शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दुष्काळग्रस्तांना मदत करण्यात सरकार अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 11:43 IST

दुष्काळग्रस्तांना मदत करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप विधिमंडळातील काँग्रेसचे उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषेदत केला.

ठळक मुद्दे विदर्भात एकही चारा छावणी सुरू नाही२२ हजार गावे टँकरमुक्त घोषणा हवेतच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजप-शिवसेना युती सरकारने पाच वर्षात राज्यातील २२ हजार गावे टँकरमुक्त करू अशी घोषणा केली. जलयुक्त शिवार योजनेचा गाजावाजा करून साडेचार वर्षात २२ हजार कोटी खर्च करूनही राज्यातील २२ जिल्हे दुष्काळाच्या खाईत लोटले. जलयुक्त शिवार योजना पूर्णपणे फसली आहे. संपूर्ण महाराष्ट्र पाण्यासाठी तडफडत असून महाराष्ट्र टँकरमुक्त नव्हे तर टँकरयुक्त केला आहे. दुष्काळग्रस्तांना मदत करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप विधिमंडळातील काँग्रेसचे उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषेदत केला.गेल्या १५ ते २० वर्षात पडला नाही असा भीषण दुष्काळ राज्यात पडला आहे. दुष्काळग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली. समितीच्या सदस्यांनी पश्चिम विदर्भातील दुष्काळग्रस्त सहा जिल्ह्याचा दौरा करून ४० ते ४५ गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. पाहणीत आढळून आलेल्या वास्तवाची माहिती विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. समितीचे सदस्य माजी मंत्री वसंतराव पुरके , राजेंद्र मुळक, आ. रणजित कांबळे, वीरेंद्र जगताप, राहुल बोंद्रे,अमित झनक, नतिकोद्दीन खतीब, अतुल लोंढे यांच्यासह किशोर गजभिये, माजी आमदार आशिष देशमुख, नाना गावंडे, सुरेश भोयर, कुंदा राऊ त, तक्षशीला वागधरे, नाना कंभाले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.राज्यातील नागरिकांनी पाण्यासाठी १२ हजार टँकरची मागणी केली. परंतु मागणी केल्यानंतरही प्रशासनाकडून टँकर उपलब्ध होत नाही. विहिरी अधिग्रहित केल्या परंतु पाण्याची लाईन टाकलेली नाही. यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. चारा छावण्याची मागणी करूनही विदर्भात अद्याप एकही चारा छावणी सुरू करण्यात आलेली नाही. लोकांना रोजगार नाही. चारा छावण्याचे नियम किचकट केले आहेत. प्रशासनाची याकडे डोळेझाक सुरू असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. बुलडाणा जिल्ह्यातील सिरवी, करवंड, टाकस्खेड, उमंगा, उंद्री,गणेशपूर, सज्जनपूर, चिंचोली, अकोला जिल्ह्यातील वाडेगाव, उमरा, वापटा, इंदोरा धापोरा, जामनी,वाशीम जिल्ह्यातील मोरणा धरण, काटा, यवतमाळ जिल्ह्यातील गरडतगाव, आजंती, पांढरी घोडखिंडी, धानोरा, अमरावती जिल्ह्यातील आमला विशेश्वर, घाटलाडकी, नागपूर जिल्ह्यातील भारसिंगी मेंटपांजरा, आमनगाव, डोर्ली आदी गावांना समितीने भेटी दिल्या.गणेशपूर गावात प्लास्टीकच्या ड्रममध्ये पाणी भरून त्याला कुलूप लावत असल्याचे भयाण वास्तव आहे. यावर शासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. दुष्काळ निवारणासाठी आराखड्याला मंजुरी दिली. पण अजूनही अनेक जिल्ह्यांना निधी उपलब्ध केलेला नाही. महसूल राज्यमंत्र्यांच्या यवतमाळ जिल्ह्यातील आजंती गावातील नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. तरीसुद्धा परिस्थितीत बदल झालेला नाही, असे ते म्हणाले.पीक विम्याचा पैसा बँकाच्या घशातशेतकऱ्यानी पीक विमा मिळण्यासाठी दावा केला. काही शेतकऱ्याच्या बँक खात्यात ही रक्कम जमा झाली. परंतु बँकांनी ही रक्कम शेतकऱ्याना न देता परस्पर कर्जात वळती केली. यामुळे शेतकऱ्याच्या हाती काहीच लागले नाही. बँकाच्या घशात हा पैसा गेल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

अशा आहेत समितीच्या मागण्याशेतकऱ्याना प्रति हेक्टरी ५० हजार मदत द्यामागणीनुसार दुष्काळग्रस्त भागात १२ हजार टँकर सुरू करा.दुष्काळ निवारणासाठी तात्काळ निधी उपलब्ध करा.प्रति फळझाड एक हजारांचे अनुदान द्यावे.ग्रामीण भागातील १२ तास असलेले वीज भारनियमन क मी करावे.प्लास्टिक कस्टींगसाठी ९० टक्के अनुदान द्यावे.रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावी.शेतकऱ्याना पीक विम्याची रक्कम मिळावी.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार