शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

सरकारची हिरवी झेंडी, मनपाची आमसभा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 21:42 IST

महाराष्ट्र शासनाने महापालिकेची सभा घेण्यास हिरवी झेंडी दिली आहे. शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या पत्रात ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ ठेवून व केंद्र व राज्य सरकारच्या कोविडबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून शनिवारी २० जूनला सकाळी ११ वाजता सुरेश भट सभागृहात सर्वसाधारण सभा होईल.

ठळक मुद्देमुंढे यांना दणका : कोविड-१९ चे नियम पाळून सभा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र शासनाने महापालिकेची सभा घेण्यास हिरवी झेंडी दिली आहे. शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या पत्रात ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ ठेवून व केंद्र व राज्य सरकारच्या कोविडबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून शनिवारी २० जूनला सकाळी ११ वाजता सुरेश भट सभागृहात सर्वसाधारण सभा होईल. तसेच काही सदस्यांना आॅनलाईनद्वारे सभेच्या कामकाजात भाग घेता येईल. महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या आदेशामुळे सत्तापक्षात आनंद संचारला असून सभागृहात मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना घेरण्याची तयारी केली आहे. तीन महिन्यानंतर ही सभा होत असून सत्तापक्षाला विरोधकांची साथ मिळण्याचे संकेत आहेत.नागपूर शहरातील कोविडची सद्यस्थिती विचारात घेता सर्वसाधारण सभा घेणे संयुक्तिक होणार नाही, असा अभिप्राय नमूद करून सभेच्या आयोजनासाठी आयुक्तांनी शासनाचे मार्गदर्शन मागितले होते. शासन आदेशानुसार सभा घेण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला होता. महाराष्ट्र शासनाच्या ३ एप्रिल २०२० च्या निर्णयानुसार सभा घेण्याला अनुमती असल्याचा सत्तापक्षाचा दावा खरा ठरला आहे. आता सभागृहात आयुक्त उपस्थित राहतात की नाही. सत्तापक्ष आयुक्तांना कसे घेरतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मनपाची आर्थिक स्थिती बिकट आहे. विकास कामे ठप्प आहेत. पावसामुळे निर्माण झालेली समस्या अशा मुद्यावरून आयुक्तांना घेरण्याची शक्यता आहे. सत्तापक्ष नेता संदीप जाधव व वरिष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी पत्रकार परिषदेत सभा घेण्याला राज्य सरकारने परवानगी दिल्याची माहिती दिली. आयुक्त लोकप्रतिनिधींचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. कोविड-१९ च्या कालावधीत शहरात चेंबर, गडर लाईन, नाल्याची भिंत, खड्डे दुरुस्ती अशी कामे ठप्प पडली आाहेत. आयुक्त रजवाडा पॅलेसमध्ये ३०० लोकांची सभा घेऊ शकतात तर मग सभागृहात का घेता येत नाही, असा सवाल त्यांनी केला.महापौरांनी शुक्रवारी आयुक्तांना पत्र लिहून ७२ तासात उत्तर मागितले. परंतु उत्तर मिळाले नाही. सभा घेण्याचा निर्णय तुम्ही घेतला आहे. त्यामुळे पत्राला उत्तर देणार नाही, असे आयुक्त मेलद्वारे कळवतात. हे समजण्यापलिकडे असल्याचे त्यांनी सांगितले.आयुक्त उत्तर देण्याला घाबरतातआयुक्त सभा घेण्याच्या विरोधात आहेत. कारण ते लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तर देण्याला घाबरतात, असा आरोप दयाशंकर तिवारी यांनी केला. नगरसेवकांचे अधिकार हिरावण्याचा प्रयत्न सुरू आहे. शहरातील विकास कामे ठप्प आहेत. राजकीय नेत्यांच्या आश्रयात मुंढे यांची मनमानी सुरू आहे. त्यांच्या विरोधात सत्तापक्ष अविश्वास आणणार नाही. सभागृहात जनहिताच्या प्रश्नांना पाठिंबा देण्याची भूमिका राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाGovernmentसरकार