शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
7
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
8
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
9
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
10
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
11
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
12
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
13
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
14
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
15
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
16
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
17
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
18
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
19
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
20
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना

आंतरराष्ट्रीय पदक विजेत्यांसाठी शासनाकडे रक्कम नाही? दीड वर्षापासून रोख पुरस्कारांची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 14:29 IST

Nagpur : १३ आंतरराष्ट्रीय व ३१८ राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना सुवर्णपदकासाठी प्रत्येकी ७ लाख, रौप्यपदक विजेत्यांना ५ लाख आणि कांस्यपदक विजेत्यांना ३ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. पण, त्याचवेळी आंतरराष्ट्रीय पदकविजेते महाराष्ट्राचे खेळाडू अद्याप रोख पुरस्कारापासून वंचित आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील ३३१ विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. खेळाडूंना २२ कोटी ३१ लाख रुपयांची पारितोषिके वाटण्यात आली. १३ आंतरराष्ट्रीय व ३१८ राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना सुवर्णपदकासाठी प्रत्येकी ७ लाख, रौप्यपदक विजेत्यांना ५ लाख आणि कांस्यपदक विजेत्यांना ३ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले.

पण, त्याचवेळी आंतरराष्ट्रीय पदकविजेते महाराष्ट्राचे खेळाडू अद्याप रोख पुरस्कारापासून वंचित आहेत, ही आठवण राज्यकर्ते आणि प्रशासनालादेखील झालेली नाही. तिरंदाजीत देशाची पताका उंचाविणारे ओजस प्रवीण देवतळे, आदिती गोपीचंद स्वामी, मधुरा शैलेंद्र धामणगावकर, प्रथमेश भालचंद्र फुगे आणि प्रथमेश समाधान जातकर या ताऱ्यांचा विसर का पहला? सर्वांत प्रगत समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या क्रीडा विभागाला डिसेंबर २०२४ ला दहा मीटर एअर रायफल प्रकारात राष्ट्रीय विजेती बनलेली नागपूरची अनन्या लोकेश नायडू हिची कामगिरीदेखील आठवलेली नाही, अनन्याने नुकतेच आशियाई नेमबाजीत सांघिक कांस्यपदकही जिंकले. २०१२ च्या क्रीडा धोरणानुसार आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्व, आशियाई आणि ऑलिम्पिकमध्ये पदक विजेत्यांना कोट्यवधीचे पुरस्कार देण्याची तरतूद ७ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयात करण्यात आलेली आहे.

खेळाडूंची प्रगती क्रीडा विभागाला माहिती नसावी का? राज्यातील कानाकोपऱ्यांत जिल्हास्तरावर क्रीडा अधिकारी कार्यालय असताना डोळेझाक केली जाते की अनावधानाने चूक होते, हे कळायला मार्ग नाही. क्रीडा संचालनालयातील जबाबदार अधिकाऱ्यांनी मैदान गाजविणाऱ्या खेळाडूंची स्वतःहून दखल का घेऊ नये? पुरस्कार रक्कम मिळण्यासाठी अर्ज हीच अट असावी का? अर्ज केल्यानंतरही कार्यालयाचे उंबरठे झिजविण्यात खेळाडू आणि पालकांची किती हेळसांड होते, हे खेळाडूंच्या कामगिरीची दखल न घेणाऱ्यांना कधी समजणार? खेळात 'नंबर वन' अशी बिरुदावली मिरविणाऱ्या क्रीडा खात्याने मैदानात उतरून काम केले तरच खेळाडूंच्या वेदना त्यांना समजतील. कागदावर काम करीत राहिल्यास खेळाडूने कितीही घाम गाळला तरी त्याच्या कामगिरीची पावती देणारे शासकीय हात पुढे येणार नाहीत, अशा वेदनादायी प्रतिक्रिया पुरस्काराच्या प्रतीक्षेत असलेल्या खेळाडूंच्या पालकांनी व्यक्त केल्या आहेत.

रोख रकमेच्या प्रतीक्षेत असलेले पदक विजेते :

आदिती गोपीचंद स्वामी (तिरंदाजी : सातारा), विश्व चौंपियनशिप बर्लिनः सांधिक व वैयक्तिक सुवर्ण, आशियाई चॅम्पियनशिप बैंकॉक: सांधिक व मिश्र सांधिक सुवर्ण, युथ विश्व चैम्पियनशिप आयर्लंड: कैडेट सांधिक आणि वैयक्तिक सुवर्ण, युथ आशियाई चैंपियनशिप तायपेई : सांधिक सुवर्ण, विश्वचषक स्टेज १ ते ४: चार सांधिक सुवर्ण आणि कांस्य

टॅग्स :nagpurनागपूर