शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सरकारी वकिलांची अकार्यक्षमता हायकोर्टाच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 23:33 IST

सरकारी वकिलांची अकार्यक्षमता पुन्हा एकदा उच्च न्यायालयाच्या रडारवर आली आहे. न्यायालयाने सरकारी वकिलांवर ताशेरे ओढून राज्य सरकारला यावर सखोल स्पष्टीकरण मागितले आहे.

ठळक मुद्देताशेरे ओढले : राज्य सरकारला मागितले स्पष्टीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकारी वकिलांची अकार्यक्षमता पुन्हा एकदा उच्च न्यायालयाच्या रडारवर आली आहे. न्यायालयाने सरकारी वकिलांवर ताशेरे ओढून राज्य सरकारला यावर सखोल स्पष्टीकरण मागितले आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात बालाजी किन्हाळे यांचे फौजदारी अपील प्रलंबित आहे. अपीलवर न्यायमूर्ती रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी होत होती. दरम्यान, सरकारच्या बाजूने न्यायालयाला आवश्यक सहकार्य मिळत नव्हते. काही महिन्यांमध्ये अन्य विविध प्रकरणात हा अनुभव आल्यामुळे न्यायालयाने या समस्येचा सोक्षमोक्ष लावण्याचा निर्णय घेऊन सरकारी वकिलांवर ताशेरे ओढले. सरकारी वकील प्रकरणाची तयारी करून येत नाहीत हे निरीक्षण नोंदविताना वाईट वाटते. परंतु, यासंदर्भात आवश्यक उपाय करणे गरजेचे आहे. कोणत्याही प्रकरणात सरकारी वकिलांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असते. त्यांच्याकडून प्रभावी सहकार्य न मिळाल्यास त्याचा न्यायदान प्रक्रियेवर गंभीर परिणाम होतो असे मत न्यायालयाने व्यक्त केले.ही समस्या सोडविण्यासाठी न्यायालयाने विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिवांना तीन प्रश्नांची उत्तरे मागितली आहे. त्यात, विशिष्ट कालावधीनंतर सर्व प्रकारच्या सरकारी वकिलांची कामगिरी तपासली जाते काय, ही प्रक्रिया अस्तित्वात असल्यास सरकारी वकिलांची कामगिरी समाधानकारक आढळून येते काय व कामगिरी समाधानकारक आढळून आली नाही तर, त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यात येतात काय या तीन प्रश्नांचा समावेश आहे. प्रधान सचिवांना स्वत:च्या नावाने येत्या १२ मार्चपर्यंत न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. प्रतिज्ञापत्रासोबत प्रत्येक सरकारी वकिलाच्या कामगिरीचा अहवालही मागण्यात आला आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयadvocateवकिल