शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून 'सरकार' नागपुरात : हिवाळी अधिवेशन उद्यापासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 00:25 IST

हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासूनच सुरुवात होणार असली तरी संपूर्ण सरकार रविवारीच शहरात येणार आहे. महाविकास आघाडीचे हे पहिलेच अधिवेशन ठरणार असल्याने सरकारतर्फे तयारी करण्यात आली आहे तर विरोधक सरकारची कोंडी करण्यासाठी आक्रमक पवित्र्यात आहेत.

ठळक मुद्देविरोधक आक्रमक पवित्र्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासूनच सुरुवात होणार असली तरी संपूर्ण सरकार रविवारीच शहरात येणार आहे. महाविकास आघाडीचे हे पहिलेच अधिवेशन ठरणार असल्याने सरकारतर्फे तयारी करण्यात आली आहे तर विरोधक सरकारची कोंडी करण्यासाठी आक्रमक पवित्र्यात आहेत. रविवारी शहरात विरोधकांची बैठक होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील अधिवेशनात सरकारची भूमिका काय असेल हे स्पष्ट करणार आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दुपारी २ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होणार आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेतर्फे त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. सायंकाळी ५ वाजता ‘रामगिरी’ येथे चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर लगेच ते पत्रपरिषदेला संबोधित करतील. अधिवेशनात पुरवणी मागण्या मंजूर करण्यावर सरकारचा जोर राहणार आहे.तर दुसरीकडे विरोधकांची सकाळी ११ वाजता रविभवन येथील कॉटेज क्रमांक ३ येथे बैठक होणार आहे. या बैठकीत चहापानात सहभागी होण्याबाबत अंतिम निर्णय होईल. या बैठकीला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे उपस्थित राहतील. सरकारची कोंडी करण्यासंदर्भातील मुद्द्यांवरदेखील यात चर्चा होईल.अधिवेशन ठरणार वादळीया अधिवेशनाचा कालावधी कमी असला तरी हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे वक्तव्य तसेच नागरिकत्व संशोधन विधेयकावरुन भाजप आक्रमक पवित्रा घेणार आहे. याशिवाय शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी अतिवृष्टी, विकास कामांवरील स्थगिती या मुद्द्यांवरुनदेखील सरकारला घेरण्यात येईल.प्रश्नोत्तरे नाहीच, लक्षवेधीवर भरविधिमंडळ अधिवेशनाचे कामकाज शनिवारपर्यंत निश्चित झाले आहे. त्यामुळे एकच आठवड्याचे अधिवेशन ठरेल, असे अंदाज लावले जात आहेत. सत्तास्थापना उशिरा झाल्याने यंदा अधिवेशनात प्रश्नोत्तरे राहणार नाहीत. त्यामुळे आमदारांचा भर लक्षवेधी सूचनांवर राहणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विधीमंडळ सचिवालयाला एक हजारांहून अधिक प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.अधिवेशनाच्या कालावधीवरुन नाराजीमहाविकासआघाडी शासनाचे पहिलेच अधिवेशन विदर्भात होत असल्याने या भागाला न्याय देण्यासाठी जास्त दिवस अधिवेशन घ्यावे, अशी मागणी होती. परंतु प्रत्यक्षात केवळ सहाच दिवस अधिवेशन चालण्याची दाट शक्यता असल्यामुळे विदर्भातील आमदारांसह विविध संघटना व नागरिकांमध्येदेखील नाराजीचा सूर आहे. यावरुनदेखील सरकारला घेरण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनnagpurनागपूर