शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
2
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
3
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
4
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
5
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
6
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
7
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
8
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका
9
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब आणि मुलावर गुन्हा दाखल; १५० हून अधिक लोकांना लाखोंचा फटका
10
Stock Market Today: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, निफ्टी ४० अंकांनी घसरला; Glenmark Pharma, Dixon Tech मध्ये तेजी
11
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
12
कुलदीप यादव सुसाट! जडेजा आणि मुरलीधरनचा रेकॉर्ड ब्रेक, मलिंगाचाही 'हा' विक्रम धोक्यात
13
पाकिस्तानची स्थिती बिकट होणार! भारतीय हवाई दलाला मिळणार ९७ तेजस विमाने
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार ७ नियम, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; ऑनलाइन गेमिंगपासून तिकिटापर्यंत आहे यादीत
15
Asia Cup 2025: हारिस रौफ आणि साहिबजादा फरहानवर बंदीची टांगती तलवार, मैदानातील गैरवर्तन महागात पडणार?
16
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
17
या संकटात बळीराजा तू एकटा नाहीस, अख्खा महाराष्ट्र सोबत आहे; हताश शेतकरी घेतायेत मृत्यूशी गळाभेट
18
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
19
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
20
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?

सरकार मायबापहो निवृत्त कर्मचाऱ्यांना न्याय द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 20:37 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही आणि संसदेच्या दोन्ही सभागृहात तो आदेश कायदा म्हणून पारित केल्यानंतरही सरकारकडून निवृत्त कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या पेनशनबाबत अद्यापही कारवाई न करता केंद्रातर्फे त्या विरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आलेली आहे. ही याचिका परत घेऊन सरकारने कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी निवृत्त कर्मचारी (१९९५) समन्वय समितीने केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही आणि संसदेच्या दोन्ही सभागृहात तो आदेश कायदा म्हणून पारित केल्यानंतरही सरकारकडून निवृत्त कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या पेनशनबाबत अद्यापही कारवाई न करता केंद्रातर्फे त्या विरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आलेली आहे. ही याचिका परत घेऊन सरकारने कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी निवृत्त कर्मचारी (१९९५) समन्वय समितीने केली आहे.या मागणीचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले आहे. ही याचिका ६७ लाख निवृत्त पेन्शनर्स आणि १७.२ कोटी कार्यरत कर्मचाऱ्यांना या पेन्शन योजनेत समाविष्ट करण्यासंदर्भात आहे. सर्वोच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा मार्ग मोकळा केल्यानंतर सरकारने संसदेच्या दोन्ही सभागृहातून हा निर्णय पारित करवून घेतला आणि २३ मार्च २०१७ रोजी परिपत्रक काढले होते. मात्र, आपल्याच निर्णयावर अडून न राहता सरकारने एक्स्टेंडेड व अनएक्सटेंडेड अशी विभागवारी करावी अशी याचिका कोर्टात ३१ मार्च २०१७ रोजी सादर केली. ही याचिका सर्वोच्च न्यायालय व इतर सहा उच्च न्यायालयांनी रद्द केली. तरी देखील सरकारने सर्वोच्च न्यायालयात याबाबत पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. त्यास्तव सरकारने ही पुनर्विचार याचिका रद्द करावी व निवृत्त कर्मचारी व कार्यरत कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा विचार करण्याचे आवाहन निवृत्त कर्मचारी (१९९५) समन्वय समितीतर्फे समितीचे राष्ट्रीय कायदे सल्लागार दादा झोडे व राष्ट्रीय महामंत्री प्रकाश पाठक यांनी पंतप्रधानांना केले आहे.५० हजार कोविड अनुदान द्यावेनिवृत्त कर्मचाऱ्यांना पाचशे ते हजार रुपये पेनशन मिळत आहे. त्यातही पुनर्विचार याचिकेमुळे ही पेन्शन रद्द करण्यात आली आहे. त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव निर्माण झाला आणि कर्मचाऱ्यांची समस्या आणखीच वाढली आहे. त्यामुळे सरकारने याचिका मागे घेऊन अशा कर्मचाऱ्यांना ५० हजार रुपये कोविड अनुदान निवृत्त कर्मचाऱ्यांना द्यावे आणि एक लाख रुपये अ‍ॅडव्हान्स म्हणून देण्यात यावे, अशी मागणी प्रकाश पाठक यांनी केली आहे. एक लाख रुपये अ‍ॅडव्हान्स भगतसिंह कोशियारी कमिटीने केलेल्या कायदा दुरुस्तीतून ही रक्कम नंतर कपात करून घ्यावी, असे ते म्हणाले.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार