शहरं
Join us  
Trending Stories
1
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
2
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवास वेळेत 17 तासांची बचत होणार
3
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
4
Municipal Election 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! सहा उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक'
5
गुंतवणूक सोन्यात की शेअर बाजारात? ३ लाखांच्या सोन्यावर पुढील वर्षी किती नफा मिळेल? सोपं गणित
6
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
7
नशीब असावं तर असं! राष्ट्रवादीतून भाजपात आल्या आणि २४ तासांत झाल्या नगरसेविका, धुळ्यात उज्वला भोसले बिनविरोध
8
कोट्यवधीची रोकड, सोने हिऱ्यांनी भरलेली बॅग अन् बरेच काही...; ED च्या हाती कुणाचं लागलं 'घबाड'?
9
'ऑपरेशन सिंदूर'वर लष्कर-ए-तैयबा प्रमुख हाफिज सईदचे मोठे वक्तव्य; म्हणाला- 'भारत पुढील 50 वर्षे...'
10
Happy New Year 2026 Wishes: नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Quotes, Messages, WhatsApp Status शेअर करत स्वागत करा नव्या वर्षाचं!
11
Nimesulide Banned: निमसुलाइड औषधावर सरकारनं घातली बंदी, किडनीसाठी अत्यंत धोकादायक!
12
मुंबई महापालिकेसाठी भाजपाची १३७ उमेदवारांची यादी जाहीर; किती अमराठी उमेदवारांना दिली संधी?
13
शिंदेसेनेचे स्वबळावर ७४ उमेदवार! महायुतीचे जागावाटप बारगळले; निवडणूक होणार चुरशीची
14
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं कमळ, भाजपाचे ३ नगरसेवक बिनविरोध 
15
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
16
धनंजय मुंडे यांना दिलासा! करुणा मुंडे यांची याचिका कोर्टाने फेटाळली, काय होतं प्रकरण?
17
भांडवलशाहीचा 'भीष्म पितामह' निवृत्त! दिवाळखोर कंपनीतून वॉरेन बफेंनी कसे उभारले अब्जावधींचे साम्राज्य?
18
अभिषेक बच्चनचं पत्नीसोबत 'न्यू इयर सेलिब्रेशन', चाहतीसोबत फोटो; ऐश्वर्याच्या सौंदर्यावर सगळेच फिदा
19
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
20
कानात ब्लूटूथ इयरफोन लावल्याने कॅन्सरचा मोठा धोका? एक्सपर्ट्सनी सांगितलं 'सत्य'
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने शेतकऱ्यांप्रती संवेदनशील व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 20:09 IST

निसर्गाची साथ न मिळाल्यामुळे शेतीत हवे तसे उत्पादन होत नाही. उत्पादन झाले तरी योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येचा निर्णय घेतो. त्यामुळे शेतकऱ्यांना या आत्महत्येच्या सत्रातून बाहेर काढण्यासाठी शासनाने संवेदनशील होऊन शेतकऱ्यांसाठी उपाययोजना करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.

ठळक मुद्देजनमंचतर्फे अन्नदात्यासाठी सहवेदना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निसर्गाची साथ न मिळाल्यामुळे शेतीत हवे तसे उत्पादन होत नाही. उत्पादन झाले तरी योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येचा निर्णय घेतो. त्यामुळे शेतकऱ्यांना या आत्महत्येच्या सत्रातून बाहेर काढण्यासाठी शासनाने संवेदनशील होऊन शेतकऱ्यांसाठी उपाययोजना करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील चिलगव्हाण येथील साहेबराव पाटील करपे यांनी पत्नी व चार मुलांसह वर्धा, दत्तपूर येथील मनोहर कुष्ठधामात आत्महत्या केली होती. १९ मार्चला या घटनेला ३३ वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे जनमंचने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांविषयी सहवेदना व्यक्त करण्यासाठी महाराजबाग चौकातील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ््याजवळ अन्नदात्यासाठी सहवेदना या धरणे, विचारमंथन कार्यक्रमाचे आयोजन केले. जनमंचचे अध्यक्ष प्रमोद पांडे म्हणाले, शेतकऱ्यांचे प्रश्न अनेक वर्षांपासून जैसे थे आहेत. आत्महत्या कमी झालेल्या नाहीत. शेतमालाला भाव मिळत नाही. त्यामुळे शासनाने शेतकरी आत्मसन्मान योजनेची रक्कम वाढवून दिलासा देण्याची गरज आहे. जनमंच सिंचन शोध यात्रेला यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. अमिताभ पावडे म्हणाले, भरघोस उत्पादन झाल्यामुळे भाव घटून उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. तो कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतो. त्यामुळे ही व्यवस्था बदलण्याची गरज आहे. रमेश बोरकुटे म्हणाले, देशात कोट्यवधी रुपये बुडवून उद्योगपती पळून जातात. परंतु शेतात राबूनही शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागते. शासनाने त्यांना १० हजार पेन्शन देण्याची गरज आहे. सुधीर पालीवाल यांनी ग्लोबल वार्मिंगचा पर्यावरण, शेतीवर परिणाम होत असून जनमंचने याबाबत पुढाकार घेण्याचे आवाहन केले. रामभाऊ आखरे,चंद्रकांत विरखरे यांनी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून शासनाने उपाययोजना करण्याची मागणी केली. जनमंचचे सहसचिव अ‍ॅड. मनोहर रडके यांनी सामूहिक शेती केल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे सांगितले. दादा झोडे यांनी शेतीला दर्जा मिळवून देण्यासाठी शेतमालाला भाव, रोजंदारीची समस्या यातील असमतोल दूर करण्याची मागणी केली. प्रास्ताविकातून नरेश क्षीरसागर यांनी शेतकऱ्यांना आत्मबल देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. संचालन श्रीकांत दोड यांनी केले. यावेळी जनमंचचे सल्लागार प्रा. शरद पाटील, राजीव जगताप, टी. बी. जगताप, विनोद बोरकुटे, गणेश खर्चे, प्रल्हाद खरसने, विट्ठल जावळकर, लक्ष्मण सावळकर, प्रभाकर खोंडे, मुन्ना महाजन उपस्थित होते.

 

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार