शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

सरकार खासगी डॉक्टरांना विश्वासात घेत नाही : विनय अग्रवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 01:17 IST

सरकारचे आरोग्य कार्यक्रम, योजना चांगल्या असतात. परंतु त्याची व्यापक अंमलबजावणी होत नाही. कारण, सरकार खासगी डॉक्टरांना विश्वासातच घेत नाही. आयुष्यमान भारत सारख्या योजनेत खासगी रुग्णालयांचा समावेश फारच कमी आहे. योजनेच्या चांगल्या अंमलबजावणीसाठी खासगी डॉक्टर व व्यवसायिकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे, असे मत ‘आयएमए’चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विनय अग्रवाल यांनी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्दे आयएमएच्या ‘निमॅकॉन’ परिषदेचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकारचे आरोग्य कार्यक्रम, योजना चांगल्या असतात. परंतु त्याची व्यापक अंमलबजावणी होत नाही. कारण, सरकार खासगी डॉक्टरांना विश्वासातच घेत नाही. आयुष्यमान भारत सारख्या योजनेत खासगी रुग्णालयांचा समावेश फारच कमी आहे. योजनेच्या चांगल्या अंमलबजावणीसाठी खासगी डॉक्टर व व्यवसायिकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे, असे मत ‘आयएमए’चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विनय अग्रवाल यांनी येथे व्यक्त केले.इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नागपूर शाखेच्यावतीने ‘निमॅकॉन-२०१८’ परिषदेत शनिवारी डॉ. किशोर टावरी स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यात ‘वैद्यकीय सामाजिक परिस्थिती’ या विषयावर ते बोलत होते. या चर्चासत्रात डॉ. वेदप्रकाश मिश्रा व डॉ. आरती आनंद यांनी विशेष अभिप्राय सादर केला.डॉ. अग्रवाल म्हणाले, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारताच्या वैद्यकीय सामाजिक परिस्थितीत फार बदल झाला आहे. त्यावेळी भारतीय माणसाचे सरासरी वय ३२ होते. ते आता ६८ वर पोहचले आहे. हे केवळ बदलत्या वैद्यकीय परिस्थितीचे द्योतक आहे.परिषदेच्या पहिल्या दिवशी अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी आधुनिक उपचार पद्धतींच्या आश्चर्यजनक प्रगतीचा आलेख सादर केला. अत्याधुनिक लॅप्रोस्कोपी सर्जरीपासून, मधुमेहासारख्या आजारांच्या उपचारांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. चर्चासत्राची सुरुवात प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉ. अजय कडुस्कर यांच्या व्याख्यानाने झाली. डॉ. आश्विनी तायडे,डॉ. गोपाल अरोरा, डॉ. अलंकार रामटेके, डॉ. आलोक उमरे, डॉ. मिलिंद भुशुंडी, डॉ. ईश्वर गिलाडा, डॉ. प्रशांत भांडारकर, डॉ. संजय देशपांडे, डॉ. नंदिनी गोकुलचंद्रन, डॉ. सुरेश चावरे व डॉ. राजेश सिंघानिया आदींचे अतिशय अभ्यासपूर्ण असे व्याख्यान झाले. दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेचे डॉ. ललित वाघमारे यांनी वैद्यकीय शिक्षण तंत्रामध्ये आमूलाग्र बदल होत असून ते आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले. डॉ. रवि वानखेडे यांनी अवयवदान या विषयी जनजागरणाची आवश्यकता प्रतिपादित केली. डॉ. अजय काटे यांनी शस्त्रक्रियेनंतर घ्यायच्या काळजीबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. आशिष दिसावल, सचिव डॉ. दिनेश अग्रवाल, आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. अभिजित अंभईकर, सचिव डॉ. सरिता उगेमुगे, आयएमए महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. यशवंत देशपांडे, उपाध्यक्ष डॉ. संजय देशपांडे व डॉ. विंकी रुघवानी उपस्थित होते.

टॅग्स :doctorडॉक्टरGovernmentसरकार