शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शासनाने एलबीटी कायदा पूर्णपणे रद्द करावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 20:38 IST

एलबीटी कायदेशीर प्रक्रिया पूर्णत: रद्द करून व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी नाग विदर्भ चेंबरऑफ कॉमर्सचे (एनव्हीसीसी) अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी येथे केली.

ठळक मुद्देएनव्हीसीसीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी : विभागातर्फे अव्यावहारिक डिमांड नोटीस

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : एलबीटी कर कायदेशीररीत्या रद्द झाल्यानंतरही त्याची भीती व्यापाऱ्यांना आजही सतावत आहे. एलबीटी विभागाद्वारे असेसमेंटच्या नावाखाली व्यापाऱ्यांना त्रास देण्यात येत आहे. विभागातर्फे बेस्ट जजमेंट आणि पेनॉल्टीच्या नावावर अव्यावहारिक डिमांड नोटीस पाठविण्यात येत आहे. एलबीटी कायदेशीर प्रक्रिया पूर्णत: रद्द करून व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी नाग विदर्भ चेंबरऑफ कॉमर्सचे (एनव्हीसीसी) अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी येथे केली.एनव्हीसीच्या सभागृहात चर्चेदरम्यान मेहाडिया बोलत होते. यावेळी माजी अध्यक्ष प्रकाश मेहाडिया, उपाध्यक्ष अर्जुनदास आहुजा, फारुखभाई अकबानी, संजय के. अग्रवाल, सचिव रामअवतार तोतला, सहसचिव शब्बार शाकीर, राजू माखिजा उपस्थित होते.अश्विन मेहाडिया म्हणाले, राज्यातील सरकार शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे हित जोपासत आहे. जुलै २०१६ मध्ये राज्य शासनाने जीवनाश्यक वस्तूंना सर्व प्रकारच्या करातून मुक्त केले होते. पण या वस्तूंवर राज्याच्या एपीएमसी बाजारात सेस वसूल करण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांनी एपीएमसीमध्ये जाणे कमी केले आहे. सरकारने एपीएमसी बाजारातून सेस हटविल्यास व्यापाऱ्यांची एपीएमसीमध्ये खरेदीची इच्छा वाढेल आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात महाराष्ट्र राज्य आर्थिक समृद्धीने परिपूर्ण होईल तसेच पूर्णत: भयमुक्त आणि सुरक्षित राहील, असे मेहाडिया यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :businessव्यवसायTaxकरChief Ministerमुख्यमंत्री