शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
3
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
4
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
5
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
6
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
7
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
8
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
9
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
10
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
11
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
12
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
13
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
14
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
15
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
16
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
17
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
18
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
19
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
20
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?

सरकारचा निर्णयच चुकीचा

By admin | Updated: April 28, 2016 02:53 IST

उडीद, मूग, तूर, मसूर या डाळींचे दर निश्चित करण्याआधी शासनाने व्यापाऱ्यांशी चर्चा केलेली नाही.

तूर डाळीची दरनिश्चिती : तुरुंगवासाच्या कायद्यावर व्यापाऱ्यांमध्ये नाराजी नागपूर : उडीद, मूग, तूर, मसूर या डाळींचे दर निश्चित करण्याआधी शासनाने व्यापाऱ्यांशी चर्चा केलेली नाही. शासनाने कच्चा माल माफक दरात उपलब्ध करून दिल्यास तूर डाळीचे दरही आटोक्यात राहतील. पण दोन वर्षांपासून दुष्काळामुळे तुरीचे उत्पन्न फारच कमी असून किंमत जास्त आहे. स्वाभाविकच तूर डाळीची किंमतही जास्त राहील. अशा स्थितीत शासनाने तूर डाळीची दर निश्चिती आणि तुरुंगवासाच्या शिक्षेच्या तरतुदीचा केलेला कायदा चुकीचा असल्याचा सूर व्यापाऱ्यांनी लोकमतशी बोलताना काढला.शासनाच्या निर्णयामुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. डाळ मिल असोसिएशनने बुधवारी बैठक घेऊन शासनाच्या निर्णयावर चिंता व्यक्त केली. आता शासनानेच व्यापार करावा, अशी उपरोधिक टीकाही केली. एवढेच नव्हे तर मंगळवारपर्यंत ठोक बाजारात प्रति किलो १४८ रुपये विकण्यात येणाऱ्या तूर डाळीचे भाव १३८ रुपयांपर्यंत खाली आले. काही दिवसानंतर व्यापारी तूर डाळीची विक्रीच बंद करतील. पर्यायी डाळ मिलमध्ये शुकशुकाट राहील. शासनाने कमी किमतीची व कमी दर्जाची अफ्रिकन देशातील तूर डाळ आयात करावी, अशी सूचनाही व्यापाऱ्यांनी केली. (प्रतिनिधी)कायदा केल्याने डाळ स्वस्त होणार नाहीशासनाने कायदा करण्याचा निर्णय घेतला, पण कायदा केल्याने तूर डाळ स्वस्त होणार नाही. यंदाही कमी उत्पादनाचा अंदाज शासनाला आला तेव्हाच तूर आणि तूर डाळ आयातीचा निर्णय घ्यायला हवा होता. निर्णय घेतला तेव्हा किमती वाढल्या होत्या. डाळ मिलचालकांना ९० रुपये किलो दराने तूर घ्यावी लागते. सर्व प्रक्रियेनंतर तूर डाळ १३० रुपयात पडते. व्यापारी तोटा सहन करून १२० किलो दराने विकणार कशी, असा सवाल आहे. धाडी टाकून शासन व्यापाऱ्यांना त्रास देत आहेत. शासनाने निर्णय मागे घ्यावा.-रमेश उमाटे, बाजार समीक्षक़आता व्यापारही शासनाने करावामालाची किंमत जर शासन ठरवित असेल तर व्यापारही त्यांनीच करावा. सध्या बाजारात कच्ची तूर पर्यायाने तूर डाळीचे भाव आकाशाला भिडले आहेत. व्यापाऱ्यांना डाळ मिलमधूनच डाळ महाग खरेदी करावी लागत आहे. थोडासा नफा कमवून व्यापारी विक्री करीत आहे. १२० रुपये किलो दराने विकण्याचे शासनाचे धोरण असेल तर व्यापारी तूर डाळीची विक्री बंद करतील. लहान व्यापाऱ्यांना वेठीस धरण्याऐवजी केंद्र व राज्य सरकारने देशातील मोठ्या कंपन्यांच्या गोदामावर धाड टाकून लाखो टन तूर डाळीचा साठा ताब्यात घ्यावा. धाड टाकण्याचे धाडस शासनाने दाखविल्यास बाजारात तूर डाळ १०० रुपयांच्या आत येईल आणि ग्राहकांना दिलासा मिळेल. शासनाचा निर्णय चुकीचा आहे.-प्रभाकर देशमुख, अध्यक्षनागपूर चिल्लर किराणा असोसिएशन.निर्णयाने व्यापार संपणारशासनाच्या कठोर निर्णयामुळे डाळ मिलचा व्यवसाय संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाली आहे. निर्णय घेण्याआधी शासनाने व्यापाऱ्यांशी चर्चा करायची हवी होती. सध्या देशी आणि आयातीत तुरीचे भाव ८८०० ते ९००० रुपये क्विंटल आहेत. त्यावर प्रक्रिया खर्च आणि थोडासा नफा मिळविण्यास तूर डाळ १३० रुपयांत घरात पडते. शासनाच्या निर्णयानुसार तूर डाळ १२० रुपये किलो विकणार कशी, असा सवाल आहे. शासनाने देशातील मोठ्या कंपन्यांच्या साठेबाजीवर ठोस निर्णय घेतल्यास बाजारात तूर डाळ कमी किमतीत उपलब्ध होईल.- प्रताप मोटवानी, सचिवइतवारी धान्य असोसिएशन.