शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

दुष्काळग्रस्तांना मदत करण्यात सरकार अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 11:43 IST

दुष्काळग्रस्तांना मदत करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप विधिमंडळातील काँग्रेसचे उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषेदत केला.

ठळक मुद्दे विदर्भात एकही चारा छावणी सुरू नाही२२ हजार गावे टँकरमुक्त घोषणा हवेतच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजप-शिवसेना युती सरकारने पाच वर्षात राज्यातील २२ हजार गावे टँकरमुक्त करू अशी घोषणा केली. जलयुक्त शिवार योजनेचा गाजावाजा करून साडेचार वर्षात २२ हजार कोटी खर्च करूनही राज्यातील २२ जिल्हे दुष्काळाच्या खाईत लोटले. जलयुक्त शिवार योजना पूर्णपणे फसली आहे. संपूर्ण महाराष्ट्र पाण्यासाठी तडफडत असून महाराष्ट्र टँकरमुक्त नव्हे तर टँकरयुक्त केला आहे. दुष्काळग्रस्तांना मदत करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप विधिमंडळातील काँग्रेसचे उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषेदत केला.गेल्या १५ ते २० वर्षात पडला नाही असा भीषण दुष्काळ राज्यात पडला आहे. दुष्काळग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली. समितीच्या सदस्यांनी पश्चिम विदर्भातील दुष्काळग्रस्त सहा जिल्ह्याचा दौरा करून ४० ते ४५ गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. पाहणीत आढळून आलेल्या वास्तवाची माहिती विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. समितीचे सदस्य माजी मंत्री वसंतराव पुरके , राजेंद्र मुळक, आ. रणजित कांबळे, वीरेंद्र जगताप, राहुल बोंद्रे,अमित झनक, नतिकोद्दीन खतीब, अतुल लोंढे यांच्यासह किशोर गजभिये, माजी आमदार आशिष देशमुख, नाना गावंडे, सुरेश भोयर, कुंदा राऊ त, तक्षशीला वागधरे, नाना कंभाले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.राज्यातील नागरिकांनी पाण्यासाठी १२ हजार टँकरची मागणी केली. परंतु मागणी केल्यानंतरही प्रशासनाकडून टँकर उपलब्ध होत नाही. विहिरी अधिग्रहित केल्या परंतु पाण्याची लाईन टाकलेली नाही. यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. चारा छावण्याची मागणी करूनही विदर्भात अद्याप एकही चारा छावणी सुरू करण्यात आलेली नाही. लोकांना रोजगार नाही. चारा छावण्याचे नियम किचकट केले आहेत. प्रशासनाची याकडे डोळेझाक सुरू असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. बुलडाणा जिल्ह्यातील सिरवी, करवंड, टाकस्खेड, उमंगा, उंद्री,गणेशपूर, सज्जनपूर, चिंचोली, अकोला जिल्ह्यातील वाडेगाव, उमरा, वापटा, इंदोरा धापोरा, जामनी,वाशीम जिल्ह्यातील मोरणा धरण, काटा, यवतमाळ जिल्ह्यातील गरडतगाव, आजंती, पांढरी घोडखिंडी, धानोरा, अमरावती जिल्ह्यातील आमला विशेश्वर, घाटलाडकी, नागपूर जिल्ह्यातील भारसिंगी मेंटपांजरा, आमनगाव, डोर्ली आदी गावांना समितीने भेटी दिल्या.गणेशपूर गावात प्लास्टीकच्या ड्रममध्ये पाणी भरून त्याला कुलूप लावत असल्याचे भयाण वास्तव आहे. यावर शासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. दुष्काळ निवारणासाठी आराखड्याला मंजुरी दिली. पण अजूनही अनेक जिल्ह्यांना निधी उपलब्ध केलेला नाही. महसूल राज्यमंत्र्यांच्या यवतमाळ जिल्ह्यातील आजंती गावातील नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. तरीसुद्धा परिस्थितीत बदल झालेला नाही, असे ते म्हणाले.पीक विम्याचा पैसा बँकाच्या घशातशेतकऱ्यानी पीक विमा मिळण्यासाठी दावा केला. काही शेतकऱ्याच्या बँक खात्यात ही रक्कम जमा झाली. परंतु बँकांनी ही रक्कम शेतकऱ्याना न देता परस्पर कर्जात वळती केली. यामुळे शेतकऱ्याच्या हाती काहीच लागले नाही. बँकाच्या घशात हा पैसा गेल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

अशा आहेत समितीच्या मागण्याशेतकऱ्याना प्रति हेक्टरी ५० हजार मदत द्यामागणीनुसार दुष्काळग्रस्त भागात १२ हजार टँकर सुरू करा.दुष्काळ निवारणासाठी तात्काळ निधी उपलब्ध करा.प्रति फळझाड एक हजारांचे अनुदान द्यावे.ग्रामीण भागातील १२ तास असलेले वीज भारनियमन क मी करावे.प्लास्टिक कस्टींगसाठी ९० टक्के अनुदान द्यावे.रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावी.शेतकऱ्याना पीक विम्याची रक्कम मिळावी.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार