शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

सरकारने लोकशाही संस्थांचे खच्चीकरण चालविले आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:32 IST

लोकशाही मार्गाने सत्तेत येऊनही संविधानाची चौकट मोडून लोकशाही संस्थांचे खच्चीकरण करण्याची प्रक्रिया आरएसएसच्या प्रभावाखाली असलेल्या सरकारने चालविली असल्याची घणाघाती टीका पत्रकार निखिल वागळे यांनी सोमवारी येथे केली.

ठळक मुद्देनिखिल वागळे : देशात अघोषित आणीबाणी असल्याची टीका

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांनी राष्ट्रनिर्माण आणि विकासाच्या मुद्यावरच लोकसभेची निवडणूक लढविली होती आणि जनतेनेही त्यांनी सत्ता सोपविली. मात्र गेल्या चार वर्षात दिलेले एकही आश्वासन सरकारने पूर्ण केले नाही. या प्रश्नांना नियोजितपणे बाजूला ठेवून धार्मिक ध्रुवीकरणाद्वारे हिंदू राष्ट्र निर्मितीचा आणि भारताचे हिंदू पाकिस्तान करण्याचा उघड कट रचला गेला आहे. यासाठी सत्तेच्या दबावातून प्रसार माध्यमे आणि न्यायव्यवस्थेतही ढवळाढवळ केली जात आहे. लोकशाही मार्गाने सत्तेत येऊनही संविधानाची चौकट मोडून लोकशाही संस्थांचे खच्चीकरण करण्याची प्रक्रिया आरएसएसच्या प्रभावाखाली असलेल्या सरकारने चालविली असल्याची घणाघाती टीका पत्रकार निखिल वागळे यांनी सोमवारी येथे केली.बाळासाहेब सरोदे अमृत महोत्सव समितीच्यावतीने सर्वोदय आश्रम येथे सोमवारी ‘राष्ट्रनिर्माण आणि धर्मउत्थानात लोकशाहीचा गळा दाबला जातोय का?’ या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर बाळासाहेब सरोदे, मंगला सरोदे, अ‍ॅड. असीम सरोदे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बोलताना निखिल वागळे यांनी संघ आणि भाजपा सरकारवर थेट हल्ला केला. लोकशाही मार्गाने सत्तापरिवर्तन होते, यात काही गैर नाही. मात्र गेल्या चार वर्षात शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत. बेरोजगारीच्या समस्येमुळे युवक नाराज आहेत. मात्र हे मुद्दे सोडून हिंदुत्वाचा मुद्दा पुढे रेटला जात आहे. यासाठी वेगवेगळ्या संघटनांचे मुखवटे लावून उन्माद केला जात आहे. मात्र यामागे संघ ही एकच मातृसंघटना असल्याचा आरोप त्यांनी केला. २०१९ च्या निवडणुका राम मंदिराच्या अजेंड्यावरच लढविल्या जाणार आहेत. निवडणुका जवळ आल्या की धार्मिक ध्रुवीकरण करून दंगली घडविल्या जातील व सत्ता मिळविली जाईल, असे भाकीत त्यांनी केले.तुमची राष्ट्रनिर्माणाची संकल्पना काय आहे ? देशात पेशवेशाही हवी की शिवशाही, गांधींचे विचार-आंबेडकरांचे संविधान हवे की गुरू गोळवलकर हे सरकारने आधी जाहीर करावे असे आव्हान त्यांनी दिले. जर्मनीचा हुकूमशाहा हिटलरने लोकांना राष्ट्रनिर्माणाचे आमिष दाखवून सत्ता मिळविली. पुढचा इतिहास सर्वांना माहिती असल्याचे सांगत त्यांनी हिटलर आणि पंतप्रधान मोदी यांची कार्यपद्धती समान असल्याची टीका केली. देशातील लोकशाही आज धोक्यात आली आहे. देशात अघोषित आणीबाणी लागू झाल्याचा आरोप वागळे यांनी केला.शेतकरी आंदोलनावरून गोंधळशेतकºयांच्या मोर्चाला माओवाद्यांचे आंदोलन संबोधणाऱ्या खासदार पूनम महाजन यांच्या वक्तव्याचा निखिल वागळे त्यांच्या शैलीत समाचार घेत होते. त्यावर सभागृहातील एका व्यक्तीने मोर्चेकऱ्यांच्या हाती लाल झेंडे का होते, असा आक्षेप नोंदविला. तोच वागळेही संतापले. सभागृहातील अन्य लोकांनी त्या व्यक्तीला बाहेर हुसकाविण्याचा स्वर आळवला. यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. सभागृह शांत होताच ‘लाल झेंडा क्रांतीचे प्रतीक आणि कामगारांचा ध्वज आहे. ही साधी अक्कल नाही, ते राष्ट्रनिर्माण काय करणार’, असा टोला त्यांनी लगावला.सरकारची वर्तमान कार्यपद्धती पाहता संविधान आणि लोकशाही संपुष्टात आणली जाईल आणि सार्वजनिक निवडणुका घेणेही बंद केले जाण्याची शक्यता आहे. पुढील काही चार ते पाच सार्वत्रिक निवडणुका शेवटच्या ठरतील, असा धोका त्यांनी यावेळी व्यक्त केला.बाळासाहेब सरोदे म्हणाले की, गांधीशिवाय तराणोपाय नाही या धारणेवरच जीवनप्रवास सुरू आहे. विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड म्हणजे सर्वोदय होय. अध्यात्म म्हणजे पोथी वाचून पोपटपंची करणे नव्हे तर ती जीवन जगण्याची कला आहे, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. यापुढेही वानप्रस्थाश्रम नाही तर जनप्रस्थाश्रमात राहूनच कार्यरत राहणार असल्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक अ‍ॅड. असीम सरोदे यांनी तर संचालन डॉ. रवींद्र भुसारी यांनी केले. संदेश सिंगलकर यांनी आभार मानले.

 

टॅग्स :nagpurनागपूर