शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

सरकारी वकिलांची अकार्यक्षमता हायकोर्टाच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 23:33 IST

सरकारी वकिलांची अकार्यक्षमता पुन्हा एकदा उच्च न्यायालयाच्या रडारवर आली आहे. न्यायालयाने सरकारी वकिलांवर ताशेरे ओढून राज्य सरकारला यावर सखोल स्पष्टीकरण मागितले आहे.

ठळक मुद्देताशेरे ओढले : राज्य सरकारला मागितले स्पष्टीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकारी वकिलांची अकार्यक्षमता पुन्हा एकदा उच्च न्यायालयाच्या रडारवर आली आहे. न्यायालयाने सरकारी वकिलांवर ताशेरे ओढून राज्य सरकारला यावर सखोल स्पष्टीकरण मागितले आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात बालाजी किन्हाळे यांचे फौजदारी अपील प्रलंबित आहे. अपीलवर न्यायमूर्ती रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी होत होती. दरम्यान, सरकारच्या बाजूने न्यायालयाला आवश्यक सहकार्य मिळत नव्हते. काही महिन्यांमध्ये अन्य विविध प्रकरणात हा अनुभव आल्यामुळे न्यायालयाने या समस्येचा सोक्षमोक्ष लावण्याचा निर्णय घेऊन सरकारी वकिलांवर ताशेरे ओढले. सरकारी वकील प्रकरणाची तयारी करून येत नाहीत हे निरीक्षण नोंदविताना वाईट वाटते. परंतु, यासंदर्भात आवश्यक उपाय करणे गरजेचे आहे. कोणत्याही प्रकरणात सरकारी वकिलांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असते. त्यांच्याकडून प्रभावी सहकार्य न मिळाल्यास त्याचा न्यायदान प्रक्रियेवर गंभीर परिणाम होतो असे मत न्यायालयाने व्यक्त केले.ही समस्या सोडविण्यासाठी न्यायालयाने विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिवांना तीन प्रश्नांची उत्तरे मागितली आहे. त्यात, विशिष्ट कालावधीनंतर सर्व प्रकारच्या सरकारी वकिलांची कामगिरी तपासली जाते काय, ही प्रक्रिया अस्तित्वात असल्यास सरकारी वकिलांची कामगिरी समाधानकारक आढळून येते काय व कामगिरी समाधानकारक आढळून आली नाही तर, त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यात येतात काय या तीन प्रश्नांचा समावेश आहे. प्रधान सचिवांना स्वत:च्या नावाने येत्या १२ मार्चपर्यंत न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. प्रतिज्ञापत्रासोबत प्रत्येक सरकारी वकिलाच्या कामगिरीचा अहवालही मागण्यात आला आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयadvocateवकिल