शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

आदिवासी कुमारी मातांच्या प्रश्नाविषयी सरकार उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 20:00 IST

आदिवासी कुमारी मातांच्या प्रश्नाविषयी राज्य सरकार उदासीन दिसून येत असल्याचे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ओढले आहेत. तसेच, या प्रकरणात सरकारी अधिकारी स्वत:चे कर्तव्य सक्षमपणे पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत किंवा त्यांनी जाणिवपूर्वक जबाबदारी झटकण्याचे कार्य केले आहे, असे कान उपटणारे निरीक्षणही नोंदवले आहे.

ठळक मुद्देउच्च न्यायालयाचे ताशेरे : जबाबदारी झटकत असल्याचे निरीक्षण नोंदवले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आदिवासी कुमारी मातांच्या प्रश्नाविषयी राज्य सरकार उदासीन दिसून येत असल्याचे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ओढले आहेत. तसेच, या प्रकरणात सरकारी अधिकारी स्वत:चे कर्तव्य सक्षमपणे पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत किंवा त्यांनी जाणिवपूर्वक जबाबदारी झटकण्याचे कार्य केले आहे, असे कान उपटणारे निरीक्षणही नोंदवले आहे.न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अरुण उपाध्ये यांनी सरकारची खरडपट्टी काढली. २ आॅगस्ट २०१७ रोजी न्यायालयाने यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी कुमारी मातांना न्याय मिळावा व आरोपींवर कायद्यानुसार कारवाई व्हावी, याकरिता बैठक आयोजित करण्याचा आदेश सरकारला दिला होता. त्यानुसार, यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी २० सप्टेंबर २०१७ रोजी बैठक घेतली. परंतु, त्या बैठकीचे इतिवृत्त अद्याप न्यायालयात सादर केले नाही. बैठकीसंदर्भात गेल्या मार्चमध्ये प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले, पण त्यात इतिवृत्तीचा समावेश नाही. यावरून न्यायालयाने सरकारची कानउघाडणी केली. बैठकीनंतर आठ महिन्यांचा कालावधी लोटून गेल्यानंतरही जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकारी प्रकरणाचे गांभीर्य समजू शकले नाहीत. ते एकतर स्वत:च्या जबाबदारीला न्याय देऊ शकले नाहीत किंवा त्यांनी केवळ जबाबदारी झटकण्याचे कार्य केले आहे. अशा गंभीर प्रकरणामध्ये आठ महिन्यांचा विलंब खूपच जास्त होत असून त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. तत्पूर्वी सरकारने स्वत:ची भूमिका स्पष्ट करण्यासाठी वेळ देण्याची विनंती केली होती. त्यामुळे न्यायालयाने सरकारवर हे ताशेरे ओढतानाच त्यांच्याकडून अधिक समजदारपणा व जबाबदारीच्या वर्तनाची अपेक्षा करून उत्तरासाठी १८ एप्रिलपर्यंत वेळ मंजूर केला.अधिकारी, कंत्राटदार करतात शोषणयासंदर्भात पुणे येथील नॅचरल रिसोर्सेस कन्झर्व्हेटर्स आॅर्गनायझेशन व आदिवासी समाज कृती समिती यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. यवतमाळ जिल्हा व आंध्र प्रदेशलगतच्या सीमा भागातील ४०४ गावे व ३४ पाड्यांवरील कोलाम जमातीमधील अविवाहित मुलींचे लैंगिक शोषण केले जात आहे. या कुकृत्यामध्ये शासकीय कंत्राटदार, शासकीय अधिकारी आदी सामील आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी आणि कोलाम जमातीतील मुली व महिलांचे शोषणापासून संरक्षण करण्यात यावे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. ई. एस. सहस्रबुद्धे यांनी बाजू मांडली.१०३ आरोपी, ११ एफआयआर२० सप्टेंबर २०१७ रोजी झालेल्या बैठकीत बाल व महिला कल्याण विभागाने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, स्थानिक प्रशासनाकडे आदिवासी महिला व मुलींच्या शोषण प्रकरणात १०३ आरोपींची नोंद उपलब्ध आहे. तसेच, विविध पोलीस ठाण्यांमध्ये ११ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. बैठकीत कुमारी मातांची संख्या सांगण्यात आली नाही. आरोपींच्या संख्येपेक्षा कुमारी मातांची संख्या जास्त असू शकते असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांचे प्रतिनिधी बैठकीत उपस्थित होते. परंतु, त्यांच्या सूचनांची दखल घेण्यात आली नाही असा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे.

 

टॅग्स :WomenमहिलाHigh Courtउच्च न्यायालय