शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

होय, शासनाने जरांगे पाटलांना सरसकट ‘कुणबी’ दाखल्यांचे आश्वासन दिले; मुख्यमंत्र्यांची कबुली

By योगेश पांडे | Updated: December 13, 2023 23:46 IST

आंदोलनादरम्यान आत्महत्या केलेल्यांच्या वारसांना नोकरीबाबत अद्याप ठोस निर्णय नाही

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : मराठा आरक्षणाबाबत विधिमंडळात चर्चेला सुरुवात झाली असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी कबुली दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समुदायाला आरक्षण व सरसकट कुणबी जातीचे दाखले मिळण्यासाठी आंदोलन सुरू केले होते. शासनाकडून त्याबाबत ठोस आश्वासन मिळाल्यावरच त्यांनी उपोषण सोडले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे आता कुणबी समाजाच्या मागण्यांवर मुख्यमंत्री काय भूमिका मांडतात याकडे लक्ष लागले आहे.

विधानपरिषदेत भाई जगताप, सतेज पाटील, अभिजित वंजारी यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून हा मुद्दा मांडला होता. त्याच्या लेखी उत्तरात मुख्यमंत्र्यांनी याबाबत उत्तर दिले आहे. अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये बेमुदत उपोषण व आंदोलन केले होते. त्यांचे आंदोलन मराठा समुदायाला आरक्षण व सरसकट कुणबी जातीचे दाखले मिळण्यासाठी होते का व शासनाकडून ठोस आश्वासन मिळाल्यावरच त्यांनी उपोषण सोडले होते का, असा सवाल उपस्थित केला होता. त्याच्या लेखी उत्तरात मुख्यमंत्र्यांनी हे खरे असल्याचे उत्तर देत सरसकट कुणबी दाखल्यांचे आश्वासन शासनाने दिल्याचे स्पष्ट केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ५ मे २०२१ च्या आदेशानुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाचे आरक्षण रद्द केल्यामुळे राज्य शासनाने त्याविरोधात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. ही पुनर्विचार याचिका फेटाळण्यात आल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात ‘क्युरेटिव्ह पिटीशन’ दाखल करण्यात आली. या याचिकेत तसेच मराठा आरक्षण प्रकरणातील सर्व न्यायालयीन कार्यासाठी शासनाची बाजू प्रभावी पद्धतीने मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञांचा ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने तसेच मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या तरुणांच्या वारसांना आर्थिक मदत देणे किंवा शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी शासन पातळीवर कार्यवाही सुरू असल्याची माहितीदेखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

उपोषणामुळेच आंदोलन झाले हिंसक

दरम्यान सदस्यांनी जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळेच आंदोलन हिंसक झाले होते का व सप्टेंबर-ऑक्टोबर या महिन्यात ११ तरुणांनी आत्महत्या केल्या होत्या का, असा सवालदेखील केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हे अंशत: खरे असल्याची भूमिका मांडली आहे.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनEknath Shindeएकनाथ शिंदेMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील