शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

सरकार खासगी डॉक्टरांना विश्वासात घेत नाही : विनय अग्रवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 01:17 IST

सरकारचे आरोग्य कार्यक्रम, योजना चांगल्या असतात. परंतु त्याची व्यापक अंमलबजावणी होत नाही. कारण, सरकार खासगी डॉक्टरांना विश्वासातच घेत नाही. आयुष्यमान भारत सारख्या योजनेत खासगी रुग्णालयांचा समावेश फारच कमी आहे. योजनेच्या चांगल्या अंमलबजावणीसाठी खासगी डॉक्टर व व्यवसायिकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे, असे मत ‘आयएमए’चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विनय अग्रवाल यांनी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्दे आयएमएच्या ‘निमॅकॉन’ परिषदेचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकारचे आरोग्य कार्यक्रम, योजना चांगल्या असतात. परंतु त्याची व्यापक अंमलबजावणी होत नाही. कारण, सरकार खासगी डॉक्टरांना विश्वासातच घेत नाही. आयुष्यमान भारत सारख्या योजनेत खासगी रुग्णालयांचा समावेश फारच कमी आहे. योजनेच्या चांगल्या अंमलबजावणीसाठी खासगी डॉक्टर व व्यवसायिकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे, असे मत ‘आयएमए’चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विनय अग्रवाल यांनी येथे व्यक्त केले.इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नागपूर शाखेच्यावतीने ‘निमॅकॉन-२०१८’ परिषदेत शनिवारी डॉ. किशोर टावरी स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यात ‘वैद्यकीय सामाजिक परिस्थिती’ या विषयावर ते बोलत होते. या चर्चासत्रात डॉ. वेदप्रकाश मिश्रा व डॉ. आरती आनंद यांनी विशेष अभिप्राय सादर केला.डॉ. अग्रवाल म्हणाले, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारताच्या वैद्यकीय सामाजिक परिस्थितीत फार बदल झाला आहे. त्यावेळी भारतीय माणसाचे सरासरी वय ३२ होते. ते आता ६८ वर पोहचले आहे. हे केवळ बदलत्या वैद्यकीय परिस्थितीचे द्योतक आहे.परिषदेच्या पहिल्या दिवशी अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी आधुनिक उपचार पद्धतींच्या आश्चर्यजनक प्रगतीचा आलेख सादर केला. अत्याधुनिक लॅप्रोस्कोपी सर्जरीपासून, मधुमेहासारख्या आजारांच्या उपचारांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. चर्चासत्राची सुरुवात प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉ. अजय कडुस्कर यांच्या व्याख्यानाने झाली. डॉ. आश्विनी तायडे,डॉ. गोपाल अरोरा, डॉ. अलंकार रामटेके, डॉ. आलोक उमरे, डॉ. मिलिंद भुशुंडी, डॉ. ईश्वर गिलाडा, डॉ. प्रशांत भांडारकर, डॉ. संजय देशपांडे, डॉ. नंदिनी गोकुलचंद्रन, डॉ. सुरेश चावरे व डॉ. राजेश सिंघानिया आदींचे अतिशय अभ्यासपूर्ण असे व्याख्यान झाले. दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेचे डॉ. ललित वाघमारे यांनी वैद्यकीय शिक्षण तंत्रामध्ये आमूलाग्र बदल होत असून ते आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले. डॉ. रवि वानखेडे यांनी अवयवदान या विषयी जनजागरणाची आवश्यकता प्रतिपादित केली. डॉ. अजय काटे यांनी शस्त्रक्रियेनंतर घ्यायच्या काळजीबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. आशिष दिसावल, सचिव डॉ. दिनेश अग्रवाल, आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. अभिजित अंभईकर, सचिव डॉ. सरिता उगेमुगे, आयएमए महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. यशवंत देशपांडे, उपाध्यक्ष डॉ. संजय देशपांडे व डॉ. विंकी रुघवानी उपस्थित होते.

टॅग्स :doctorडॉक्टरGovernmentसरकार