकला होता, हे विशेष. मागच्या राज्य सरकारचा कार्यकाळ संपल्याबरोबरच मंडळाचे माजी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू डहाके यांचा कार्यकाळही संपला. तेव्हापासून मंडळाचे अध्यक्षपद रिक्त होते. अखेर राज्य सरकारच्या शिफारशीनुसार राज्यपालांनी १२ जून रोजी बुलडाणाचे ज्येष्ठ आमदार चैनसुख संचेती यांची मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. पाच टर्म आमदार असलेले संचेती हे भाजपाचे ज्येष्ठ आमदार आहेत. परंतु दोन महिने लोटल्यानंतरही संचेती मंडळाचे अध्यक्षपद सांभाळण्यास तयार नाहीत. असे सांगितले जाते की, संचेती यांचे सर्व लक्ष राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर लागून आहे. भाजपच्या सूत्रानुसार संचेती यांना कॅबिनेट मंत्रिपद हवे आहे. विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्षपद हे राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले आहे.इतर महत्त्वाची पदेही रिक्तविदर्भ विकास मंडळाच्या प्रशासनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असलेले सदस्य सचिवाचे पदही रिक्त आहे. सरकारला या पदासाठी अजूनही स्थायी आयएएस अधिकारी मिळू शकलेला नाही. या पदाचा प्रभार रंगा नाईक हे सांभाळत आहेत. रिसर्च आॅफिसर मेघा इंगळे यांची बदली झाल्यानंतर ते पदही रिक्त आहे. प्रभारींच्या भरवशावरच मंडळाचे काम सुरू आहे.मार्च महिन्यात पार पडली मागची बैठकनियमानुसार वर्षभरात मंडळाच्या सहा बैठका होणे आवश्यक आहे. परंतु मार्च महिन्यापासून आतापर्यंत एकही बैठक झालेली नाही. म्हणजेच चार महिन्यात एकही बैठक झाली नाही. मंडळाचे तज्ज्ञ सदस्य डॉ. कपिल चंद्रायण यांनी नुकतेच याविषयावर राज्यपालांना पत्र लिहून चिंंता व्यक्त केली आहे.

 

टॅग्स :commissionerआयुक्तNagpur Divisional Commissioner Officeनागपूर विभागीय आयुक्त कार्यालय