शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

आजपासून 'सरकार' नागपुरात : हिवाळी अधिवेशन उद्यापासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 00:25 IST

हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासूनच सुरुवात होणार असली तरी संपूर्ण सरकार रविवारीच शहरात येणार आहे. महाविकास आघाडीचे हे पहिलेच अधिवेशन ठरणार असल्याने सरकारतर्फे तयारी करण्यात आली आहे तर विरोधक सरकारची कोंडी करण्यासाठी आक्रमक पवित्र्यात आहेत.

ठळक मुद्देविरोधक आक्रमक पवित्र्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासूनच सुरुवात होणार असली तरी संपूर्ण सरकार रविवारीच शहरात येणार आहे. महाविकास आघाडीचे हे पहिलेच अधिवेशन ठरणार असल्याने सरकारतर्फे तयारी करण्यात आली आहे तर विरोधक सरकारची कोंडी करण्यासाठी आक्रमक पवित्र्यात आहेत. रविवारी शहरात विरोधकांची बैठक होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील अधिवेशनात सरकारची भूमिका काय असेल हे स्पष्ट करणार आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दुपारी २ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होणार आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेतर्फे त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. सायंकाळी ५ वाजता ‘रामगिरी’ येथे चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर लगेच ते पत्रपरिषदेला संबोधित करतील. अधिवेशनात पुरवणी मागण्या मंजूर करण्यावर सरकारचा जोर राहणार आहे.तर दुसरीकडे विरोधकांची सकाळी ११ वाजता रविभवन येथील कॉटेज क्रमांक ३ येथे बैठक होणार आहे. या बैठकीत चहापानात सहभागी होण्याबाबत अंतिम निर्णय होईल. या बैठकीला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे उपस्थित राहतील. सरकारची कोंडी करण्यासंदर्भातील मुद्द्यांवरदेखील यात चर्चा होईल.अधिवेशन ठरणार वादळीया अधिवेशनाचा कालावधी कमी असला तरी हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे वक्तव्य तसेच नागरिकत्व संशोधन विधेयकावरुन भाजप आक्रमक पवित्रा घेणार आहे. याशिवाय शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी अतिवृष्टी, विकास कामांवरील स्थगिती या मुद्द्यांवरुनदेखील सरकारला घेरण्यात येईल.प्रश्नोत्तरे नाहीच, लक्षवेधीवर भरविधिमंडळ अधिवेशनाचे कामकाज शनिवारपर्यंत निश्चित झाले आहे. त्यामुळे एकच आठवड्याचे अधिवेशन ठरेल, असे अंदाज लावले जात आहेत. सत्तास्थापना उशिरा झाल्याने यंदा अधिवेशनात प्रश्नोत्तरे राहणार नाहीत. त्यामुळे आमदारांचा भर लक्षवेधी सूचनांवर राहणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विधीमंडळ सचिवालयाला एक हजारांहून अधिक प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.अधिवेशनाच्या कालावधीवरुन नाराजीमहाविकासआघाडी शासनाचे पहिलेच अधिवेशन विदर्भात होत असल्याने या भागाला न्याय देण्यासाठी जास्त दिवस अधिवेशन घ्यावे, अशी मागणी होती. परंतु प्रत्यक्षात केवळ सहाच दिवस अधिवेशन चालण्याची दाट शक्यता असल्यामुळे विदर्भातील आमदारांसह विविध संघटना व नागरिकांमध्येदेखील नाराजीचा सूर आहे. यावरुनदेखील सरकारला घेरण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनnagpurनागपूर