शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

सरकार शेतकºयांच्या सोबत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:44 IST

छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेच्या माध्यमातून देशातील आजवरची सर्वात मोठी कृषी कर्जमाफी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देपालकमंत्री बावनकुळे यांची ग्वाही : स्वातंत्र्यदिनाचा वर्धापनदिन उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेच्या माध्यमातून देशातील आजवरची सर्वात मोठी कृषी कर्जमाफी देण्यात आली आहे. यापुढेही शेतकरी अडचणीत आला तर सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही राज्याचे ऊर्जा व उत्पादन शुल्कआणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या मुख्य शासकीय समारंभात बावनकुळे यांनी जिल्ह्यातील नागरिकांशी संवाद साधला.खा.डॉ. विकास महात्मे, जि.प.अध्यक्षा निशा सावरकर, महापौर नंदा जिचकार, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, नासुप्रचे सभापती डॉ.दीपक म्हैसेकर, मनपा आयुक्त अश्विन मुदगल, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापसिंह पाटणकर, अप्पर आदिवासी आयुक्त डॉ.माधवी खोडे, वस्त्रोद्योग संचालक संजय मीना आदी उपस्थित होते.कुठलीही अट न ठेवता सरसकट असे दीड लाख रु पयापर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील ६६हजारांपेक्षा जास्त शेतकºयांना लाभ होणार असल्याचे सांगत बावनकुळे म्हणाले, राज्यात पाऊस नसल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, शासन यावर तत्परतेने उपाययोजना करीत आहे. राज्यातील शेतकºयांसाठी कृषी सौरपंपाद्वारे सिंचन हा उपक्र म प्रभावीपणे राबविण्यात येत असून, येत्या काळात ४० लाख शेतकºयांना कृषिपंपासाठी असलेले फीडर सौरऊर्जेवर परावर्तित करून शेतकºयांना दिवसा अखंडित वीज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सरकारची सर्वोच्च प्राथमिकता शेतकºयांचा सर्वांगीण विकास असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली येत्या दोन वर्षांत राज्यातील एकही व्यक्ती बेघर राहणार नसून, प्रत्येकाला घरकूल उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी सागितले.यावेळी पालकमंत्री बावनकुळे यांच्याहस्ते २०१६-१७ या वर्षांचे जिल्हास्तरीय संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान स्पर्धेतील प्रथम पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायत बनपुरी तालुका पारशिवनीला पाच लक्ष रुपये, द्वितीय ग्रामपंचायत धानला, तालुका मौदा तीन लक्ष रुपये तर तृतीय पुरस्कार ग्रामपंचायात सुरादेवीला दोन लक्ष रुपये तसेच विशेष पुरस्कारामध्ये स्व. आबासाहेब खेडकर स्मृती कुटुंबकल्याण पुरस्कार २५ हजार ग्रामपंचायत आलागोंदी, तालुका, नागपूर, स्व. वसंतराव नाईक पुरस्कार पाणी गुणवत्ता पिण्याचे पाणी व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापन २५ हजार रुपये ग्रा.पं. खापरी (उबगी) तालुका कळमेश्वर तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक एकता पुरस्कार २५ हजार ग्रा.पं. मनोरा ता. भिवापूर यांना देण्यात आला.अधिकाºयांचा गौरवउल्लेखनीय सेवेबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापिसंह पाटणकर यांना तसेच अपर पोलीस आयुक्त गडचिरोली कॅम्प नागपूर, अंकुश शिंदे यांना राष्ट्रपती पोलीस सेवापदक पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले. कठीण व खडतर परिस्थितीतील कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक अजित देशपांडे, सहायक फौजदार मुधोरकर, सहा. फौजदार ज्ञानेश्वर इत्तडवार, पोलीस हवालदार गोविंद काकडे, पोलीस शिपाई सतीश पाटील यांना विशेष सेवापदक देऊन गौरवण्यात आले.उत्कृष्ट कार्याचा गौरवनागपूर जिल्ह्यातील शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रमशाळा बेलदा ता. रामटेकचे मुख्यध्यापक एन.एल. भास्करे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी गौरव करण्यात आला. तसेच जिल्हधिकारी कार्यालयातील गनर नीलेश घोडे यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे तयार करण्यात आलेल्या आपला जिल्हा नागपूर या पुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित स्वातंत्र्य सेनानी, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांना भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.