शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

सरकारची हिरवी झेंडी, मनपाची आमसभा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 21:42 IST

महाराष्ट्र शासनाने महापालिकेची सभा घेण्यास हिरवी झेंडी दिली आहे. शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या पत्रात ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ ठेवून व केंद्र व राज्य सरकारच्या कोविडबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून शनिवारी २० जूनला सकाळी ११ वाजता सुरेश भट सभागृहात सर्वसाधारण सभा होईल.

ठळक मुद्देमुंढे यांना दणका : कोविड-१९ चे नियम पाळून सभा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र शासनाने महापालिकेची सभा घेण्यास हिरवी झेंडी दिली आहे. शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या पत्रात ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ ठेवून व केंद्र व राज्य सरकारच्या कोविडबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून शनिवारी २० जूनला सकाळी ११ वाजता सुरेश भट सभागृहात सर्वसाधारण सभा होईल. तसेच काही सदस्यांना आॅनलाईनद्वारे सभेच्या कामकाजात भाग घेता येईल. महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या आदेशामुळे सत्तापक्षात आनंद संचारला असून सभागृहात मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना घेरण्याची तयारी केली आहे. तीन महिन्यानंतर ही सभा होत असून सत्तापक्षाला विरोधकांची साथ मिळण्याचे संकेत आहेत.नागपूर शहरातील कोविडची सद्यस्थिती विचारात घेता सर्वसाधारण सभा घेणे संयुक्तिक होणार नाही, असा अभिप्राय नमूद करून सभेच्या आयोजनासाठी आयुक्तांनी शासनाचे मार्गदर्शन मागितले होते. शासन आदेशानुसार सभा घेण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला होता. महाराष्ट्र शासनाच्या ३ एप्रिल २०२० च्या निर्णयानुसार सभा घेण्याला अनुमती असल्याचा सत्तापक्षाचा दावा खरा ठरला आहे. आता सभागृहात आयुक्त उपस्थित राहतात की नाही. सत्तापक्ष आयुक्तांना कसे घेरतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मनपाची आर्थिक स्थिती बिकट आहे. विकास कामे ठप्प आहेत. पावसामुळे निर्माण झालेली समस्या अशा मुद्यावरून आयुक्तांना घेरण्याची शक्यता आहे. सत्तापक्ष नेता संदीप जाधव व वरिष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी पत्रकार परिषदेत सभा घेण्याला राज्य सरकारने परवानगी दिल्याची माहिती दिली. आयुक्त लोकप्रतिनिधींचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. कोविड-१९ च्या कालावधीत शहरात चेंबर, गडर लाईन, नाल्याची भिंत, खड्डे दुरुस्ती अशी कामे ठप्प पडली आाहेत. आयुक्त रजवाडा पॅलेसमध्ये ३०० लोकांची सभा घेऊ शकतात तर मग सभागृहात का घेता येत नाही, असा सवाल त्यांनी केला.महापौरांनी शुक्रवारी आयुक्तांना पत्र लिहून ७२ तासात उत्तर मागितले. परंतु उत्तर मिळाले नाही. सभा घेण्याचा निर्णय तुम्ही घेतला आहे. त्यामुळे पत्राला उत्तर देणार नाही, असे आयुक्त मेलद्वारे कळवतात. हे समजण्यापलिकडे असल्याचे त्यांनी सांगितले.आयुक्त उत्तर देण्याला घाबरतातआयुक्त सभा घेण्याच्या विरोधात आहेत. कारण ते लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तर देण्याला घाबरतात, असा आरोप दयाशंकर तिवारी यांनी केला. नगरसेवकांचे अधिकार हिरावण्याचा प्रयत्न सुरू आहे. शहरातील विकास कामे ठप्प आहेत. राजकीय नेत्यांच्या आश्रयात मुंढे यांची मनमानी सुरू आहे. त्यांच्या विरोधात सत्तापक्ष अविश्वास आणणार नाही. सभागृहात जनहिताच्या प्रश्नांना पाठिंबा देण्याची भूमिका राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाGovernmentसरकार