शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

महात्मा गांधींच्या तत्त्वांवरच सरकारचे काम : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 21:50 IST

महात्मा गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सामान्य जनतेला तर जोडलेच शिवाय त्यांनी देशाला स्वयंशासन, स्वच्छता, ग्रामविकास ही मूल्येदेखील दिली. त्यांच्या तत्त्वावरच केंद्र व राज्य शासन चालत असून जनतेपर्यंत महात्मा गांधी यांची मूल्ये पोहचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित स्वच्छता सेवा संदेश पदयात्रेत ते सहभागी झाले होते.

ठळक मुद्देस्वच्छता सेवा संदेश पदयात्रेत झाले सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महात्मा गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सामान्य जनतेला तर जोडलेच शिवाय त्यांनी देशाला स्वयंशासन, स्वच्छता, ग्रामविकास ही मूल्येदेखील दिली. त्यांच्या तत्त्वावरच केंद्र व राज्य शासन चालत असून जनतेपर्यंत महात्मा गांधी यांची मूल्ये पोहचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित स्वच्छता सेवा संदेश पदयात्रेत ते सहभागी झाले होते.गजानन नगर येथून सुरू झालेल्या या पदयात्रेत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ.सुधाकर कोहळे, आ.गिरीश व्यास, आ.अनिल सोले, महापौर नंदा जिचकार, लघु उद्योग विकास मंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी प्रामुख्याने उपस्थित होते. महात्मा गांधी यांनी देशाला स्वच्छतेचा मूलमंत्र दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्याच तत्त्वावर चालत आहेत. स्वच्छ भारत अभियानाचे पाऊल त्यातूनच उचलण्यात आले आहे. १९४७ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्रात ५० लाख शौचालये बांधण्यात आली व ४५ टक्के लोकांना त्याचा फायदा झाला. मात्र २०१४ नंतर केवळ तीन वर्षातच आम्ही ६० लाख शौचालय बांधली व १०० टक्के लोकांपर्यंत शौचालयं पोहोचविली. राज्य आज स्वच्छतेकडे वेगाने वाटचाल करत आहे, असे त्यांनी सांगितले.मुख्यमंत्र्यांचा ‘सुपरफास्ट’ वेगसकाळी ७ च्या सुमारास गजानन नगर येथून पदयात्रेला सुुरुवात झाली. यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची उपस्थिती होती. प्रियंकावाडी-रिंग रोड क्रॉस-छत्रपती हॉल-जनता हायस्कुल गल्ली- रिंग रोड प्रगती कॉलनी- तांबे हॉस्पिटल-वर्धा रोड-साई मंदिर-गजानन मंदिर-बौध्द विहार-देवनगर- नेहरूनगर-कसबेकर चौक- नरगुंदकर राजयोग-वर्धा रोड-हल्दीराम-अमर एन्क्लेव्ह-वृंदावन या मार्गाने परत गजानन नगरात दाखल झाली. या पदयात्रेत मुख्यमंत्र्यांच्या चालण्याचा वेग पाहून कार्यकर्तेदेखील थक्क झाले. अनेक जणांना धाप लागत असताना मुख्यमंत्री मात्र उत्साहाने आणि वेगाने चालत होते. पदयात्रेदरम्यान भजन मंडळाने तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘वैष्णव जन को’ हे भजन म्हटले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahatma Gandhiमहात्मा गांधी