शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शासनाची नरमाईची भूमिका, शुक्रवारपासून दुकाने सुरू होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 00:49 IST

Shops will start from Friday महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांच्या एकमुखी मागणीचा विचार करीत बुधवारी विविध व्यापारी संघटनांच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारपासून सर्व प्रकारची दुकाने सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.

ठळक मुद्देव्यापाऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे संकेत : लॉकडाऊनच्या निर्णयाने व्यापारी संतप्त

लोकमत  न्यूज  नेटवर्क 

नागपूर : महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांच्या एकमुखी मागणीचा विचार करीत बुधवारी विविध व्यापारी संघटनांच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारपासून सर्व प्रकारची दुकाने सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी बुधवारी राज्यातील सर्वच व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे अध्यक्ष बी. सी. भरतीया यांनी नागपुरातून बैठकीत भाग घेतला. व्यापाऱ्यांची मते मुख्यमंत्र्यांनी ऐकून घेतली. भरतीया बैठकीत म्हणाले, सर्वांना एकत्रितपणे कोरोना आजाराविरुद्ध लढायचे आहे. वेळेची मर्यादा ठेवून दुकाने सुरू करावीत. खासगी कार्यालये आणि शासकीय कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या ठेवाव्यात. मुख्यमंत्र्यांनी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बाजू ऐकली. ते म्हणाले, आपल्याला एकत्रितपणे कोरोनावर मात करायची आहे. व्यापाऱ्यांच्या गंभीर प्रश्नांवर विचार करू. दोन दिवसांचा वेळ द्यावा. त्यावर उचित निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्र्यांच्या संकेतामुळे शासन व्यापाऱ्यांसमोर नमल्याचे दिसून आले. शुक्रवारपासून दुकाने सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भरतीया म्हणाले, शासनाने ५ एप्रिलच्या रात्रीपासून कठोर निर्बंध लावून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व प्रकारची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला. अर्थात शासनाने ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावले. हा निर्णय व्यापाऱ्यांसाठी आश्चर्यकारक होता. या निर्णयाचा महाराष्ट्रातील व्यापारी विरोध करीत आहेत. आर्थिक नुकसानीचा निर्णय मागे घेण्यासाठी अनेक व्यापारी संघटनांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. व्यापाऱ्यांच्या मागणीवर निर्णय घेत बुधवारी मुख्यमंत्र्यांनी व्यापारी संघटनांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

टॅग्स :Marketबाजारcorona virusकोरोना वायरस बातम्या