शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

शासनाने शेतकऱ्यांप्रती संवेदनशील व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 20:09 IST

निसर्गाची साथ न मिळाल्यामुळे शेतीत हवे तसे उत्पादन होत नाही. उत्पादन झाले तरी योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येचा निर्णय घेतो. त्यामुळे शेतकऱ्यांना या आत्महत्येच्या सत्रातून बाहेर काढण्यासाठी शासनाने संवेदनशील होऊन शेतकऱ्यांसाठी उपाययोजना करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.

ठळक मुद्देजनमंचतर्फे अन्नदात्यासाठी सहवेदना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निसर्गाची साथ न मिळाल्यामुळे शेतीत हवे तसे उत्पादन होत नाही. उत्पादन झाले तरी योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येचा निर्णय घेतो. त्यामुळे शेतकऱ्यांना या आत्महत्येच्या सत्रातून बाहेर काढण्यासाठी शासनाने संवेदनशील होऊन शेतकऱ्यांसाठी उपाययोजना करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील चिलगव्हाण येथील साहेबराव पाटील करपे यांनी पत्नी व चार मुलांसह वर्धा, दत्तपूर येथील मनोहर कुष्ठधामात आत्महत्या केली होती. १९ मार्चला या घटनेला ३३ वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे जनमंचने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांविषयी सहवेदना व्यक्त करण्यासाठी महाराजबाग चौकातील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ््याजवळ अन्नदात्यासाठी सहवेदना या धरणे, विचारमंथन कार्यक्रमाचे आयोजन केले. जनमंचचे अध्यक्ष प्रमोद पांडे म्हणाले, शेतकऱ्यांचे प्रश्न अनेक वर्षांपासून जैसे थे आहेत. आत्महत्या कमी झालेल्या नाहीत. शेतमालाला भाव मिळत नाही. त्यामुळे शासनाने शेतकरी आत्मसन्मान योजनेची रक्कम वाढवून दिलासा देण्याची गरज आहे. जनमंच सिंचन शोध यात्रेला यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. अमिताभ पावडे म्हणाले, भरघोस उत्पादन झाल्यामुळे भाव घटून उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. तो कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतो. त्यामुळे ही व्यवस्था बदलण्याची गरज आहे. रमेश बोरकुटे म्हणाले, देशात कोट्यवधी रुपये बुडवून उद्योगपती पळून जातात. परंतु शेतात राबूनही शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागते. शासनाने त्यांना १० हजार पेन्शन देण्याची गरज आहे. सुधीर पालीवाल यांनी ग्लोबल वार्मिंगचा पर्यावरण, शेतीवर परिणाम होत असून जनमंचने याबाबत पुढाकार घेण्याचे आवाहन केले. रामभाऊ आखरे,चंद्रकांत विरखरे यांनी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून शासनाने उपाययोजना करण्याची मागणी केली. जनमंचचे सहसचिव अ‍ॅड. मनोहर रडके यांनी सामूहिक शेती केल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे सांगितले. दादा झोडे यांनी शेतीला दर्जा मिळवून देण्यासाठी शेतमालाला भाव, रोजंदारीची समस्या यातील असमतोल दूर करण्याची मागणी केली. प्रास्ताविकातून नरेश क्षीरसागर यांनी शेतकऱ्यांना आत्मबल देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. संचालन श्रीकांत दोड यांनी केले. यावेळी जनमंचचे सल्लागार प्रा. शरद पाटील, राजीव जगताप, टी. बी. जगताप, विनोद बोरकुटे, गणेश खर्चे, प्रल्हाद खरसने, विट्ठल जावळकर, लक्ष्मण सावळकर, प्रभाकर खोंडे, मुन्ना महाजन उपस्थित होते.

 

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार