शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

अनुदानाअभावी गोशाळा संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 01:42 IST

बीडगाव येथील राधाक्रिष्ण साईधाम गोशाळेत गेल्या पाच महिन्यात कत्तलखान्यातून वाचविण्यात आलेल्या जवळपास ५०० गोवंश पाठविण्यात आले.

ठळक मुद्देजनावरांच्या तुलनेत निधी मिळावा : गोहत्याबंदीनंतर संख्या वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बीडगाव येथील राधाक्रिष्ण साईधाम गोशाळेत गेल्या पाच महिन्यात कत्तलखान्यातून वाचविण्यात आलेल्या जवळपास ५०० गोवंश पाठविण्यात आले. पूर्वी गोशाळेत १८० गोवंशाचे पालनपोषण होत होते. अचानक ५०० जनावरांचा भार वाढल्याने त्यांचा पोषणाचा प्रश्न गोशाळेच्या संचालकापुढे पडला आहे. गोहत्याबंदी कायद्यानंतर अशीच अवस्था राज्यातील अनेक गोशाळेची झाली आहे. त्यामुळे गोशाळा संकटात आल्या आहेत. शासनाने गोशाळेतील पशुधनाचा सांभाळ व संगोपन करण्यासाठी महाराष्ट्रात ३४ जिल्ह्यात ३४ कोटी रुपयांचे अनुदान अर्थसंकल्पात मंजूर केले. मात्र अनुदानाच्या वाटपातही पेच निर्माण झाला आहे.महाराष्ट्र सरकारने २०१५ मध्ये गोवंश हत्याबंदीचा कायदा केला. या कायद्यामुळे जनावरांची होत असलेली तस्करी आणि कत्तलखान्याकडे जाणाºया गोवंशाचा बचाव मोठ्या प्रमाणात करण्यात आला. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाया करून गोवंश वाचविले. हे गोवंश राज्यातील विविध गोशाळांमध्ये पाठविण्यात आले. या गोवंशामध्ये मोठ्या प्रमाणात भाकड गाई असतात. ज्या शेती, व दूध यासाठी अनुत्पादक असतात. त्यामुळे गोशाळांना या जनावरांपासून कुठलाही लाभ होत नाही. गोशाळेत निव्वळ त्यांचे पोषणच करावे लागते. गोवंश हत्याबंदीच्या कायद्यानंतर गोशाळेमध्ये मोठ्या प्रमाणात जनावरे आली आहेत. त्यांच्यावर होणारा खर्च गोशाळांना परवडण्यासारखा राहिलेला नाही. त्यामुळे गोशाळा चालकांनी शासनाकडे गोवंशाच्या पोषणासाठी अनुदान द्यावे, अशी मागणी सरकारकडे केली होती. राज्य शासनाने २०१७-१८ च्या बजेटमध्ये भाकड गाई व गोवंश संगोपनासाठी ३४ जिल्ह्यांसाठी ३४ कोटी रुपये मंजूर केले. परंतु सरकार प्रत्येक जिल्ह्यातील एकाच गोशाळेला एक कोटी रुपयांचे अनुदान देणार आहे. या निर्णयाचा गोशाळा संचालकांनी विरोध केला आहे. गोवंश हत्याबंदीच्या कायद्यानंतर प्रत्येकच गोशाळेमध्ये जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे एक कोटीची रक्कम प्रत्येक गोशाळेत समप्रमाणात वाटण्यात यावी, अशी मागणी गोशाळा संचालकांची आहे.कायद्याला खीळ बसण्याची शक्यताकायद्याच्या अंमलबजावणीनंतर खरंच गोशाळा चालविणे कठीण झाले आहे. गुरांना चारा, त्यांच्यासाठी टिनाचे शेड, पाण्याची व्यवस्था, आरोग्याची काळजी, गुरांची स्वच्छता, परिसराची स्वच्छता यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक निधी खर्च होतो आहे. शासनाने जर एकाच गोशाळेला अनुदान दिले तर कत्तलखान्यातून वाचविण्यात आलेले जनावर इतर गोशाळा ठेवणार नाही, कारण पालनपोषणाचा खर्च वाढला आहे. अनुदानाचे वाटप समप्रमाणात न झाल्यास कायद्यालाही खीळ बसण्याची शक्यता आहे.- मुन्ना शुक्ला, संचालक, गोशाळा