शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
4
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
5
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
6
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
7
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
8
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
9
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
11
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
12
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
13
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
14
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
15
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
16
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
17
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
18
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
19
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
20
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया

दुष्काळग्रस्तांना मदत करण्यात सरकार अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 11:43 IST

दुष्काळग्रस्तांना मदत करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप विधिमंडळातील काँग्रेसचे उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषेदत केला.

ठळक मुद्दे विदर्भात एकही चारा छावणी सुरू नाही२२ हजार गावे टँकरमुक्त घोषणा हवेतच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजप-शिवसेना युती सरकारने पाच वर्षात राज्यातील २२ हजार गावे टँकरमुक्त करू अशी घोषणा केली. जलयुक्त शिवार योजनेचा गाजावाजा करून साडेचार वर्षात २२ हजार कोटी खर्च करूनही राज्यातील २२ जिल्हे दुष्काळाच्या खाईत लोटले. जलयुक्त शिवार योजना पूर्णपणे फसली आहे. संपूर्ण महाराष्ट्र पाण्यासाठी तडफडत असून महाराष्ट्र टँकरमुक्त नव्हे तर टँकरयुक्त केला आहे. दुष्काळग्रस्तांना मदत करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप विधिमंडळातील काँग्रेसचे उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषेदत केला.गेल्या १५ ते २० वर्षात पडला नाही असा भीषण दुष्काळ राज्यात पडला आहे. दुष्काळग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली. समितीच्या सदस्यांनी पश्चिम विदर्भातील दुष्काळग्रस्त सहा जिल्ह्याचा दौरा करून ४० ते ४५ गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. पाहणीत आढळून आलेल्या वास्तवाची माहिती विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. समितीचे सदस्य माजी मंत्री वसंतराव पुरके , राजेंद्र मुळक, आ. रणजित कांबळे, वीरेंद्र जगताप, राहुल बोंद्रे,अमित झनक, नतिकोद्दीन खतीब, अतुल लोंढे यांच्यासह किशोर गजभिये, माजी आमदार आशिष देशमुख, नाना गावंडे, सुरेश भोयर, कुंदा राऊ त, तक्षशीला वागधरे, नाना कंभाले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.राज्यातील नागरिकांनी पाण्यासाठी १२ हजार टँकरची मागणी केली. परंतु मागणी केल्यानंतरही प्रशासनाकडून टँकर उपलब्ध होत नाही. विहिरी अधिग्रहित केल्या परंतु पाण्याची लाईन टाकलेली नाही. यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. चारा छावण्याची मागणी करूनही विदर्भात अद्याप एकही चारा छावणी सुरू करण्यात आलेली नाही. लोकांना रोजगार नाही. चारा छावण्याचे नियम किचकट केले आहेत. प्रशासनाची याकडे डोळेझाक सुरू असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. बुलडाणा जिल्ह्यातील सिरवी, करवंड, टाकस्खेड, उमंगा, उंद्री,गणेशपूर, सज्जनपूर, चिंचोली, अकोला जिल्ह्यातील वाडेगाव, उमरा, वापटा, इंदोरा धापोरा, जामनी,वाशीम जिल्ह्यातील मोरणा धरण, काटा, यवतमाळ जिल्ह्यातील गरडतगाव, आजंती, पांढरी घोडखिंडी, धानोरा, अमरावती जिल्ह्यातील आमला विशेश्वर, घाटलाडकी, नागपूर जिल्ह्यातील भारसिंगी मेंटपांजरा, आमनगाव, डोर्ली आदी गावांना समितीने भेटी दिल्या.गणेशपूर गावात प्लास्टीकच्या ड्रममध्ये पाणी भरून त्याला कुलूप लावत असल्याचे भयाण वास्तव आहे. यावर शासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. दुष्काळ निवारणासाठी आराखड्याला मंजुरी दिली. पण अजूनही अनेक जिल्ह्यांना निधी उपलब्ध केलेला नाही. महसूल राज्यमंत्र्यांच्या यवतमाळ जिल्ह्यातील आजंती गावातील नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. तरीसुद्धा परिस्थितीत बदल झालेला नाही, असे ते म्हणाले.पीक विम्याचा पैसा बँकाच्या घशातशेतकऱ्यानी पीक विमा मिळण्यासाठी दावा केला. काही शेतकऱ्याच्या बँक खात्यात ही रक्कम जमा झाली. परंतु बँकांनी ही रक्कम शेतकऱ्याना न देता परस्पर कर्जात वळती केली. यामुळे शेतकऱ्याच्या हाती काहीच लागले नाही. बँकाच्या घशात हा पैसा गेल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

अशा आहेत समितीच्या मागण्याशेतकऱ्याना प्रति हेक्टरी ५० हजार मदत द्यामागणीनुसार दुष्काळग्रस्त भागात १२ हजार टँकर सुरू करा.दुष्काळ निवारणासाठी तात्काळ निधी उपलब्ध करा.प्रति फळझाड एक हजारांचे अनुदान द्यावे.ग्रामीण भागातील १२ तास असलेले वीज भारनियमन क मी करावे.प्लास्टिक कस्टींगसाठी ९० टक्के अनुदान द्यावे.रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावी.शेतकऱ्याना पीक विम्याची रक्कम मिळावी.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार