शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

सरकार मायबापहो निवृत्त कर्मचाऱ्यांना न्याय द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 20:37 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही आणि संसदेच्या दोन्ही सभागृहात तो आदेश कायदा म्हणून पारित केल्यानंतरही सरकारकडून निवृत्त कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या पेनशनबाबत अद्यापही कारवाई न करता केंद्रातर्फे त्या विरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आलेली आहे. ही याचिका परत घेऊन सरकारने कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी निवृत्त कर्मचारी (१९९५) समन्वय समितीने केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही आणि संसदेच्या दोन्ही सभागृहात तो आदेश कायदा म्हणून पारित केल्यानंतरही सरकारकडून निवृत्त कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या पेनशनबाबत अद्यापही कारवाई न करता केंद्रातर्फे त्या विरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आलेली आहे. ही याचिका परत घेऊन सरकारने कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी निवृत्त कर्मचारी (१९९५) समन्वय समितीने केली आहे.या मागणीचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले आहे. ही याचिका ६७ लाख निवृत्त पेन्शनर्स आणि १७.२ कोटी कार्यरत कर्मचाऱ्यांना या पेन्शन योजनेत समाविष्ट करण्यासंदर्भात आहे. सर्वोच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा मार्ग मोकळा केल्यानंतर सरकारने संसदेच्या दोन्ही सभागृहातून हा निर्णय पारित करवून घेतला आणि २३ मार्च २०१७ रोजी परिपत्रक काढले होते. मात्र, आपल्याच निर्णयावर अडून न राहता सरकारने एक्स्टेंडेड व अनएक्सटेंडेड अशी विभागवारी करावी अशी याचिका कोर्टात ३१ मार्च २०१७ रोजी सादर केली. ही याचिका सर्वोच्च न्यायालय व इतर सहा उच्च न्यायालयांनी रद्द केली. तरी देखील सरकारने सर्वोच्च न्यायालयात याबाबत पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. त्यास्तव सरकारने ही पुनर्विचार याचिका रद्द करावी व निवृत्त कर्मचारी व कार्यरत कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा विचार करण्याचे आवाहन निवृत्त कर्मचारी (१९९५) समन्वय समितीतर्फे समितीचे राष्ट्रीय कायदे सल्लागार दादा झोडे व राष्ट्रीय महामंत्री प्रकाश पाठक यांनी पंतप्रधानांना केले आहे.५० हजार कोविड अनुदान द्यावेनिवृत्त कर्मचाऱ्यांना पाचशे ते हजार रुपये पेनशन मिळत आहे. त्यातही पुनर्विचार याचिकेमुळे ही पेन्शन रद्द करण्यात आली आहे. त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव निर्माण झाला आणि कर्मचाऱ्यांची समस्या आणखीच वाढली आहे. त्यामुळे सरकारने याचिका मागे घेऊन अशा कर्मचाऱ्यांना ५० हजार रुपये कोविड अनुदान निवृत्त कर्मचाऱ्यांना द्यावे आणि एक लाख रुपये अ‍ॅडव्हान्स म्हणून देण्यात यावे, अशी मागणी प्रकाश पाठक यांनी केली आहे. एक लाख रुपये अ‍ॅडव्हान्स भगतसिंह कोशियारी कमिटीने केलेल्या कायदा दुरुस्तीतून ही रक्कम नंतर कपात करून घ्यावी, असे ते म्हणाले.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार